शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

सशक्त मन हीच आनंदाची गुरूकिल्ली : राजा माने,  स्व. अरविंदभाई जव्हेरी व्याख्यानमालेत दिला ‘कसं जगण्याचा’ कानमंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 14:25 IST

‘जगायचं कसं’ ही तुमची-आमची समस्या नसून जगाची अस्वस्थता आहे. जग हे तणावाकडे चालले असून, त्यातून मार्ग काढण्यासाठी मन सशक्त ठेवून आपले काम आणि जबाबदारी निष्ठेने पार पाडली तरच आपल्याला जगण्याचा मार्ग सापडतो,

ठळक मुद्दे२२२ देशात तणावाची परिस्थिती असून, भारत १२१ व्या स्थानी जगात घडणाºया घडामोडींचा आपल्या मनावर निश्चित परिणाम होत असतो जगातील घडामोडींकडे सकारात्मक नजरेने पाहिले तर आपल्याला जगण्याचा मार्ग निश्चितच सापडेल

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ११ : ‘जगायचं कसं’ ही तुमची-आमची समस्या नसून जगाची अस्वस्थता आहे. जग हे तणावाकडे चालले असून, त्यातून मार्ग काढण्यासाठी मन सशक्त ठेवून आपले काम आणि जबाबदारी निष्ठेने पार पाडली तरच आपल्याला जगण्याचा मार्ग सापडतो, असे प्रतिपादन ‘लोकमत’चे संपादक राजा माने यांनी रविवारी केले. गुजराती मित्रमंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या स्व. अरविंदभाई जव्हेरी व्याख्यानमालेत ‘सांगा जगायचं कसं‘ या विषयावर ते बोलत होते. यावेळी मंचावर मंडळाचे अध्यक्ष विजयभाई पटेल, मणिकांत दंड, संदीप जव्हेरी उपस्थित होते. माने पुढे म्हणाले, जगातील घडामोडी पाहता जग हे तणावग्रस्त झाल्याचे दिसते. जागतिक ह्युमन हॅपीनेसच्या अहवालानुसार २२२ देशात तणावाची परिस्थिती असून, भारत १२१ व्या स्थानी आहे. जगात घडणाºया घडामोडींचा आपल्या मनावर निश्चित परिणाम होत असतो. आणि आपले मन अस्वस्थ होते. देशात जी स्थित्यंतरे अथवा राजकीय उलथापालथ झाल्या त्यालाही भारतीयांची मानसिकताच कारणीभूत आहे. सध्याची मोदी लाट ही सुध्दा ताजे उदाहरण म्हणता येईल. देशात गेल्या काही दिवसात घडलेल्या हत्या, आर्थिक निर्णय, आंतरराष्टÑीय घडामोडी, नोटाबंदी, जीएसटी याबरोबरच आपल्या गावात घडणाºया छोट्या-मोठ्या घटना यासारख्या गोष्टींनी निश्चितच आपले मन विचलित झाले असल्याचे सांगून आपण काय काम करतो आणि आपली जबाबदारी काय आहे यांची सांगड घालून आपली कृती करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. आपण कुटुंबप्रमुख, आई, वडील, पती, पत्नी कोणत्याही भूमिकेत असाल तरी ती भूमिका जबाबदारीने आणि निष्ठेने पार पाडतो का? यावर विचारमंथन करुन ती पार पाडल्याशिवाय आपल्याला आनंद सापडणार नाही. आपण एखाद्या घटनेकडे किती सकारात्मक व नकारात्मक दृष्टीने पाहतो त्याच्या दुपटीने आपणाला तसाच प्रतिसाद मिळतो. यासाठी आपण जगातील घडामोडींकडे सकारात्मक नजरेने पाहिले तर आपल्याला जगण्याचा मार्ग निश्चितच सापडेल, असे राजा माने म्हणाले. प्रारंभी मणिकांत दंड यांनी प्रास्ताविक केले. अ‍ॅड. जे. जे. कुलकर्णी यांनी परिचय करून दिला; तर संदीप जव्हेरी यांनी आभार मानले. यावेळी गुजराती मित्रमंडळाचे उपाध्यक्ष मुकेश मेहता, खजिनदार चिमणभाई पटेल, विश्वस्त प्रवीणभाई वोरा, मनुभाई सोनछत्रा, कांताभाई पटेल, जयेश पटेल, संजय शाह, भरत ब्रह्मभट्ट, इंदिरा पटेल, हसुमती जव्हेरी, युवा फोरमचे अध्यक्ष, सदस्य तसेच किशोर चंडक, राजशेखर येळीकर, राज मिणियार, राजगोपाल झंवर, प्रा. राजशेखर येळीकर, गुरूराज येल्लटी, नरेंद्र पुजारी, जगदीश रांभिया, दीपक पाटील, केतनभाई शहा, रविकिरण पोरे,अनिल विपत, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष नल्लामंदू, रवींद्र जोगीपेठकर आदी उपस्थित होते.---------------संघवी यांच्या विनोदी किस्स्यांना दादविख्यात गुजराती साहित्यिक चंद्रकांत संघवी यांच्या विनोदी किस्स्यांनी आज श्रोत्यांना मनमुराद हसविले. समाजात वावरताना त्यांनी केलेल्या निरीक्षणाच्या आधारावर असलेल्या या किस्स्यांना दाद मिळाली. स्व. अरविंदभाई जव्हेरी व्याख्यानमालेत सकाळी संघवी यांचे ‘हसता हसता क्यारेक’ या विषयावर गुजरातीमधून व्याख्यान झाले. यावेळी संघवी यांच्या ‘आडी सोय’, ‘चला मुरारी हिरो बनने’ या दोन गुजराती साहित्यकृतींचे प्रकाशन झाले.