शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

उजनी धरणातून उन्हाळी आवर्तनास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:21 IST

भीमानगर : उजनी धरणातून भीमा नदी, कालवा, भीमा-सीना बोगद्यातून पिण्यासाठी व शेतीसाठी पाण्याच्या उन्हाळी पहिल्या आवर्तनास शनिवारी सुरुवात झाल्याची ...

भीमानगर : उजनी धरणातून भीमा नदी, कालवा, भीमा-सीना बोगद्यातून पिण्यासाठी व शेतीसाठी पाण्याच्या उन्हाळी पहिल्या आवर्तनास शनिवारी सुरुवात झाल्याची माहिती जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी दिली.

२०२०च्या पावसाळ्यात १५ ऑक्टोबर रोजी उजनी धरणात १२३.२८ टीएमसी पाणीसाठा करण्यात आलेला होता. १९ जानेवारीपासून रब्बी हंगामातील नदी, कालवा, बोगदा व सिंचन योजनांचे एक आवर्तन झाले. २७ फेब्रुवारी रोजी हे आवर्तन बंद झाल्यानंतर धरणात ६८ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. शनिवारी सकाळी १० वाजता उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यात आले. सोलापूर महापालिका आयुक्ताकडून पाटबंधारे खात्यास मिळालेल्या पत्रानुसार, टाकळी बंधाऱ्यात २७ टीएमसी पाणी असून ते मार्चपर्यंत सोलापूर शहराला पुरेल एवढा साठा आहे.

---

३१ मार्चपर्यंत टाकळीत पाणी

त्याचप्रमाणे पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, भीमा नदी काठावरील अनेक गावे, वाड्या वस्त्यांना पाण्याची आवश्यकता असल्याने धरणाच्या दोन दरवाजांतून शनिवारी प्रथम एक हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. वीजनिर्मितीसाठी १६५० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. २२ मार्चच्या सकाळपर्यंत धरणाच्या दहा ते बारा दरवाजांमधून सहा हजार क्युसेक पाणी नदी प्रवाह सोडण्यात येत आहे. हे पाणी भीमा नदीतील २४२ किलोमीटर अंतर पार करून व १४ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे ओलांडून २७ किंवा २८ मार्चपर्यंत टाकळी बंधाऱ्यात पोहोचेल. नंतर ३० किंवा ३१ मार्चपर्यंत टाकळी व चिंचपूर हे दोन्ही बंधारे भरून घेण्यात येणार आहेत. ३१ मार्च रोजी नदीत पाणी सोडणे बंद करण्यात येणार आहे.

मुख्य कालवा शेवरे (माढा) येथे वीस किलोमीटरपर्यंत असून तेथून उजव्या कालव्यात १२१ किलोमीटरपर्यंत, तर डाव्या कालव्यात १२६ किलोमीटरपर्यंत शेतीसाठी पाणी सोडण्यात येत आहे. उजव्या कालव्यावरून माळशिरस (पश्चिम भाग), पंढरपूर (पश्चिम- दक्षिण भाग), सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील एकूण २ लाख हेक्टर लाभक्षेत्राला पाणी मिळते. डाव्या कालव्यातून माढा, पंढरपूर (उत्तर- पश्चिम भाग), मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व अक्कलकोटपर्यंत एकूण ३ लाख हेक्टर लाभक्षेत्राला पाणी मिळणार आहे.

---

३४ हजार हेक्‍टर लाभ क्षेत्राला पाणीपुरवठा

सध्या सीना-माढा व दहिगाव उपसा सिंचन योजना चालू आहे. सीना- माढासाठी दररोज २५९ क्युसेक व दहिगावसाठी १०५ क्युसेक पाणी वापरण्यात येत आहे. सीना -माढावरून माढा तालुक्यातील १२ हजार हेक्‍टर क्षेत्राला, तर दहिगावमधून २००० हेक्टरला पाणी मिळत आहे. बॅक वॉटरमधून माढा, करमाळा, कर्जत, श्रीगोंदा (अहमदनगर), दौंड, इंदापूर( पुणे) या तालुक्यातील एकूण ३४ हजार हेक्‍टर लाभ क्षेत्राला पाणीपुरवठा होतो आहे.