शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
2
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
3
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
4
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
5
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
6
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
7
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
8
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
9
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
10
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
11
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
12
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
13
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
14
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
15
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
16
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
17
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
18
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
19
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
20
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा

सशक्त मन हीच आनंदाची गुरूकिल्ली : राजा माने,  स्व. अरविंदभाई जव्हेरी व्याख्यानमालेत दिला ‘कसं जगण्याचा’ कानमंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 14:25 IST

‘जगायचं कसं’ ही तुमची-आमची समस्या नसून जगाची अस्वस्थता आहे. जग हे तणावाकडे चालले असून, त्यातून मार्ग काढण्यासाठी मन सशक्त ठेवून आपले काम आणि जबाबदारी निष्ठेने पार पाडली तरच आपल्याला जगण्याचा मार्ग सापडतो,

ठळक मुद्दे२२२ देशात तणावाची परिस्थिती असून, भारत १२१ व्या स्थानी जगात घडणाºया घडामोडींचा आपल्या मनावर निश्चित परिणाम होत असतो जगातील घडामोडींकडे सकारात्मक नजरेने पाहिले तर आपल्याला जगण्याचा मार्ग निश्चितच सापडेल

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ११ : ‘जगायचं कसं’ ही तुमची-आमची समस्या नसून जगाची अस्वस्थता आहे. जग हे तणावाकडे चालले असून, त्यातून मार्ग काढण्यासाठी मन सशक्त ठेवून आपले काम आणि जबाबदारी निष्ठेने पार पाडली तरच आपल्याला जगण्याचा मार्ग सापडतो, असे प्रतिपादन ‘लोकमत’चे संपादक राजा माने यांनी रविवारी केले. गुजराती मित्रमंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या स्व. अरविंदभाई जव्हेरी व्याख्यानमालेत ‘सांगा जगायचं कसं‘ या विषयावर ते बोलत होते. यावेळी मंचावर मंडळाचे अध्यक्ष विजयभाई पटेल, मणिकांत दंड, संदीप जव्हेरी उपस्थित होते. माने पुढे म्हणाले, जगातील घडामोडी पाहता जग हे तणावग्रस्त झाल्याचे दिसते. जागतिक ह्युमन हॅपीनेसच्या अहवालानुसार २२२ देशात तणावाची परिस्थिती असून, भारत १२१ व्या स्थानी आहे. जगात घडणाºया घडामोडींचा आपल्या मनावर निश्चित परिणाम होत असतो. आणि आपले मन अस्वस्थ होते. देशात जी स्थित्यंतरे अथवा राजकीय उलथापालथ झाल्या त्यालाही भारतीयांची मानसिकताच कारणीभूत आहे. सध्याची मोदी लाट ही सुध्दा ताजे उदाहरण म्हणता येईल. देशात गेल्या काही दिवसात घडलेल्या हत्या, आर्थिक निर्णय, आंतरराष्टÑीय घडामोडी, नोटाबंदी, जीएसटी याबरोबरच आपल्या गावात घडणाºया छोट्या-मोठ्या घटना यासारख्या गोष्टींनी निश्चितच आपले मन विचलित झाले असल्याचे सांगून आपण काय काम करतो आणि आपली जबाबदारी काय आहे यांची सांगड घालून आपली कृती करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. आपण कुटुंबप्रमुख, आई, वडील, पती, पत्नी कोणत्याही भूमिकेत असाल तरी ती भूमिका जबाबदारीने आणि निष्ठेने पार पाडतो का? यावर विचारमंथन करुन ती पार पाडल्याशिवाय आपल्याला आनंद सापडणार नाही. आपण एखाद्या घटनेकडे किती सकारात्मक व नकारात्मक दृष्टीने पाहतो त्याच्या दुपटीने आपणाला तसाच प्रतिसाद मिळतो. यासाठी आपण जगातील घडामोडींकडे सकारात्मक नजरेने पाहिले तर आपल्याला जगण्याचा मार्ग निश्चितच सापडेल, असे राजा माने म्हणाले. प्रारंभी मणिकांत दंड यांनी प्रास्ताविक केले. अ‍ॅड. जे. जे. कुलकर्णी यांनी परिचय करून दिला; तर संदीप जव्हेरी यांनी आभार मानले. यावेळी गुजराती मित्रमंडळाचे उपाध्यक्ष मुकेश मेहता, खजिनदार चिमणभाई पटेल, विश्वस्त प्रवीणभाई वोरा, मनुभाई सोनछत्रा, कांताभाई पटेल, जयेश पटेल, संजय शाह, भरत ब्रह्मभट्ट, इंदिरा पटेल, हसुमती जव्हेरी, युवा फोरमचे अध्यक्ष, सदस्य तसेच किशोर चंडक, राजशेखर येळीकर, राज मिणियार, राजगोपाल झंवर, प्रा. राजशेखर येळीकर, गुरूराज येल्लटी, नरेंद्र पुजारी, जगदीश रांभिया, दीपक पाटील, केतनभाई शहा, रविकिरण पोरे,अनिल विपत, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष नल्लामंदू, रवींद्र जोगीपेठकर आदी उपस्थित होते.---------------संघवी यांच्या विनोदी किस्स्यांना दादविख्यात गुजराती साहित्यिक चंद्रकांत संघवी यांच्या विनोदी किस्स्यांनी आज श्रोत्यांना मनमुराद हसविले. समाजात वावरताना त्यांनी केलेल्या निरीक्षणाच्या आधारावर असलेल्या या किस्स्यांना दाद मिळाली. स्व. अरविंदभाई जव्हेरी व्याख्यानमालेत सकाळी संघवी यांचे ‘हसता हसता क्यारेक’ या विषयावर गुजरातीमधून व्याख्यान झाले. यावेळी संघवी यांच्या ‘आडी सोय’, ‘चला मुरारी हिरो बनने’ या दोन गुजराती साहित्यकृतींचे प्रकाशन झाले.