शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

राज्याच्या मनोधैर्य योजनेतून सोलापुरातील पीडितांना मिळाली कोट्यवधींची मदत

By appasaheb.patil | Updated: January 30, 2023 16:00 IST

मदतीचे विविध टप्पे; पीडितेने साक्ष फिरविल्यास होते व्याजासकट वसुली

आप्पासाहेब पाटील, सोलापूर: लैंगिक अत्याचारग्रस्त पीडितांना मनोधैर्य योजनेंतर्गत मदत केली जाते. या प्रकरणात जर एखाद्या पीडितेने न्यायालयात साक्ष फिरविल्यास दिलेली सर्व रक्कम व्याजासह वसूल करण्यात येते. मनोधैर्य योजनेमुळे अनेक पीडितांना आर्थिक मदतीशिवाय त्यांचे समुपदेशन, निवारा, वैद्यकीय व कायदेशीर मदत आधार सेवा तत्परतेने उपलब्ध करून त्यांचे पुनर्वसन करण्याचे काम यशस्वीपणे करण्यात येत आहे.

बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचार, ॲसिड हल्ला यामध्ये बळी पडलेल्या महिला आणि बालकांना अर्थसहाय्य व पुनर्वसन करण्यासाठी मनोधैर्य योजना राज्य मंत्रिमंडळाने मंजूर केली. या योजनेची अंमलबजावणी संपूर्ण राज्यात २ ऑॅक्टोबर, २०१३ पासून सुरू झाली. पीडितांना किमान रु. २ लाख ते ३ लाखापर्यंत आर्थिक मदत दिली जाते. गुन्हेगारांना गंभीर शिक्षा देणे आवश्यक असतानाच या गुन्ह्यातील पीडित महिला व बालकांना प्रतिष्ठा व आत्मविश्वास पुन्हा मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे.

अत्याचार प्रकरणात अनेक वेळा फिर्यादी व आरोपी यांच्यामध्ये तडजोड होते. शिवाय कोर्टात केस सुरू असताना पीडितेकडून खोटी तक्रार दिल्याचे कबूल करण्यात येते. शिवाय अनेक कारणांमुळे कोर्टात केस आरोपीला शिक्षा होईपर्यंत चालत नाही. यात आरोपी, फिर्यादी व साक्षीदार हे फितूर होतात. त्यामुळे मोठी अडचण होते.

पीडितेला तीन लाखांपर्यंत आर्थिक मदत...

या योजनेंतर्गत बलात्कार व बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी किमान दोन लाख रुपये व विशेष प्रकरणामध्ये कमाल तीन लाख अर्थसहाय्य देण्यात येते. त्याचप्रमाणे ॲसिड हल्ल्यात जखमी झालेल्या महिला व बालकांस त्यांचा चेहरा विद्रूप झाल्यास अथवा कायमचे अपंगत्व आल्यास तीन लाख रुपये आणि ॲसिड हल्ल्यात इतर जखमा झालेल्या महिला व बालकांना ५० हजार रुपये इतके अर्थसहाय्य देण्यात येते.

असे होते मदतीचे वाटप....

महिला व बाल विकास विभागामार्फत या योजनेनुसार अर्थसहाय्य देण्यात येते. पोलिसात तक्रार दाखल होते. मेडिकल होते. संबंधित प्रकरणाची कागदपत्रे वरिष्ठ पातळीवर पत्राद्वारे पाठविली जातात. त्यावर विधी व सेवा प्राधिकरणाचे शिष्टमंडळ चर्चा करून किती रक्कम द्यावयाची याबाबतचा निर्णय घेतात. वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळी रक्कम दिली जाते. सुरूवातीस ठराविक रक्कम दिली जाते, त्यानंतर उर्वरित रक्कम बँकेत एफडी म्हणून केसचा निकाल लागेपर्यंत ठेवली जाते.

समाजात ती पुन्हा उभी झाली पाहिजे. सन्मानाने तिने जगले पाहिजे यासाठी मनोधैर्य योजनेतून पीडितांना मदत केली जाते. ही रक्कम टप्प्याटप्प्याने दिली जाते. काही रक्कम एफ.डी. म्हणून बँकेत ठेवली जाते. मागील काही वर्षात शेकडो पीडितांना मदत देण्यात आली आहे. तरूणींनी आत्मनिर्भर बनायला हवे. -ॲड. देवयानी किणगी, सोलापूर

पीडित महिला व बालकांना प्रतिष्ठा व आत्मविश्वास, पूर्वस्थिती परत मिळवून देण्याबरोबरच त्यांना मानसिक आघातातून बाहेर काढून त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी, एक नवी उमेद देण्यासाठी मनोधैर्य योजनेतून पीडितांना मदत केली जाते. अत्याचाराच्या अनेक प्रकरणात आरोपींना मोठी शिक्षा झाली आहे. -ॲड. स्वाती बिराजदार, सोलापूर

टॅग्स :Solapurसोलापूर