शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

आयोध्येत होणाऱ्या श्री राम मंदिरामागे राष्ट्र उभारणीची भावना : स्वामी गोविंददेव गिरी

By संताजी शिंदे | Updated: January 4, 2024 17:10 IST

विषमतारहित, आक्रमणरहित विकास म्हणजे हिंदुत्व या दृष्टिकोनातून रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेकडे पाहिले पाहिजे.

सोलापूर : वास्तविक पाहता राम मंदिराची उभारणी यापूर्वीच होणे अपेक्षित होते, मात्र पाचशे वर्षाचा संघर्ष व तीन लाख लोकांच्या बलिदानानंतर प्रभू श्री रामचंद्राची प्रतिष्ठापना व मंदिराचे उद्घाटन होत आहे. देशाची अस्मिता असलेल्या श्री राम मंदिर उभारणीच्या मागे एकजीव राष्ट्र उभारणीची भावना असल्याचे मत श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले.

विषमतारहित, आक्रमणरहित विकास म्हणजे हिंदुत्व या दृष्टिकोनातून रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेकडे पाहिले पाहिजे. आपले राष्ट्रपिता महात्मा गांधीजी हे देखील रामराज्य हा शब्द नेहमी वापरत असत. रामाच्या मुद्द्यावरून राजकारण होणे निश्चितच अपेक्षित नव्हते. देशभरातील लहान - लहान खेड्यांमधील  रामचंद्र भूमी न्यासाला मिळणारा प्रतिसाद पाहता संपूर्ण भारत सध्या राममय झाल्याचे त्यांनी सांगितले.

राम मंदिराची निर्मिती आणि २२ जानेवारी रोजी होत असलेल्या सुमूहुर्तावर होणारी रामलल्लांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना या घटनेला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे . त्याचप्रमाणे सामाजिक प्रयत्नही कारणीभूत असल्याचे स्वामीजींनी सांगितले.

अयोध्या ही मनूची राजधानी होती. त्यामुळे जगातील ही पहिली राजधानी असल्याचा उल्लेख करून स्वामीजी म्हणाले की, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्या शहराचा वेगाने विकास केला आहे. विमानतळ आणि रेल्वे स्थानकाचे उद्घाटन नुकतेच झाले असून एक सुनियोजित अयोध्या नगरी वसविण्याचे काम प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राम मंदिराच्या उभारण्यासाठी गेली पाचशे वर्षे करावा लागलेला संघर्ष आणि यासाठी तीन लाख लोकांनी दिलेली प्राणाची आहुती निश्चितच खेदजनक आहे . परंतु आता  रामलल्लाची मूर्ती स्वस्थानी प्रतिष्ठापित होत असल्याने निश्चितच समाधान असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरRam Mandirराम मंदिर