शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

आयोध्येत होणाऱ्या श्री राम मंदिरामागे राष्ट्र उभारणीची भावना : स्वामी गोविंददेव गिरी

By संताजी शिंदे | Updated: January 4, 2024 17:10 IST

विषमतारहित, आक्रमणरहित विकास म्हणजे हिंदुत्व या दृष्टिकोनातून रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेकडे पाहिले पाहिजे.

सोलापूर : वास्तविक पाहता राम मंदिराची उभारणी यापूर्वीच होणे अपेक्षित होते, मात्र पाचशे वर्षाचा संघर्ष व तीन लाख लोकांच्या बलिदानानंतर प्रभू श्री रामचंद्राची प्रतिष्ठापना व मंदिराचे उद्घाटन होत आहे. देशाची अस्मिता असलेल्या श्री राम मंदिर उभारणीच्या मागे एकजीव राष्ट्र उभारणीची भावना असल्याचे मत श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले.

विषमतारहित, आक्रमणरहित विकास म्हणजे हिंदुत्व या दृष्टिकोनातून रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेकडे पाहिले पाहिजे. आपले राष्ट्रपिता महात्मा गांधीजी हे देखील रामराज्य हा शब्द नेहमी वापरत असत. रामाच्या मुद्द्यावरून राजकारण होणे निश्चितच अपेक्षित नव्हते. देशभरातील लहान - लहान खेड्यांमधील  रामचंद्र भूमी न्यासाला मिळणारा प्रतिसाद पाहता संपूर्ण भारत सध्या राममय झाल्याचे त्यांनी सांगितले.

राम मंदिराची निर्मिती आणि २२ जानेवारी रोजी होत असलेल्या सुमूहुर्तावर होणारी रामलल्लांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना या घटनेला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे . त्याचप्रमाणे सामाजिक प्रयत्नही कारणीभूत असल्याचे स्वामीजींनी सांगितले.

अयोध्या ही मनूची राजधानी होती. त्यामुळे जगातील ही पहिली राजधानी असल्याचा उल्लेख करून स्वामीजी म्हणाले की, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्या शहराचा वेगाने विकास केला आहे. विमानतळ आणि रेल्वे स्थानकाचे उद्घाटन नुकतेच झाले असून एक सुनियोजित अयोध्या नगरी वसविण्याचे काम प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राम मंदिराच्या उभारण्यासाठी गेली पाचशे वर्षे करावा लागलेला संघर्ष आणि यासाठी तीन लाख लोकांनी दिलेली प्राणाची आहुती निश्चितच खेदजनक आहे . परंतु आता  रामलल्लाची मूर्ती स्वस्थानी प्रतिष्ठापित होत असल्याने निश्चितच समाधान असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरRam Mandirराम मंदिर