शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

कोरोना महामारीला वेशीवर रोखण्यात सोलापूर जिल्ह्यातील ७३ गावांना यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 15:44 IST

 दुसऱ्या लाटेत १३९ गावांना कोरोनाने गाठले

राजकुमार सारोळे

सोलापूर : कोरोनाच्या पहिल्या लाटेत जिल्ह्यातील एक हजार १३४ गावे व वाड्या-वस्त्यांपैकी २१२ गावांनी कोरोनाला वेशीवर रोखण्यात यश मिळविले होते; पण दुसऱ्या लाटेत यातील १३९ गावात कोरोनाने शिरकाव केल्याचे दिसून येत आहे, तर ७३ गावांनी या महामारीला वेशीवरच रोखले आहे.

  देशात मार्च २०२०मध्ये कोरोना महामारीला सुरुवात झाली; पण २३ एप्रिलपर्यंत सोलापूर जिल्हा कोरोनामुक्त होता. १२ एप्रिल रोजी शहरात पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर शहराच्या संपर्कातून १२ दिवसांनी म्हणजे २४ एप्रिल रोजी ग्रामीण भागात पहिला रुग्ण आढळला. दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी येथील बेदाणा शेडवर काम करणारा कामगार गावी म्हणजे मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे पोहोचल्यावर कोरोनाग्रस्त आढळला होता. त्यामुळे ११ एप्रिल रोजी ग्रामीणमधील वांगी हे पहिले प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले होते. पण तपासणीत या भागात रुग्ण आढळला नाही. त्यानंतर पाटकुल येथील महिलेला कोरोनाची लागण झाली. तेथून ग्रामीण भागात रुग्ण वाढत गेले.

 ४ ऑक्टोबरपर्यंत २१२ गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले होते. त्यानंतर संसर्ग कमी होत गेला. फेब्रुवारी २०२१नंतर ग्रामीण भागात पुन्हा कोरोना संसर्ग वाढला. 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषद