शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

पावसाअभावी सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:24 IST

सोलापूर : सुरुवातीला धो - धो कोसळणाऱ्या पावसाने पंधरा दिवसांपासून ओढ दिल्याने सोयाबीन आणि उडीद पिके माना टाकत आहेत. ...

सोलापूर : सुरुवातीला धो - धो कोसळणाऱ्या पावसाने पंधरा दिवसांपासून ओढ दिल्याने सोयाबीन आणि उडीद पिके माना टाकत आहेत. फुलोऱ्यावर आलेले सोयाबीन हातातून जाण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे.

खरीप हंगामाच्या सुरुवातीला जून महिन्यात पावसाचे वेळेवर आगमन झाले. अनेक भागात खरिपाच्या पेरण्या वेळेत झाल्याचे समाधान शेतकऱ्यांतून व्यक्त होत होते. पिकांची चांगली वाढ झाली. आता सोयाबीन आणि उडीद पिके फुलोऱ्यात आली आहेत. खऱ्या अर्थाने या पिकांना पावसाची गरज आहे. मात्र, १५ दिवसांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेला तरीही पावसाचा पत्ता नाही. पाऊस गायब झाल्याने सोयाबीन व उडीद उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. आणखी चार दिवस पाऊस आला नाही तर फुलोरा गळण्याची शक्यता अधिक आहे.

पावसाची दडी आणि दररोज पडणारे कडक ऊन या दुहेरी संकटात खरिपाची पिके सापडली आहेत. कडक उन्हामुळे जमिनीला भेगा पडत आहेत. तर सोयाबीनची पाने कोमेजून पिवळी पडत आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता आहे असे शेतकरी सोयाबीन आणि उडीद पिकाला पाणी सोडून ती जगविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, जिरायत शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. हातचे पीक जाण्याची भीती त्यांना सतावत आहे.

-------

सरासरी उत्पन्न घटण्याची शक्यता

सध्याची परिस्थिती पाहिली असता शेतकऱ्यांना दुबार पेरणी करणे अशक्य आहे. पावसाचे वेळेत आगमन झाले नाही तर सोयाबीन आणि उडीद पीक उत्पादन घटण्याची शक्यता आहे. एकरी १० क्विंटल उत्पादन होणाऱ्या शेतकऱ्यांना तीन क्विंटल उत्पादन निघणे अशक्य आहे. उत्पादन खर्चात वाढ झाल्याने हा हंगाम तोट्याचा ठरण्याची शक्यता अधिक आहे.

------------

सर्वाधिक क्षेत्र बार्शीत

यंदाच्या खरीप हंगामात ४८,६८८ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. सरासरीच्या १२८ टक्के प्रत्यक्ष पेरणी झाली. जिल्ह्यात सर्वाधिक ३५,४०८ हेक्टर क्षेत्र बार्शीत, अक्कलकोट ५,२४७ हेक्टर, उत्तर सोलापूर ३,२१७ हेक्टर या तीन तालुक्यांचे मोठे नुकसान आहे. मोहोळ, दक्षिण सोलापूर तालुक्यात कमी तर माढा, मंगळवेढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस तालुक्यात सोयाबीन नगण्य आहे.

------

चार दिवसांत पाऊस आला नाही तर खरीप हातातून जाणार हे नक्की. आमच्याकडे वेळेवर पाऊस पडला नाही, उशिराने पेरण्या झाल्या. आता पिकांची अवस्था पाहवत नाही.

- शिवाजी कांबळे

सोयाबीन उत्पादक,

तिल्हेहाळ, ता. दक्षिण सोलापूर