शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पावसाअभावी सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:24 IST

सोलापूर : सुरुवातीला धो - धो कोसळणाऱ्या पावसाने पंधरा दिवसांपासून ओढ दिल्याने सोयाबीन आणि उडीद पिके माना टाकत आहेत. ...

सोलापूर : सुरुवातीला धो - धो कोसळणाऱ्या पावसाने पंधरा दिवसांपासून ओढ दिल्याने सोयाबीन आणि उडीद पिके माना टाकत आहेत. फुलोऱ्यावर आलेले सोयाबीन हातातून जाण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे.

खरीप हंगामाच्या सुरुवातीला जून महिन्यात पावसाचे वेळेवर आगमन झाले. अनेक भागात खरिपाच्या पेरण्या वेळेत झाल्याचे समाधान शेतकऱ्यांतून व्यक्त होत होते. पिकांची चांगली वाढ झाली. आता सोयाबीन आणि उडीद पिके फुलोऱ्यात आली आहेत. खऱ्या अर्थाने या पिकांना पावसाची गरज आहे. मात्र, १५ दिवसांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेला तरीही पावसाचा पत्ता नाही. पाऊस गायब झाल्याने सोयाबीन व उडीद उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. आणखी चार दिवस पाऊस आला नाही तर फुलोरा गळण्याची शक्यता अधिक आहे.

पावसाची दडी आणि दररोज पडणारे कडक ऊन या दुहेरी संकटात खरिपाची पिके सापडली आहेत. कडक उन्हामुळे जमिनीला भेगा पडत आहेत. तर सोयाबीनची पाने कोमेजून पिवळी पडत आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता आहे असे शेतकरी सोयाबीन आणि उडीद पिकाला पाणी सोडून ती जगविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, जिरायत शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. हातचे पीक जाण्याची भीती त्यांना सतावत आहे.

-------

सरासरी उत्पन्न घटण्याची शक्यता

सध्याची परिस्थिती पाहिली असता शेतकऱ्यांना दुबार पेरणी करणे अशक्य आहे. पावसाचे वेळेत आगमन झाले नाही तर सोयाबीन आणि उडीद पीक उत्पादन घटण्याची शक्यता आहे. एकरी १० क्विंटल उत्पादन होणाऱ्या शेतकऱ्यांना तीन क्विंटल उत्पादन निघणे अशक्य आहे. उत्पादन खर्चात वाढ झाल्याने हा हंगाम तोट्याचा ठरण्याची शक्यता अधिक आहे.

------------

सर्वाधिक क्षेत्र बार्शीत

यंदाच्या खरीप हंगामात ४८,६८८ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. सरासरीच्या १२८ टक्के प्रत्यक्ष पेरणी झाली. जिल्ह्यात सर्वाधिक ३५,४०८ हेक्टर क्षेत्र बार्शीत, अक्कलकोट ५,२४७ हेक्टर, उत्तर सोलापूर ३,२१७ हेक्टर या तीन तालुक्यांचे मोठे नुकसान आहे. मोहोळ, दक्षिण सोलापूर तालुक्यात कमी तर माढा, मंगळवेढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस तालुक्यात सोयाबीन नगण्य आहे.

------

चार दिवसांत पाऊस आला नाही तर खरीप हातातून जाणार हे नक्की. आमच्याकडे वेळेवर पाऊस पडला नाही, उशिराने पेरण्या झाल्या. आता पिकांची अवस्था पाहवत नाही.

- शिवाजी कांबळे

सोयाबीन उत्पादक,

तिल्हेहाळ, ता. दक्षिण सोलापूर