शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
2
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
3
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
4
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ
5
धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल कळताच हेमा मालिनी रुग्णालयात पोहोचल्या, म्हणाल्या, "आम्ही सगळेच..."
6
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
7
'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
8
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
9
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेरच नाही आली; दरवाजा तोडला तर...
10
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
11
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
12
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
13
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 
14
कमाल झाली राव! फोनमध्ये नेटवर्कशिवाय चालणार मॅप, करता येणार मेसेज; 'कसं' ते जाणून घ्या
15
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
16
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळवारी केस कापल्याने आयुष्य ८ महिने कमी होते? पर्याय काय?
17
मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल
18
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
19
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
20
CSK ‘खिडकी’तून बाहेर काढणार असल्याची चर्चा! त्यातच जड्डू Insta वरून ‘गायब’

तरीही...नाटक मरणार नाही ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 12:18 IST

ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांची मुलाखत 

ठळक मुद्देतंत्राधिष्टीत गोष्टीकडे लोकांचा कल वाढल्याचा हा प्रभाव - जयंत पवारनाटकासारख्या जिवंत माध्यमांची मात्र यात गोची होत आहे - जयंत पवारनवभांडवलदारांकडून जाणीवपूर्वक नाटक संपविण्याचे प्रयत्न सुरू - जयंत पवार

सोलापूर : हल्लीच्या काळात प्रेक्षकांचा कल दृक माध्यमांकडे वाढला आहे. त्यामुळे नाटक मागे पडत चालले आहे. नवभांडवलदारांचीही नाटक मरावे हीच इच्छा आहे; मात्र असे असले तरी नाटक वैश्विक नसून स्थानिक असल्याने ते कदापिही मरणार नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांनी केले.

प्रयोग मालाड मुंबई आणि अखिल भारतीय नाट्य परिषद उपनगरीय शाखा सोलापूरच्या वतीने पार पडलेल्या एकांकिका स्पर्धेसाठी आले असता नेमचंद वाचनालयाच्या अ‍ॅम्फी थिएटरमध्ये झालेल्या प्रगट मुलाखतीत ते बोलत होते. कोल्हापुरातील नाट्यसमीक्षक प्रा. डॉ. रणधीर शिंदे आणि रजनीश जोशी यांनी ही प्रगट मुलाखत घेतली. ते म्हणाले, नाटक मागे पडत आहे. तंत्राधिष्टीत गोष्टीकडे लोकांचा कल वाढल्याचा हा प्रभाव आहे. नाटकासारख्या जिवंत माध्यमांची मात्र यात गोची होत आहे. नवभांडवलदारांकडून जाणीवपूर्वक नाटक संपविण्याचे प्रयत्न सुरू आहेत; मात्र नाटकातील विषय स्थानिक असल्याने ते प्रेक्षकांना आपले वाटतात. नाटकासाठी बरेच वेगळेपण लागते. प्रेक्षकांतही एकाग्रता  हवी असते. अलीकडच्या शॉर्ट फिल्मच्या जमान्यात नाटक मागे पडल्याची खंत असली तरी ते मरणार मात्र नाही. 

करुणेकडे कोणत्या नजरेने पाहता या प्रश्नावर ते म्हणाले, लेखकाला डोळे ताठ ठेवावे लागतात. करुणा आणि शोषणाकडे                           मी अनुकंपेने बघत नाही. लेखकाने निर्दयी व्हावे. त्या निर्दयतेतून वास्तव टिपावे, तरच  वाचकांच्या मनात करुणा निर्माण होईल. लेखकच रडायला लागला तर शोषण दिसणार नाही. वास्तवता दाखविणे हेच साहित्याचे काम आहे. ते आपण केले.

‘त्यांचे’ साहित्य माझ्या रक्तात डीएनएसारखे- भालचंद्र नेमाडे, भाऊ पाध्ये, नामदेव ढसाळ यांच्यासारख्या लेखकांचे साहित्य आपण एवढे जिरवले की ते आपल्या रक्तात डीएनएसारखे उतरले आहे. या सर्व लेखकांच्या मर्यादा आणि उंची मला माहीत आहे. वाचकांना लेखकांच्या मर्यादा कळाव्या लागतात. आपण नाटकाकडून कथालेखनाकडे वळलो. प्रत्यक्षात कथेतही नाटक असते आणि नाटकातही कथा असते. खरे तर साहित्यातील या सीमारेषा आता धुसर व्हायला हव्या. ‘काय डेंजर वारा सुटलायं’ मध्ये मी जागतिकीकरणाचा धोका मांडला. नाटक हे समूहाने करायचे असते तर कथालेखन वाचकांशी बांधिल असते. नाट्य रंगमंचाच्या अवकाशात असते. ते ताण निर्माण करते. त्यातून कलावंतांचे कसब पणाला लागते.

टॅग्स :Solapurसोलापूर