शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

महापरिनिर्वाण दिन : सोलापूरच्या मिलिंदनगरामधील महामानवाच्या अस्थिमंदिराला ६२ वर्षे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 14:24 IST

महापरिनिर्वाण दिन : अभिवादन करण्यासाठी मुंबई-नागपूरनंतर सोलापुरातील प्रेरणाभूमी म्हणजे हक्काचे ठिकाण

सोलापूर : समस्त अस्पृश्य समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी ज्यांनी आयुष्यात मोठा संघर्ष उभा केला त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या हयातीत सोलापूरला ११ वेळा भेट दिली. भविष्यातील चळवळीचे अनेक धोरणात्मक निर्णय थोरला राजवाड्यातील पंचाच्या चावडीत घेऊन कालांतराने त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणीही केली होती. त्याच ठिकाणी आज अस्तित्वात असलेल्या अस्थिविहाराला ६२ वर्षे पूर्ण होत आहेत़ मुंबई, नागपूर नंतर अभिवादन करण्यासाठी एक हक्काचे ठिकाण म्हणून अस्थिविहार प्रेरणाभूमीकडे पाहिले जाते. 

६ डिसेंबर १९५६ साली मुंबई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाले. पांजरापोळ चौकातील सी. नरसी ट्रान्स्पोर्टमध्ये निरोप आला. ही बातमी वाºयासारखी संपूर्ण शहर व जिल्ह्यात पसरली. तुकाराम (बुवा) इंगळे, केरू जाधव, अण्णासाहेब कदम, रामचंद्र जाधव, भीमराव सरवदे, एन. एस. कांबळे, लक्ष्मण आबुटे, मेसा सिद्धगणेश, दºयाप्पा जाधव, रामचंद्र रणशृंगारे, शिंदे गुरुजी आदी कार्यकर्ते मुंबईला रवाना झाले. दि. ७ डिसेंबर रोजी लाखो समाजबांधवांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना निरोप देण्यात आला. 

तुकाराम (बुवा) इंगळे हे बाबासाहेबांच्या ‘प्रबुद्ध भारत’ या दैनिकाचे जिल्हा वितरक होते. त्यामुळे त्यांचे भैय्यासाहेब उर्फ यशवंतराव यांच्याशी घनिष्ठ संबंध होते. त्यांनी बाबासाहेबांच्या अस्थी सोलापूरला घेऊन जाण्याचा आग्रह धरला, त्यासाठी ते चार दिवस मुंबईमध्येच राहिले. त्यानंतर दि. ११ डिसेंबर १९५६ साली या अस्थी सकाळी ८ वाजता मद्रास मेलने मुंबईहून सोलापुरात आणण्यात आल्या. रेल्वे स्टेशनबाहेर सुमारे ५ ते ६ हजार जनसमुदाय उपस्थित होता. दलित फेडरेशनच्या वतीने सकाळी ९ वाजता फॉरेस्ट विभागातील शाळा नं. १० पासून डॉ. आंबेडकरांच्या अस्थींची मिरवणूक निघाली. ज्यांना मुंबई येथे जाता आले नाही त्यांनी या मिरवणुकीत सहभाग घेऊन दुखवटा व्यक्त केला. सुमारे २५ ते ३0 हजार जनसमुदाय मिरवणुकीमध्ये होता. बुद्धम्, सरणम् गच्छामी...धम्मम् सरणम् गच्छामी... अशी प्रार्थना म्हणत सोलापुरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीची सांगता पांजरापोळ चौकात झाली आणि याच ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 

बाबा बाबरे यांनी मांडली होती अस्थिविहाराची संकल्पना- भीम प्रतिष्ठानचे संस्थापक बाबा बाबरे हे २000 साली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाचे व थोरला मंगळवेढा तालमीचे अध्यक्ष होते. त्यांनी भव्य अस्थिमंदिर बांधण्याची संकल्पना व्यक्त केली होती. तत्कालीन खासदार सुशीलकुमार शिंदे यांना सांगून खासदार निधीतून फंड मंजूर करून घेतला. बांधकाम झाले, मात्र काही कारणास्तव ते अपूर्ण राहिले. कालांतराने नगरसेवक आनंद चंदनशिवे हे निवडून आल्यानंतर त्यांनी अस्थिविहार पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. भव्य आणि दिव्य अशा अस्थिमंदिराची निर्मिती झाली. आज या अस्थी ‘एससी’ (एअर कोल्ड) वातावरणात ठेवण्यात आल्या आहेत. अस्थिविहारात आनंद चंदनशिवे यांनी भीमसृष्टी निर्माण करून बाबासाहेबांचा इतिहास कोरला आहे. ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी महार वतनदार परिषद घेतली होती त्या पंचाच्या चावडीत २६/२७ नोव्हेंबर १९२७ रोजीच्या दुर्मिळ फोटोचे ब्रांझ शिल्प बसवून आंबेडकरांचा इतिहास जोपासला आहे.

परिसरात अशोक स्तंभ, घटनेचा सारनामा : चंदनशिवे

- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अस्थिमंदिर हे समाजात श्रद्धास्थान आहे. या परिसरात अशोक स्तंभ आणि भारतीय राज्यघटनेचा सारनामा उभारण्यात येणार आहे. अस्थिविहार प्रेरणाभूमीला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्यासाठी मी पाठपुरावा करीत आहे, मात्र प्रशासनाच्या उदासीनतेमुळे हे काम मागे पडत आहे. भविष्यात यासाठी राज्य आणि केंद्राच्या पातळीवर पाठपुरावा करून राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळवणार आहे. शहर व जिल्ह्यातील समाजबांधवांनी अभिवादनासाठी अस्थिविहार प्रेरणाभूमी येथे यावे व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिमंदिरात अभिवादन करावे, असे आवाहन बसपाचे गटनेते आनंद चंदनशिवे यांनी केले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर