शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

पंढरपूरातील विठ्ठल-रुक्मिणीच्या प्रक्षाळ पूजेने नित्योपचारास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 12:15 IST

आषाढी व कार्तिकी यात्रेनंतर परंपरेनुसार प्रक्षाळ पूजेचा उत्सव विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात उत्साहात होतो.

ठळक मुद्दे शुभ दिवस पाहून मंदिरात खास प्रक्षाळ पूजेचा उत्सवविठ्ठलाला केशरयुक्त गरम पाण्याने स्नान विठ्ठलाला पारंपरिक अशा विविध अलंकारांनी सजविण्यात आले

पंढरपूर : येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात प्रक्षाळ पूजेनंतर नित्योपचारास प्रारंभ झाला. प्रक्षाळ पूजेनिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मातेस केशरयुक्त पाण्याने स्नान करण्यात आले़ त्यानंतर खास पुरण-पोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला. आषाढी व कार्तिकी यात्रेनंतर परंपरेनुसार प्रक्षाळ पूजेचा उत्सव विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात उत्साहात होतो़ 

आषाढी यात्रेमध्ये भक्तांना २४ तास दर्शन देऊन थकलेल्या विठ्ठलाचा थकवा किंवा शिणवटा जावा म्हणून परंपरेनुसार विठुरायाला रात्री गवती चहासह विविध प्रकारचे पंधरा ते सोळा पदार्थ घालून खास बनविण्यात आलेला काढाही दाखविण्यात आला.

आषाढी व कार्तिकी यात्रेच्यावेळी लाखोंच्या संख्येने भक्त येतात. येथे येणाºया प्रत्येक वारकºयांना विठ्ठलाचे दर्शन घडावे, यासाठी विठुराया हे रात्रंदिवस अखंडपणे उभे असतात. यात्रेच्या काळात मंदिरातील दररोजचा पहाटेचा काकडा, दुपारी साडेपाच वाजता दागिने, पोशाख घालणे, सायंकाळी धूपारती, रात्री शेजारती असे नित्योपचार बंद असतात. यात्रेच्या आधीच देवाचा पलंग देखील काढण्यात येत असतो. त्यामुळे भक्तांना अहोरात्र अखंडपणे दर्शन देऊन विठ्ठलाला देखील थकवा आलेला असतो. 

विठ्ठलाला आलेला थकवा किंवा शिणवटा काढण्यासाठीच आषाढी व कार्तिकी यात्रेनंतर शुभ दिवस पाहून मंदिरात खास प्रक्षाळ पूजेचा उत्सव साजरा करण्यात येत असतो, अशी पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. त्यानुसार १ आॅगस्ट रोजी मंदिराची स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर विठ्ठलाला केशरयुक्त गरम पाण्याने स्नान घालून मंदिर समितीच्या वतीने मंदिरातील कर्मचाºयांकडून विठ्ठलाला पुरण-पोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला. त्यानंतर सायंकाळी देवाला आकर्षक पोशाख परिधान करुन पारंपरिक अशा विविध अलंकारांनी सजविण्यात आले. सायंकाळच्या वेळी नेहमीप्रमाणे धूपारतीचा कार्यक्रम झाला. 

या अगोदर यात्रेमुळे काढण्यात आलेला विठ्ठलाचा पलंग देखील शयनघरात पूर्ववत लावण्यात आला. प्रक्षाळ पूजेनंतर मंदिरातील विठ्ठलाचे व रुक्मिणीमातेचे दैनंदिन नित्योपचार पूर्ववत सुरू झाले. 

पंधरा पदार्थांपासून बनविण्यात येतो काढा- विठ्ठलाचा थकवा दूर व्हावा, यासाठी देवाला खास काढा देण्याची जुनी परंपरा आहे. त्यानुसार गवती चहाची पाने, गूळ, जायफळ, लेंडीपिंपळी, ज्येष्ठमध, काळे मिरे, काजू, बदामबी, खारीक, सुंठ, बेदाणा, लवंग, वेलदोडा, चारोळे आदी विविध पदार्थांपासून खास काढा बनविण्यात येत असतो. हा काढा रात्रीच्या वेळी विठ्ठलाला दाखविण्यात येतो. भक्तांना यात्राकाळात २४ तास दर्शन देऊन विठ्ठलाला आलेला शिणवाटा किंवा थकवा या काढ्यामुळे दूर होतो, अशी यामागची भावना असल्याचे सांगितले जाते.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळा