शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

आयोध्येत होणाऱ्या श्री राम मंदिरामागे राष्ट्र उभारणीची भावना : स्वामी गोविंददेव गिरी

By संताजी शिंदे | Updated: January 4, 2024 17:10 IST

विषमतारहित, आक्रमणरहित विकास म्हणजे हिंदुत्व या दृष्टिकोनातून रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेकडे पाहिले पाहिजे.

सोलापूर : वास्तविक पाहता राम मंदिराची उभारणी यापूर्वीच होणे अपेक्षित होते, मात्र पाचशे वर्षाचा संघर्ष व तीन लाख लोकांच्या बलिदानानंतर प्रभू श्री रामचंद्राची प्रतिष्ठापना व मंदिराचे उद्घाटन होत आहे. देशाची अस्मिता असलेल्या श्री राम मंदिर उभारणीच्या मागे एकजीव राष्ट्र उभारणीची भावना असल्याचे मत श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले.

विषमतारहित, आक्रमणरहित विकास म्हणजे हिंदुत्व या दृष्टिकोनातून रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेकडे पाहिले पाहिजे. आपले राष्ट्रपिता महात्मा गांधीजी हे देखील रामराज्य हा शब्द नेहमी वापरत असत. रामाच्या मुद्द्यावरून राजकारण होणे निश्चितच अपेक्षित नव्हते. देशभरातील लहान - लहान खेड्यांमधील  रामचंद्र भूमी न्यासाला मिळणारा प्रतिसाद पाहता संपूर्ण भारत सध्या राममय झाल्याचे त्यांनी सांगितले.

राम मंदिराची निर्मिती आणि २२ जानेवारी रोजी होत असलेल्या सुमूहुर्तावर होणारी रामलल्लांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना या घटनेला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे . त्याचप्रमाणे सामाजिक प्रयत्नही कारणीभूत असल्याचे स्वामीजींनी सांगितले.

अयोध्या ही मनूची राजधानी होती. त्यामुळे जगातील ही पहिली राजधानी असल्याचा उल्लेख करून स्वामीजी म्हणाले की, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्या शहराचा वेगाने विकास केला आहे. विमानतळ आणि रेल्वे स्थानकाचे उद्घाटन नुकतेच झाले असून एक सुनियोजित अयोध्या नगरी वसविण्याचे काम प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राम मंदिराच्या उभारण्यासाठी गेली पाचशे वर्षे करावा लागलेला संघर्ष आणि यासाठी तीन लाख लोकांनी दिलेली प्राणाची आहुती निश्चितच खेदजनक आहे . परंतु आता  रामलल्लाची मूर्ती स्वस्थानी प्रतिष्ठापित होत असल्याने निश्चितच समाधान असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरRam Mandirराम मंदिर