शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

सशक्त मन हीच आनंदाची गुरूकिल्ली : राजा माने,  स्व. अरविंदभाई जव्हेरी व्याख्यानमालेत दिला ‘कसं जगण्याचा’ कानमंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 14:25 IST

‘जगायचं कसं’ ही तुमची-आमची समस्या नसून जगाची अस्वस्थता आहे. जग हे तणावाकडे चालले असून, त्यातून मार्ग काढण्यासाठी मन सशक्त ठेवून आपले काम आणि जबाबदारी निष्ठेने पार पाडली तरच आपल्याला जगण्याचा मार्ग सापडतो,

ठळक मुद्दे२२२ देशात तणावाची परिस्थिती असून, भारत १२१ व्या स्थानी जगात घडणाºया घडामोडींचा आपल्या मनावर निश्चित परिणाम होत असतो जगातील घडामोडींकडे सकारात्मक नजरेने पाहिले तर आपल्याला जगण्याचा मार्ग निश्चितच सापडेल

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ११ : ‘जगायचं कसं’ ही तुमची-आमची समस्या नसून जगाची अस्वस्थता आहे. जग हे तणावाकडे चालले असून, त्यातून मार्ग काढण्यासाठी मन सशक्त ठेवून आपले काम आणि जबाबदारी निष्ठेने पार पाडली तरच आपल्याला जगण्याचा मार्ग सापडतो, असे प्रतिपादन ‘लोकमत’चे संपादक राजा माने यांनी रविवारी केले. गुजराती मित्रमंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या स्व. अरविंदभाई जव्हेरी व्याख्यानमालेत ‘सांगा जगायचं कसं‘ या विषयावर ते बोलत होते. यावेळी मंचावर मंडळाचे अध्यक्ष विजयभाई पटेल, मणिकांत दंड, संदीप जव्हेरी उपस्थित होते. माने पुढे म्हणाले, जगातील घडामोडी पाहता जग हे तणावग्रस्त झाल्याचे दिसते. जागतिक ह्युमन हॅपीनेसच्या अहवालानुसार २२२ देशात तणावाची परिस्थिती असून, भारत १२१ व्या स्थानी आहे. जगात घडणाºया घडामोडींचा आपल्या मनावर निश्चित परिणाम होत असतो. आणि आपले मन अस्वस्थ होते. देशात जी स्थित्यंतरे अथवा राजकीय उलथापालथ झाल्या त्यालाही भारतीयांची मानसिकताच कारणीभूत आहे. सध्याची मोदी लाट ही सुध्दा ताजे उदाहरण म्हणता येईल. देशात गेल्या काही दिवसात घडलेल्या हत्या, आर्थिक निर्णय, आंतरराष्टÑीय घडामोडी, नोटाबंदी, जीएसटी याबरोबरच आपल्या गावात घडणाºया छोट्या-मोठ्या घटना यासारख्या गोष्टींनी निश्चितच आपले मन विचलित झाले असल्याचे सांगून आपण काय काम करतो आणि आपली जबाबदारी काय आहे यांची सांगड घालून आपली कृती करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. आपण कुटुंबप्रमुख, आई, वडील, पती, पत्नी कोणत्याही भूमिकेत असाल तरी ती भूमिका जबाबदारीने आणि निष्ठेने पार पाडतो का? यावर विचारमंथन करुन ती पार पाडल्याशिवाय आपल्याला आनंद सापडणार नाही. आपण एखाद्या घटनेकडे किती सकारात्मक व नकारात्मक दृष्टीने पाहतो त्याच्या दुपटीने आपणाला तसाच प्रतिसाद मिळतो. यासाठी आपण जगातील घडामोडींकडे सकारात्मक नजरेने पाहिले तर आपल्याला जगण्याचा मार्ग निश्चितच सापडेल, असे राजा माने म्हणाले. प्रारंभी मणिकांत दंड यांनी प्रास्ताविक केले. अ‍ॅड. जे. जे. कुलकर्णी यांनी परिचय करून दिला; तर संदीप जव्हेरी यांनी आभार मानले. यावेळी गुजराती मित्रमंडळाचे उपाध्यक्ष मुकेश मेहता, खजिनदार चिमणभाई पटेल, विश्वस्त प्रवीणभाई वोरा, मनुभाई सोनछत्रा, कांताभाई पटेल, जयेश पटेल, संजय शाह, भरत ब्रह्मभट्ट, इंदिरा पटेल, हसुमती जव्हेरी, युवा फोरमचे अध्यक्ष, सदस्य तसेच किशोर चंडक, राजशेखर येळीकर, राज मिणियार, राजगोपाल झंवर, प्रा. राजशेखर येळीकर, गुरूराज येल्लटी, नरेंद्र पुजारी, जगदीश रांभिया, दीपक पाटील, केतनभाई शहा, रविकिरण पोरे,अनिल विपत, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष नल्लामंदू, रवींद्र जोगीपेठकर आदी उपस्थित होते.---------------संघवी यांच्या विनोदी किस्स्यांना दादविख्यात गुजराती साहित्यिक चंद्रकांत संघवी यांच्या विनोदी किस्स्यांनी आज श्रोत्यांना मनमुराद हसविले. समाजात वावरताना त्यांनी केलेल्या निरीक्षणाच्या आधारावर असलेल्या या किस्स्यांना दाद मिळाली. स्व. अरविंदभाई जव्हेरी व्याख्यानमालेत सकाळी संघवी यांचे ‘हसता हसता क्यारेक’ या विषयावर गुजरातीमधून व्याख्यान झाले. यावेळी संघवी यांच्या ‘आडी सोय’, ‘चला मुरारी हिरो बनने’ या दोन गुजराती साहित्यकृतींचे प्रकाशन झाले.