शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

सोलापूर विद्यापीठाचा विद्यार्थी कौशल्यपूर्ण असणार - मृणालिनी फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 12:03 IST

मुख्य इमारत बांधून विद्यापीठाला एक नवा चेहरा देण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती नूतन कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी लोकमतशी बोलताना दिली. 

ठळक मुद्देयुवा महोत्सव हा विद्यार्थ्यांच्या आवडीचा इव्हेंट - कुलगुरूविद्यार्थ्याला केवळ डिग्री महत्वाची नसून संबंधित विषयाचे सखोल ज्ञान असणे आवश्यक- कुलगुरूसोलापूर विद्यापीठात काम करण्याची खूप संधी - कुलगुरू

संताजी शिंदेसोलापूर : जिल्ह्यापुरते मर्यादित असलेल्या सोलापूर विद्यापीठात केवळ पदवी न घेता प्रत्येक विद्यार्थी ज्ञान आणि कौशल्यपूर्ण शिक्षण घेऊन बाहेर पडला पाहिजे. मुख्य इमारत बांधून विद्यापीठाला एक नवा चेहरा देण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती नूतन कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी लोकमतशी बोलताना दिली. 

डॉ. मृणालिनी फडणवीस म्हणाल्या की, महाराष्ट्रात प्रथमत: १ आॅगस्ट २0१४ रोजी जिल्ह्यापुरते मर्यादित असलेल्या सोलापूर विद्यापीठाची स्थापना झाली होती, तेव्हा मला खूप समाधान वाटले होते. ३५ वर्षांचा शैक्षणिक क्षेत्रातील कामाचा अनुभव असल्याने त्याचा उपयोग उच्च पातळीवरील शिक्षणासाठी करण्याची इच्छा होती. सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू पदाची जाहिरात निघाली आणि मी अर्ज केला. मोठ्या आत्मविश्वासाने मी मुलाखतीला सामोरे गेले. माझी निवड झाली आणि एका जिल्ह्यापुरते मर्यादित असलेल्या विद्यापीठात काम करण्याची संधी मिळत असल्याने आनंद झाला. 

मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व अन्य महाराष्ट्रातील १२ विद्यापीठांच्या तुलनेत सोलापूर विद्यापीठात काम करण्याची खूप संधी आहे. विद्यार्थीकेंद्रित विद्यापीठावर आपला भर असणार असून, या ठिकाणी वेगवेगळे कोर्सेस चालवण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. विद्यापीठात भाषा विषय असला पाहिजे त्यात प्रामुख्याने मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू यांचा समावेश असेल. टेक्नॉलॉजीचा स्वतंत्र विभाग करण्यावर माझा भर असणार आहे. 

विद्यार्थ्यांना अधिकाधिक फायदे कसे मिळतील याचे नियोजन करून, कौशल्य विकासावर आधारित कार्यशाळा घेणे, परिसंवाद इतके जरी केले तरी खूप मोठा बदल होईल. विद्यार्थ्यांची कोणतीही समस्या असेल तर ती सोडवण्याला प्राधान्य दिले जाईल. प्राध्यापकांच्या योजना राबविणे आणि विद्यार्थ्यांच्या विकासावर सातत्याने मार्गदर्शन करणे, ग्रामीण भागातील विद्यार्थी  पुढे आणण्यासाठी प्रयत्न असणार आहे. विद्यापीठाचा सर्वांगीण विकास करीत असताना पाश्चात्यांचे अनुकरण  न करता भारतीय संस्कृती जोपासणे तितकेच आवश्यक आहे, असेही यावेळी कुलगुरू   डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांची मानसिकता बदलण्याची गरज...- आधुनिक युगात स्पर्धा खूप वाढली आहे. या स्पर्धेत विद्यार्थी टिकला पाहिजे यासाठी दर्जेदार शिक्षण दिले पाहिजे या मताची मी आहे. राज्यपातळीवर नव्हे तर देशपातळीवर विद्यापीठाची चमक दाखवण्यासाठी संपूर्ण ज्ञानाने परिपूर्ण विद्यार्थी या विद्यापीठात घडला पाहिजे. विद्यार्थ्याला केवळ डिग्री महत्वाची नसून संबंधित विषयाचे सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मानसिकता बदलण्याची गरज आहे, असा सल्ला यावेळी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिला. 

- प्रतिवर्षी युवा महोत्सवाबाबत निर्माण होणाºया अडचणीबाबत विचारले असता डॉ. मृणालिनी फडणवीस म्हणाल्या की, हा प्रश्न महाराष्ट्रातील अन्य विद्यापीठातही आहे. युवा महोत्सव हा विद्यार्थ्यांच्या आवडीचा इव्हेंट असून त्यासाठी माहिती घेऊन मार्ग काढला जाईल. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur University, Solapurसोलापूर विद्यापीठ, सोलापूर