शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

उजनी धरणातून उन्हाळी आवर्तनास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:21 IST

भीमानगर : उजनी धरणातून भीमा नदी, कालवा, भीमा-सीना बोगद्यातून पिण्यासाठी व शेतीसाठी पाण्याच्या उन्हाळी पहिल्या आवर्तनास शनिवारी सुरुवात झाल्याची ...

भीमानगर : उजनी धरणातून भीमा नदी, कालवा, भीमा-सीना बोगद्यातून पिण्यासाठी व शेतीसाठी पाण्याच्या उन्हाळी पहिल्या आवर्तनास शनिवारी सुरुवात झाल्याची माहिती जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी दिली.

२०२०च्या पावसाळ्यात १५ ऑक्टोबर रोजी उजनी धरणात १२३.२८ टीएमसी पाणीसाठा करण्यात आलेला होता. १९ जानेवारीपासून रब्बी हंगामातील नदी, कालवा, बोगदा व सिंचन योजनांचे एक आवर्तन झाले. २७ फेब्रुवारी रोजी हे आवर्तन बंद झाल्यानंतर धरणात ६८ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. शनिवारी सकाळी १० वाजता उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यात आले. सोलापूर महापालिका आयुक्ताकडून पाटबंधारे खात्यास मिळालेल्या पत्रानुसार, टाकळी बंधाऱ्यात २७ टीएमसी पाणी असून ते मार्चपर्यंत सोलापूर शहराला पुरेल एवढा साठा आहे.

---

३१ मार्चपर्यंत टाकळीत पाणी

त्याचप्रमाणे पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, भीमा नदी काठावरील अनेक गावे, वाड्या वस्त्यांना पाण्याची आवश्यकता असल्याने धरणाच्या दोन दरवाजांतून शनिवारी प्रथम एक हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. वीजनिर्मितीसाठी १६५० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. २२ मार्चच्या सकाळपर्यंत धरणाच्या दहा ते बारा दरवाजांमधून सहा हजार क्युसेक पाणी नदी प्रवाह सोडण्यात येत आहे. हे पाणी भीमा नदीतील २४२ किलोमीटर अंतर पार करून व १४ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे ओलांडून २७ किंवा २८ मार्चपर्यंत टाकळी बंधाऱ्यात पोहोचेल. नंतर ३० किंवा ३१ मार्चपर्यंत टाकळी व चिंचपूर हे दोन्ही बंधारे भरून घेण्यात येणार आहेत. ३१ मार्च रोजी नदीत पाणी सोडणे बंद करण्यात येणार आहे.

मुख्य कालवा शेवरे (माढा) येथे वीस किलोमीटरपर्यंत असून तेथून उजव्या कालव्यात १२१ किलोमीटरपर्यंत, तर डाव्या कालव्यात १२६ किलोमीटरपर्यंत शेतीसाठी पाणी सोडण्यात येत आहे. उजव्या कालव्यावरून माळशिरस (पश्चिम भाग), पंढरपूर (पश्चिम- दक्षिण भाग), सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील एकूण २ लाख हेक्टर लाभक्षेत्राला पाणी मिळते. डाव्या कालव्यातून माढा, पंढरपूर (उत्तर- पश्चिम भाग), मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व अक्कलकोटपर्यंत एकूण ३ लाख हेक्टर लाभक्षेत्राला पाणी मिळणार आहे.

---

३४ हजार हेक्‍टर लाभ क्षेत्राला पाणीपुरवठा

सध्या सीना-माढा व दहिगाव उपसा सिंचन योजना चालू आहे. सीना- माढासाठी दररोज २५९ क्युसेक व दहिगावसाठी १०५ क्युसेक पाणी वापरण्यात येत आहे. सीना -माढावरून माढा तालुक्यातील १२ हजार हेक्‍टर क्षेत्राला, तर दहिगावमधून २००० हेक्टरला पाणी मिळत आहे. बॅक वॉटरमधून माढा, करमाळा, कर्जत, श्रीगोंदा (अहमदनगर), दौंड, इंदापूर( पुणे) या तालुक्यातील एकूण ३४ हजार हेक्‍टर लाभ क्षेत्राला पाणीपुरवठा होतो आहे.