शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:24 IST

सोलापूर : सुरुवातीला धो - धो कोसळणाऱ्या पावसाने पंधरा दिवसांपासून ओढ दिल्याने सोयाबीन आणि उडीद पिके माना टाकत आहेत. ...

सोलापूर : सुरुवातीला धो - धो कोसळणाऱ्या पावसाने पंधरा दिवसांपासून ओढ दिल्याने सोयाबीन आणि उडीद पिके माना टाकत आहेत. फुलोऱ्यावर आलेले सोयाबीन हातातून जाण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे.

खरीप हंगामाच्या सुरुवातीला जून महिन्यात पावसाचे वेळेवर आगमन झाले. अनेक भागात खरिपाच्या पेरण्या वेळेत झाल्याचे समाधान शेतकऱ्यांतून व्यक्त होत होते. पिकांची चांगली वाढ झाली. आता सोयाबीन आणि उडीद पिके फुलोऱ्यात आली आहेत. खऱ्या अर्थाने या पिकांना पावसाची गरज आहे. मात्र, १५ दिवसांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेला तरीही पावसाचा पत्ता नाही. पाऊस गायब झाल्याने सोयाबीन व उडीद उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. आणखी चार दिवस पाऊस आला नाही तर फुलोरा गळण्याची शक्यता अधिक आहे.

पावसाची दडी आणि दररोज पडणारे कडक ऊन या दुहेरी संकटात खरिपाची पिके सापडली आहेत. कडक उन्हामुळे जमिनीला भेगा पडत आहेत. तर सोयाबीनची पाने कोमेजून पिवळी पडत आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता आहे असे शेतकरी सोयाबीन आणि उडीद पिकाला पाणी सोडून ती जगविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, जिरायत शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. हातचे पीक जाण्याची भीती त्यांना सतावत आहे.

-------

सरासरी उत्पन्न घटण्याची शक्यता

सध्याची परिस्थिती पाहिली असता शेतकऱ्यांना दुबार पेरणी करणे अशक्य आहे. पावसाचे वेळेत आगमन झाले नाही तर सोयाबीन आणि उडीद पीक उत्पादन घटण्याची शक्यता आहे. एकरी १० क्विंटल उत्पादन होणाऱ्या शेतकऱ्यांना तीन क्विंटल उत्पादन निघणे अशक्य आहे. उत्पादन खर्चात वाढ झाल्याने हा हंगाम तोट्याचा ठरण्याची शक्यता अधिक आहे.

------------

सर्वाधिक क्षेत्र बार्शीत

यंदाच्या खरीप हंगामात ४८,६८८ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. सरासरीच्या १२८ टक्के प्रत्यक्ष पेरणी झाली. जिल्ह्यात सर्वाधिक ३५,४०८ हेक्टर क्षेत्र बार्शीत, अक्कलकोट ५,२४७ हेक्टर, उत्तर सोलापूर ३,२१७ हेक्टर या तीन तालुक्यांचे मोठे नुकसान आहे. मोहोळ, दक्षिण सोलापूर तालुक्यात कमी तर माढा, मंगळवेढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस तालुक्यात सोयाबीन नगण्य आहे.

------

चार दिवसांत पाऊस आला नाही तर खरीप हातातून जाणार हे नक्की. आमच्याकडे वेळेवर पाऊस पडला नाही, उशिराने पेरण्या झाल्या. आता पिकांची अवस्था पाहवत नाही.

- शिवाजी कांबळे

सोयाबीन उत्पादक,

तिल्हेहाळ, ता. दक्षिण सोलापूर