शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

निळ्या झेंड्याचा शिलेदार : राजाभाऊ सरवदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:24 IST

२६ ऑगस्ट १९५८ रोजी जन्मलेल्या राजाभाऊ सरवदे यांचे प्राथमिक शिक्षण मनपा शाळा क्र. ११ मधून झाले. १९७५ मध्ये जैन ...

२६ ऑगस्ट १९५८ रोजी जन्मलेल्या राजाभाऊ सरवदे यांचे प्राथमिक शिक्षण मनपा शाळा क्र. ११ मधून झाले. १९७५ मध्ये जैन गुरुकुल प्रशालेतून एस. एस. सी. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर सोलापुरातील दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयात डिग्रीला प्रवेश घेतला. महाविद्यालयीन काळात राजाभाऊंनी डॉ. आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशन ही विद्यार्थी संघटना कार्यान्वित केली. सोलापूर जिल्हाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या आक्रमक व विद्रोही शैलीने छाप पाडली. एखाद्या गावात अन्याय, अत्याचार घडल्यानंतर तिथे राजाभाऊंची टीम येणार हे कळालं की गावगुंड, समाजकंटक गाव सोडून पळून जायचे. कालातंराने दलित पॅंथर फुटली. त्यानंतर भारतीय दलित पॅंथर स्थापन झाली. राजाभाऊंनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्त्वावर विश्वास टाकला आणि आजतागायत तो सार्थपणे जपला.

ना. रामदास आठवले यांच्या खांद्याला खांदा लावून रिपब्लिकन पक्ष वाढवला. सामाजिक असो वा राजकीय, प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटविला. रामदास आठवले यांचा निवडणूक प्रचार असो वा राजकीय दौरा, अगदी चोखपणे आपली भूमिका पार पाडत असतात. 'एक पक्ष - एक झेंडा - एक नेता' हे तत्व अंगिकारून राजाभाऊंनी आपल्या तत्त्वांशी कधीच तडजोड केली नाही. रामदास आठवले यांनी राजाभाऊंची एकनिष्ठता व समाजाप्रती तळमळ ओळखून राज्यमंत्री दर्जा असलेले महात्मा फुले आर्थिक मागासवर्गीय विकास महामंडळाचे अध्यक्षपद दिले. संधीचं सोनं करत राजाभाऊंनी समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना न्याय दिला. समाजावर संकट ओढवल्यावर पक्षीय भेदाभेद न करता समतेच्या निळ्या झेंड्यास प्रमाण मानून समाजाचे पालकत्व स्वीकारले. रमाबाई आंबेडकर नगरची दंगल असो वा खैरलांजीची दंगल असो, जातीयवाद्यांना सळो की पळो करुन पोलीस प्रशासनावर जरब बसवून समाजास न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेबांनी शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, अशी गर्जना केली. राजाभाऊंनी त्यांचे विचार कृतीत उतरविले. आज ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे लोकशाही मार्गाने निवडून आलेले सिनेट सदस्य आहेत. इतकेच काय तर ’Pay Back To society’ या सामाजिक तत्त्वाला डोळ्यासमोर ठेवून राजाभाऊंनी भोगाव येथे ‘नालंदा शैक्षणिक संस्थेची उभारणी केली. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण व ज्यांची परिस्थिती नाही, अशा मुला - मुलींना दत्तक घेऊन त्यांची शैक्षणिक सोय केली. सामाजिक जीवनात राजाभाऊंना अनेक पुरस्कार मिळाले. परंतु एक किस्सा असाच फार कमी लोकांना माहिती आहे. राजाभाऊंना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला होता आणि त्यांच्या जीवनातील पहिलाच जीवनगौरव पुरस्कार होता. परंतु पुरस्कार हा काँग्रेस प्रणीत संघटनेच्या हस्ते होता. म्हणून राजाभाऊंनी पुरस्कार नाकारला.

आजच्या आंबेडकरी चळवळीला सुगीचे दिवस आले आहेत. कारण राजाभाऊंसारख्या निष्ठेने झटणाऱ्या पिढीने खस्ता खाल्ल्यात. आजच्या युवकांकडून राजाभाऊंना खूप अपेक्षा आहेत. बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पक्षात युवकांनी प्रवेश करुन काम करावं, पक्ष संघटना वाढवावी, निळ्या झेंड्याखाली काम करावे. युवकांनी राजकारणात यावं. राजकीय सत्ता हस्तांतरीत करावी, या मतांचे राजाभाऊ येणाऱ्या निवडणुकांत जास्तीत जास्त संख्येने प्रतिनिधी निवडून आणतील, हा आशावाद व्यक्त करत राजाभाऊंना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा!