शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

तरीही...नाटक मरणार नाही ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 12:18 IST

ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांची मुलाखत 

ठळक मुद्देतंत्राधिष्टीत गोष्टीकडे लोकांचा कल वाढल्याचा हा प्रभाव - जयंत पवारनाटकासारख्या जिवंत माध्यमांची मात्र यात गोची होत आहे - जयंत पवारनवभांडवलदारांकडून जाणीवपूर्वक नाटक संपविण्याचे प्रयत्न सुरू - जयंत पवार

सोलापूर : हल्लीच्या काळात प्रेक्षकांचा कल दृक माध्यमांकडे वाढला आहे. त्यामुळे नाटक मागे पडत चालले आहे. नवभांडवलदारांचीही नाटक मरावे हीच इच्छा आहे; मात्र असे असले तरी नाटक वैश्विक नसून स्थानिक असल्याने ते कदापिही मरणार नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांनी केले.

प्रयोग मालाड मुंबई आणि अखिल भारतीय नाट्य परिषद उपनगरीय शाखा सोलापूरच्या वतीने पार पडलेल्या एकांकिका स्पर्धेसाठी आले असता नेमचंद वाचनालयाच्या अ‍ॅम्फी थिएटरमध्ये झालेल्या प्रगट मुलाखतीत ते बोलत होते. कोल्हापुरातील नाट्यसमीक्षक प्रा. डॉ. रणधीर शिंदे आणि रजनीश जोशी यांनी ही प्रगट मुलाखत घेतली. ते म्हणाले, नाटक मागे पडत आहे. तंत्राधिष्टीत गोष्टीकडे लोकांचा कल वाढल्याचा हा प्रभाव आहे. नाटकासारख्या जिवंत माध्यमांची मात्र यात गोची होत आहे. नवभांडवलदारांकडून जाणीवपूर्वक नाटक संपविण्याचे प्रयत्न सुरू आहेत; मात्र नाटकातील विषय स्थानिक असल्याने ते प्रेक्षकांना आपले वाटतात. नाटकासाठी बरेच वेगळेपण लागते. प्रेक्षकांतही एकाग्रता  हवी असते. अलीकडच्या शॉर्ट फिल्मच्या जमान्यात नाटक मागे पडल्याची खंत असली तरी ते मरणार मात्र नाही. 

करुणेकडे कोणत्या नजरेने पाहता या प्रश्नावर ते म्हणाले, लेखकाला डोळे ताठ ठेवावे लागतात. करुणा आणि शोषणाकडे                           मी अनुकंपेने बघत नाही. लेखकाने निर्दयी व्हावे. त्या निर्दयतेतून वास्तव टिपावे, तरच  वाचकांच्या मनात करुणा निर्माण होईल. लेखकच रडायला लागला तर शोषण दिसणार नाही. वास्तवता दाखविणे हेच साहित्याचे काम आहे. ते आपण केले.

‘त्यांचे’ साहित्य माझ्या रक्तात डीएनएसारखे- भालचंद्र नेमाडे, भाऊ पाध्ये, नामदेव ढसाळ यांच्यासारख्या लेखकांचे साहित्य आपण एवढे जिरवले की ते आपल्या रक्तात डीएनएसारखे उतरले आहे. या सर्व लेखकांच्या मर्यादा आणि उंची मला माहीत आहे. वाचकांना लेखकांच्या मर्यादा कळाव्या लागतात. आपण नाटकाकडून कथालेखनाकडे वळलो. प्रत्यक्षात कथेतही नाटक असते आणि नाटकातही कथा असते. खरे तर साहित्यातील या सीमारेषा आता धुसर व्हायला हव्या. ‘काय डेंजर वारा सुटलायं’ मध्ये मी जागतिकीकरणाचा धोका मांडला. नाटक हे समूहाने करायचे असते तर कथालेखन वाचकांशी बांधिल असते. नाट्य रंगमंचाच्या अवकाशात असते. ते ताण निर्माण करते. त्यातून कलावंतांचे कसब पणाला लागते.

टॅग्स :Solapurसोलापूर