शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

पावसाअभावी सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:24 IST

सोलापूर : सुरुवातीला धो - धो कोसळणाऱ्या पावसाने पंधरा दिवसांपासून ओढ दिल्याने सोयाबीन आणि उडीद पिके माना टाकत आहेत. ...

सोलापूर : सुरुवातीला धो - धो कोसळणाऱ्या पावसाने पंधरा दिवसांपासून ओढ दिल्याने सोयाबीन आणि उडीद पिके माना टाकत आहेत. फुलोऱ्यावर आलेले सोयाबीन हातातून जाण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे.

खरीप हंगामाच्या सुरुवातीला जून महिन्यात पावसाचे वेळेवर आगमन झाले. अनेक भागात खरिपाच्या पेरण्या वेळेत झाल्याचे समाधान शेतकऱ्यांतून व्यक्त होत होते. पिकांची चांगली वाढ झाली. आता सोयाबीन आणि उडीद पिके फुलोऱ्यात आली आहेत. खऱ्या अर्थाने या पिकांना पावसाची गरज आहे. मात्र, १५ दिवसांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेला तरीही पावसाचा पत्ता नाही. पाऊस गायब झाल्याने सोयाबीन व उडीद उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. आणखी चार दिवस पाऊस आला नाही तर फुलोरा गळण्याची शक्यता अधिक आहे.

पावसाची दडी आणि दररोज पडणारे कडक ऊन या दुहेरी संकटात खरिपाची पिके सापडली आहेत. कडक उन्हामुळे जमिनीला भेगा पडत आहेत. तर सोयाबीनची पाने कोमेजून पिवळी पडत आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता आहे असे शेतकरी सोयाबीन आणि उडीद पिकाला पाणी सोडून ती जगविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, जिरायत शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. हातचे पीक जाण्याची भीती त्यांना सतावत आहे.

-------

सरासरी उत्पन्न घटण्याची शक्यता

सध्याची परिस्थिती पाहिली असता शेतकऱ्यांना दुबार पेरणी करणे अशक्य आहे. पावसाचे वेळेत आगमन झाले नाही तर सोयाबीन आणि उडीद पीक उत्पादन घटण्याची शक्यता आहे. एकरी १० क्विंटल उत्पादन होणाऱ्या शेतकऱ्यांना तीन क्विंटल उत्पादन निघणे अशक्य आहे. उत्पादन खर्चात वाढ झाल्याने हा हंगाम तोट्याचा ठरण्याची शक्यता अधिक आहे.

------------

सर्वाधिक क्षेत्र बार्शीत

यंदाच्या खरीप हंगामात ४८,६८८ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. सरासरीच्या १२८ टक्के प्रत्यक्ष पेरणी झाली. जिल्ह्यात सर्वाधिक ३५,४०८ हेक्टर क्षेत्र बार्शीत, अक्कलकोट ५,२४७ हेक्टर, उत्तर सोलापूर ३,२१७ हेक्टर या तीन तालुक्यांचे मोठे नुकसान आहे. मोहोळ, दक्षिण सोलापूर तालुक्यात कमी तर माढा, मंगळवेढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस तालुक्यात सोयाबीन नगण्य आहे.

------

चार दिवसांत पाऊस आला नाही तर खरीप हातातून जाणार हे नक्की. आमच्याकडे वेळेवर पाऊस पडला नाही, उशिराने पेरण्या झाल्या. आता पिकांची अवस्था पाहवत नाही.

- शिवाजी कांबळे

सोयाबीन उत्पादक,

तिल्हेहाळ, ता. दक्षिण सोलापूर