शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

दोन महिन्यांपासून ऊसतोड कामगारांना डांबून ठेवले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:25 IST

याबाबत अधिक माहिती अशी की, जालना येथील घुले व अतागळे ही दोन ऊसतोड कामगार कुटुंबे दोन वर्षांपासून ऊसतोडणीसाठी माढा ...

याबाबत अधिक माहिती अशी की, जालना येथील घुले व अतागळे ही दोन ऊसतोड कामगार कुटुंबे दोन वर्षांपासून ऊसतोडणीसाठी माढा तालुक्यातील बादलेवाडी येथील भरत त्रिंबक आलदर यांच्याकडे मजूर म्हणून येत होती. परंतु चालू वर्षीचा गळीत हंगाम संपून दोन महिने झाले तरी भरत आलदर हा शेतकरी घुले व अतागळे या दोन कुटुंबीयांना त्यांच्या गावाकडे जाऊ देत नव्हता. त्यांना बंदिस्त करून शेतावरच ठेवले होते. त्यांच्याकडून पडेल ते काम करून घेऊन त्यांना फक्त जेवणापुरते पैसे दिले जात होते.

२० मे रोजी बंदिस्त कुटुंबातील मारिया बबलू घुले (३८) या महिलेने आजारी असल्याचा बहाणा करून दवाखान्यात जाऊन येतो म्हणून मारिया घुले, तिची आई शीलाबाई व ९ वर्षांचा मुलगा पवन हे तिघे टेंभुर्णीला आले व तेथून त्यांनी जालना गाठले.

जालना येथे गेल्यानंतर हा प्रकार नातेवाईकांना सांगितला. नातेवाइकांनी मारियाला घेऊन शनिवार २२ मे रोजी जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांचे संपर्क कार्यालय गाठले व घडलेला प्रकार त्यांना सांगितला. त्यानुसार आमदार गोरंट्याल यांनी पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांच्याशी संपर्क साधला. अधीक्षकांच्या सूचनेवरून जालना पोलीस ठाण्यात मारिया घुले यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

पथक रवाना

जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास सोनवले यांच्या नेतृत्वाखाली एक पोलीस पदक शनिवारीच टेंभुर्णीकडे पाठवले. सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवले पथकासह रात्रीचा प्रवास करून पहाटे तीन ३ वाजता टेंभुर्णी पोलीस ठाण्यात दाखल झाले. तेथे टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे हवालदार हेड कॉन्स्टेबल बिरू मारकड यांना बरोबर घेऊन जालना पोलिसांचे पथक पहाटे ५ वाजता बादलेवाडी येथील भरत आलदर यांच्या शेतात दाखल झाले. तेव्हा भरत आलदर हे झोपेतच होते. पथकातील पोलिसांनी त्यांंना झोपेतून उठवून ताब्यात घेतले. नंतर पोलिसांनी बंदिस्त करून ठेवलेल्या ऊसतोड कामगारांच्या ९ सदस्यांची सुटका केली व त्यांना घेऊन पोलीस पथक जालन्याकडे रवाना झाले.

यांची झाली सुटका

बबलू गणेश घुले (वय ४० ), मारिया बबलू घुले (वय ३८), सोनाली बबलू घुले (१६), नेहा बबलू घुले (१३), अजय राजाभाऊ अतागळे (३७ ), रेश्मा अजय अतागळे (२३), आराधना अजय अतागळे (६), अर्चना अजय अतागळे (३) व दादा अजय अतागळे (दीड वर्ष).

---

सासरा-जावयास अटक

भारत त्रिंबक आलदर (रा. बादलेवाडी) या शेतकऱ्याचे सासरे दिगंबर आसाराम माने (रा. कवड गावथडी ता. अंबड, जि. जालना) यांनी हे मजूर आलदर यांच्याकडे पाठविले होते. या ऊसतोड मजुरांना चालू गळीत हंगाम संपून दोन महिने झाले तरी गावाकडे जाऊ दिले जात नव्हते. त्यांना दमदाटी करून व पळून जाण्याचा प्रयत्न केल्यास जेसीबीने पुरून टाकू अशी धमकी देऊन बंदिस्त करून ठेवले होते.

टेंभुर्णी पोलिसांनी भरत त्रिंबक आलदर व दिगंबर आसाराम माने या सासरे जावयांना शनिवारी अटक केली आहे. पुढील तपास टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे हवालदार बिरू मार्कड करीत आहेत.

-----

२४टेंभुर्णी

बादलेवाडी येथून सुटका केलेले ऊस तोड कामगार कुटुंबीय.