शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

भाजपच्या एकहाती नेतृत्वामुळे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये वाढले बळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 16:38 IST

प्रचारातील काँग्रेस नेत्यांचा विसंवाद लोकसभा निवडणुकीत तालुक्यात चर्चेचा विषय ठरला

ठळक मुद्देपाच वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत नेतृत्व नसतानाही सोलापूर दक्षिणमधून भाजपला मताधिक्य मिळालेसहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे नेतृत्व मिळाल्याने भाजपची शक्ती मतदारसंघात वाढली विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत  भाजपने आपले बळ वाढवले

सोलापूर : एकेकाळचा काँग्रेसचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यात भाजपच्या एकहाती नेतृत्वाला मतदारांनी पुन्हा एकदा बळ दिल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रचारातील काँग्रेस नेत्यांचा विसंवाद लोकसभा निवडणुकीत तालुक्यात चर्चेचा विषय ठरला. त्याचेच पडसाद मतदानात उमटल्याचे दिसून येते.

पाच वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत नेतृत्व नसतानाही सोलापूर दक्षिणमधून भाजपला मताधिक्य मिळाले. यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे नेतृत्व मिळाल्याने भाजपची शक्ती मतदारसंघात वाढली आहे. विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत  भाजपने आपले बळ वाढवले. कार्यकर्त्यांचा समन्वय साधत पक्षाला सत्तेपर्यंत आणून सोडले. ग्रामीण भागात विशेषत: भीमा आणि सीना नदीकाठी असलेल्या गावात भाजपविरोधी वातावरण असल्याची चर्चा होती त्याचे पडसाद मतदानात उमटणे अपेक्षित होते तसे घडले नाही.  डॉ. जयसिद्धेश्वर स्वामींना या गावातूनही चांगले मताधिक्य मिळाले.

विधानसभा निवडणुकीपासून भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षात कुठेच ताळमेळ नव्हता. इतकेच काय सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सेनेने काँग्रेसच्या नेत्यांना साथ दिली; मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप  नेतृत्वाने सेनेला चुचकारण्याचा केलेला प्रयत्न जयसिद्धेश्वर स्वामीजींना मताधिक्य देण्यात उपयोगी ठरला. काँग्रेस उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांचा तालुक्यातील विविध घटकाशी पूर्वी थेट संपर्क होता,  परंतु गेल्या काही वर्षांपासून तो तुटला. त्याचाही फटका शिंदे यांना या निवडणुकीत बसला. नव्या कार्यकर्त्यांशी संबंध प्रस्थापित करण्यात उमेदवार शिंदे आणि काँग्रेसची नेतेमंडळी कमी पडल्याचे प्रचारादरम्यान जाणवत होते, त्यावर पक्षात चर्चाच झाली नाही. याउलट क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून भाजपने या वर्गाला जवळ केले. त्यामुळे यंग ब्रिगेड भाजप उमेदवाराच्या प्रचारात कामी आली.

मतदारसंघातील बंदलगी बंधाºयाचे अर्धवट काम, भीमा नदीवरील वडापूर बॅरेजेस,  भीमा आणि सीना नद्यांना पाणी सोडणे आधी प्रश्नावर सत्ताधाºयांना धारेवर धरण्याची संधी काँग्रेसकडे होती, परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

  दुष्काळी स्थिती असताना तालुक्यात जनावरांच्या चारा छावण्या उघडण्यात आल्या नाहीत,  अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची गरज आहे अशा प्रश्नावर भाजपा नेतृत्वाला घेरण्याची संधी काँग्रेसने गमावली. थकित ऊस बिले लोकमंगल कारखान्याकडून मिळाली नाहीत याची चर्चा काँग्रेसच्या सभातून झाली पण नेत्यांनी तो प्रश्न उचललाच नाही. मोठ्या गावात भाजपाचे नवोदित कार्यकर्ते सक्रिय होते तर काँग्रेस कार्यकर्त्यांच्या निष्क्रियतेचा बोलबाला अधिक होता

काँग्रेससाठी मोठे आव्हानलोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला कमी मते मिळाल्याने आगामी निवडणुकीत पक्षाचे बळ वाढवण्यासाठी प्रथम नेतेमंडळीत मनोमिलन घडवण्याचे मोठे आव्हान संभाव्य उमेदवारासमोर आहे. संघटनात्मक बांधणी करून कामाला लावण्याचे कौशल्य पणाला लावावे लागणार आहे. सामान्यांचे प्रश्न घेऊन तालुक्यात गावोगावी सत्ताधाºयांच्या विरोधात जनमत निर्माण करण्याचेही आव्हान काँग्रेससमोर आहे. त्यापूर्वी काँग्रेस कार्यकर्त्यांचे रुदन थांबवून त्यांच्यात आत्मविश्वास जागवण्याचे कामही येत्या तीन महिन्यात करावे लागणार आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालsolapur-pcसोलापूरSubhash Deshmukhसुभाष देशमुख