शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

सोलापूर जिल्ह्यात पेपरलेस ग्रामपंचायत योजनेचा बोजवारा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 12:04 IST

ई-ग्राम सॉफ्टवेअर बोगस, संगणक परिचालकांमध्ये जुंपली

ठळक मुद्दे ‘ई-ग्राम सॉफ्टवेअर’ बोगस आणि निकृष्ट ग्रामपंचायतींकडील हस्तलिखिताच्या नोंदी करणे बंद ‘पेपरलेस ग्रामपंचायत’ योजनेचा बोजवारा

राकेश कदम सोलापूर: ई-ग्राम सॉफ्टवेअरच्या माध्यमातून राज्यातील ग्रामपंचायतींचा कारभार पेपरलेस झालाच पाहिजे, यासाठी ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे तगादा लावला आहे. त्याचवेळी हे ‘ई-ग्राम सॉफ्टवेअर’ बोगस आणि निकृष्ट असल्याची तक्रार राज्य संगणक परिचालक संघटनेने ग्रामविकास सचिवांकडे केली आहे. अनेक ठिकाणी संगणक परिचालकांनी ग्रामपंचायतींकडील हस्तलिखिताच्या नोंदी करणे बंद केले आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारच्या ‘पेपरलेस                   ग्रामपंचायत’ योजनेचा बोजवारा उडण्याची चिन्हे आहेत.

आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून ग्रामपंचायतींकडील सर्वप्रकारचे दाखले संगणकीकृत देण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने १ एप्रिल २०१८ पासून ग्रामपंचायतींच्या १ ते ३३ नोंदवह्यांमधील हस्तलिखित नोंदी बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या कामासाठी ग्रामसेवक आणि आपले सरकार पोर्टलच्या केंद्र चालकाने ग्रामपंचायतीकडील सर्व माहिती ई-ग्राम सॉफ्टवेअरमध्ये भरणे गरजेचे आहे. हे काम तातडीने व्हावे, यासाठी ग्रामविकास विभागाने सर्वच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे तगादा लावला आहे. तर आपले सरकार पोर्टलचे काम करणाºया संगणक परिचालक संघटनेने ई-ग्राम सॉफ्टेवअर बोगस असल्याचे सांगून नोंदी करण्यास नकार दिला आहे.

या सॉफ्टवेअरमध्ये नोंदी करण्यात बºयाच अडचणी आहेत. गेल्या १६ महिन्यांपूर्वीच कंपनीला याबाबत कळविण्यात आले आहे. परंतु, कंपनीकडून प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप संगणक परिचालक संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे (परळी), सचिव मयूर कांबळे, उपाध्यक्ष राकेश देशमुख, सोलापूर जिल्हाध्यक्ष राहुल पेटकर आदींनी केला आहे.

सोलापूर जिल्ह्यात  १०२९ पैकी १९३ ग्रामपंचायतींमध्ये माहिती अपलोड करण्याचे काम पूर्ण झाले. उर्वरित ठिकाणी काम करण्यास केंद्र चालक नकार देत आहेत. 

कंपनी चूक करायला लावत आहेसंगणक परिचालक संघटनेने ९ एप्रिल रोजी ग्रामविकास सचिवांना निवेदन दिले आहे. यात १०० हून अधिक मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. संघटना म्हणते, ई-ग्राम सॉफ्टवेअरमध्ये व्यवस्थित नोंदी होत नाहीत. कंपनी संगणक परिचालकांना जाणून-बुजून चुकीचे काम करायला लावत आहे. गावातील जमिनीचा दर, भाडे मूल्य आदी नोंदी जुळत नाहीत. चुकीच्या नोंदी केल्या तर ग्रामीण भागातील हजारो लोकांना त्याचा त्रास होईल. हे सॉफ्टवेअर आॅनलाईन आणि आॅफलाईनमध्ये असायला हवे. सॉफ्टवेअर डीलिट झाले तर सर्वप्रकारच्या नोंदी पुन्हा कराव्या लागत आहेत, अशा अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत. राज्य ग्रामसेवक युनियनने डिसेंबर २०१७ मध्ये ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे ई-ग्राम सॉफ्टवेअरबाबत तक्रार केली होती. या पत्राचा दाखलाही संगणक परिचालक संघटनेने ग्रामविकास सचिवांना दिला आहे.

काय आहे ‘आपले सरकार’ - आघाडी सरकारच्या काळात संग्राम योजनेच्या माध्यमातून हे काम सुरु होते, मात्र सरकार बदलल्यानंतर संग्राम योजना बंद करुन ‘आपले सरकार’ सेवा पोर्टल सुरु करण्यात आले. या योजनेचे काम पाहण्यासाठी सीएससी-एसपीव्ही या कंपनीची नियुक्ती करण्यात आली. या कंपनीमार्फत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आपले सरकार पोर्टलसाठी केंद्रचालक नेमण्यात आले आहेत. ग्रामपंचायतींना संगणक, सॉफ्टवेअर पुरवणे, त्यांची देखभाल दुरुस्ती आणि केंद्र चालकांचे मानधन आदींची जबाबदारी सीएससी कंपनीवरच आहे. या बदल्यात ग्रामपंचायती १४ व्या वित्त आयोगातून ठराविक निधी जिल्हा परिषदांमार्फत या कंपनीला देत आहेत. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयgram panchayatग्राम पंचायत