शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
2
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
3
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

निळ्या झेंड्याचा शिलेदार : राजाभाऊ सरवदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:24 IST

२६ ऑगस्ट १९५८ रोजी जन्मलेल्या राजाभाऊ सरवदे यांचे प्राथमिक शिक्षण मनपा शाळा क्र. ११ मधून झाले. १९७५ मध्ये जैन ...

२६ ऑगस्ट १९५८ रोजी जन्मलेल्या राजाभाऊ सरवदे यांचे प्राथमिक शिक्षण मनपा शाळा क्र. ११ मधून झाले. १९७५ मध्ये जैन गुरुकुल प्रशालेतून एस. एस. सी. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर सोलापुरातील दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयात डिग्रीला प्रवेश घेतला. महाविद्यालयीन काळात राजाभाऊंनी डॉ. आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशन ही विद्यार्थी संघटना कार्यान्वित केली. सोलापूर जिल्हाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या आक्रमक व विद्रोही शैलीने छाप पाडली. एखाद्या गावात अन्याय, अत्याचार घडल्यानंतर तिथे राजाभाऊंची टीम येणार हे कळालं की गावगुंड, समाजकंटक गाव सोडून पळून जायचे. कालातंराने दलित पॅंथर फुटली. त्यानंतर भारतीय दलित पॅंथर स्थापन झाली. राजाभाऊंनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्त्वावर विश्वास टाकला आणि आजतागायत तो सार्थपणे जपला.

ना. रामदास आठवले यांच्या खांद्याला खांदा लावून रिपब्लिकन पक्ष वाढवला. सामाजिक असो वा राजकीय, प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटविला. रामदास आठवले यांचा निवडणूक प्रचार असो वा राजकीय दौरा, अगदी चोखपणे आपली भूमिका पार पाडत असतात. 'एक पक्ष - एक झेंडा - एक नेता' हे तत्व अंगिकारून राजाभाऊंनी आपल्या तत्त्वांशी कधीच तडजोड केली नाही. रामदास आठवले यांनी राजाभाऊंची एकनिष्ठता व समाजाप्रती तळमळ ओळखून राज्यमंत्री दर्जा असलेले महात्मा फुले आर्थिक मागासवर्गीय विकास महामंडळाचे अध्यक्षपद दिले. संधीचं सोनं करत राजाभाऊंनी समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना न्याय दिला. समाजावर संकट ओढवल्यावर पक्षीय भेदाभेद न करता समतेच्या निळ्या झेंड्यास प्रमाण मानून समाजाचे पालकत्व स्वीकारले. रमाबाई आंबेडकर नगरची दंगल असो वा खैरलांजीची दंगल असो, जातीयवाद्यांना सळो की पळो करुन पोलीस प्रशासनावर जरब बसवून समाजास न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेबांनी शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, अशी गर्जना केली. राजाभाऊंनी त्यांचे विचार कृतीत उतरविले. आज ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे लोकशाही मार्गाने निवडून आलेले सिनेट सदस्य आहेत. इतकेच काय तर ’Pay Back To society’ या सामाजिक तत्त्वाला डोळ्यासमोर ठेवून राजाभाऊंनी भोगाव येथे ‘नालंदा शैक्षणिक संस्थेची उभारणी केली. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण व ज्यांची परिस्थिती नाही, अशा मुला - मुलींना दत्तक घेऊन त्यांची शैक्षणिक सोय केली. सामाजिक जीवनात राजाभाऊंना अनेक पुरस्कार मिळाले. परंतु एक किस्सा असाच फार कमी लोकांना माहिती आहे. राजाभाऊंना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला होता आणि त्यांच्या जीवनातील पहिलाच जीवनगौरव पुरस्कार होता. परंतु पुरस्कार हा काँग्रेस प्रणीत संघटनेच्या हस्ते होता. म्हणून राजाभाऊंनी पुरस्कार नाकारला.

आजच्या आंबेडकरी चळवळीला सुगीचे दिवस आले आहेत. कारण राजाभाऊंसारख्या निष्ठेने झटणाऱ्या पिढीने खस्ता खाल्ल्यात. आजच्या युवकांकडून राजाभाऊंना खूप अपेक्षा आहेत. बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पक्षात युवकांनी प्रवेश करुन काम करावं, पक्ष संघटना वाढवावी, निळ्या झेंड्याखाली काम करावे. युवकांनी राजकारणात यावं. राजकीय सत्ता हस्तांतरीत करावी, या मतांचे राजाभाऊ येणाऱ्या निवडणुकांत जास्तीत जास्त संख्येने प्रतिनिधी निवडून आणतील, हा आशावाद व्यक्त करत राजाभाऊंना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा!