शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

भाजपच्या एकहाती नेतृत्वामुळे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये वाढले बळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 16:38 IST

प्रचारातील काँग्रेस नेत्यांचा विसंवाद लोकसभा निवडणुकीत तालुक्यात चर्चेचा विषय ठरला

ठळक मुद्देपाच वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत नेतृत्व नसतानाही सोलापूर दक्षिणमधून भाजपला मताधिक्य मिळालेसहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे नेतृत्व मिळाल्याने भाजपची शक्ती मतदारसंघात वाढली विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत  भाजपने आपले बळ वाढवले

सोलापूर : एकेकाळचा काँग्रेसचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यात भाजपच्या एकहाती नेतृत्वाला मतदारांनी पुन्हा एकदा बळ दिल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रचारातील काँग्रेस नेत्यांचा विसंवाद लोकसभा निवडणुकीत तालुक्यात चर्चेचा विषय ठरला. त्याचेच पडसाद मतदानात उमटल्याचे दिसून येते.

पाच वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत नेतृत्व नसतानाही सोलापूर दक्षिणमधून भाजपला मताधिक्य मिळाले. यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे नेतृत्व मिळाल्याने भाजपची शक्ती मतदारसंघात वाढली आहे. विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत  भाजपने आपले बळ वाढवले. कार्यकर्त्यांचा समन्वय साधत पक्षाला सत्तेपर्यंत आणून सोडले. ग्रामीण भागात विशेषत: भीमा आणि सीना नदीकाठी असलेल्या गावात भाजपविरोधी वातावरण असल्याची चर्चा होती त्याचे पडसाद मतदानात उमटणे अपेक्षित होते तसे घडले नाही.  डॉ. जयसिद्धेश्वर स्वामींना या गावातूनही चांगले मताधिक्य मिळाले.

विधानसभा निवडणुकीपासून भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षात कुठेच ताळमेळ नव्हता. इतकेच काय सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सेनेने काँग्रेसच्या नेत्यांना साथ दिली; मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप  नेतृत्वाने सेनेला चुचकारण्याचा केलेला प्रयत्न जयसिद्धेश्वर स्वामीजींना मताधिक्य देण्यात उपयोगी ठरला. काँग्रेस उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांचा तालुक्यातील विविध घटकाशी पूर्वी थेट संपर्क होता,  परंतु गेल्या काही वर्षांपासून तो तुटला. त्याचाही फटका शिंदे यांना या निवडणुकीत बसला. नव्या कार्यकर्त्यांशी संबंध प्रस्थापित करण्यात उमेदवार शिंदे आणि काँग्रेसची नेतेमंडळी कमी पडल्याचे प्रचारादरम्यान जाणवत होते, त्यावर पक्षात चर्चाच झाली नाही. याउलट क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून भाजपने या वर्गाला जवळ केले. त्यामुळे यंग ब्रिगेड भाजप उमेदवाराच्या प्रचारात कामी आली.

मतदारसंघातील बंदलगी बंधाºयाचे अर्धवट काम, भीमा नदीवरील वडापूर बॅरेजेस,  भीमा आणि सीना नद्यांना पाणी सोडणे आधी प्रश्नावर सत्ताधाºयांना धारेवर धरण्याची संधी काँग्रेसकडे होती, परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

  दुष्काळी स्थिती असताना तालुक्यात जनावरांच्या चारा छावण्या उघडण्यात आल्या नाहीत,  अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची गरज आहे अशा प्रश्नावर भाजपा नेतृत्वाला घेरण्याची संधी काँग्रेसने गमावली. थकित ऊस बिले लोकमंगल कारखान्याकडून मिळाली नाहीत याची चर्चा काँग्रेसच्या सभातून झाली पण नेत्यांनी तो प्रश्न उचललाच नाही. मोठ्या गावात भाजपाचे नवोदित कार्यकर्ते सक्रिय होते तर काँग्रेस कार्यकर्त्यांच्या निष्क्रियतेचा बोलबाला अधिक होता

काँग्रेससाठी मोठे आव्हानलोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला कमी मते मिळाल्याने आगामी निवडणुकीत पक्षाचे बळ वाढवण्यासाठी प्रथम नेतेमंडळीत मनोमिलन घडवण्याचे मोठे आव्हान संभाव्य उमेदवारासमोर आहे. संघटनात्मक बांधणी करून कामाला लावण्याचे कौशल्य पणाला लावावे लागणार आहे. सामान्यांचे प्रश्न घेऊन तालुक्यात गावोगावी सत्ताधाºयांच्या विरोधात जनमत निर्माण करण्याचेही आव्हान काँग्रेससमोर आहे. त्यापूर्वी काँग्रेस कार्यकर्त्यांचे रुदन थांबवून त्यांच्यात आत्मविश्वास जागवण्याचे कामही येत्या तीन महिन्यात करावे लागणार आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालsolapur-pcसोलापूरSubhash Deshmukhसुभाष देशमुख