शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

तापमानात घट झाल्याने सोलापूरकरांना भरू लागली हुडहुडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 11:54 IST

हिवाळ्यातील आहाराचे नियोजन भरपूर पोषकतत्त्वयुक्त पदार्थांचे सेवन करण्याची गरज

ठळक मुद्देलांबलेला पाऊस थांबल्यामुळे थंडीची सुरुवात देखील लांबलीनोव्हेंबरच्या दुसºया आठवड्यामध्ये दरवर्षी तापमानाचा पारा घटत असतोसध्या थंडी वाढत असून मागील दहा दिवसांत पारा खाली येत आहे

सोलापूर : शहर व जिल्ह्यामध्ये आता थंडीचा जोर वाढू लागला आहे. वाढत्या थंडीमुळे सोलापूरकरांना फ हुडहुडी भासू लागली आहे. २८ नोव्हेंबरचे तापमान हे १९.१ अंश सेल्सिअस इतके असून, चार डिसेंबरपर्यंत १७ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

मागील वर्षी असणाºया थंडीचा विचार करता यंदाच्या वर्षी थंडी कमी असल्याचे दिसत आहे. या दोन वर्षांच्या तापमानाची तुलना केल्यास यंदाच्या वर्षी एक ते दोन अंश सेल्सिअसचा फरक आहे. १९ नोव्हेंबर रोजी तापमानाचा पारा १९.५ अंश सेल्सिअस इतका होता. हा पारा २७ नोव्हेंबर रोजी १७.५ अंश सेल्सिअसवर आला होता. मागील आठ दिवसात तापमान २ अंश सेल्सिअसने कमी झाल्याचे दिसत आहे. 

लांबलेला पाऊस थांबल्यामुळे थंडीची सुरुवात देखील लांबली. साधारणपणे नोव्हेंबरच्या दुसºया आठवड्यामध्ये दरवर्षी तापमानाचा पारा घटत असतो. यामुळे थंडीचे प्रमाणदेखील वाढते. या वर्षी लांबलेल्या पावसामुळे शहर व जिल्ह्याला ‘आॅक्टोबर हीट’चा अनुभव आला नाही. सध्या थंडी वाढत असून मागील दहा दिवसांत पारा खाली येत आहे. सकाळी हवेत गारवा असला तरी धुक्याचे प्रमाण खूप कमी आहे. मागील वर्षी धुके जास्त होते. थंडीची सुरुवात झाल्याने लोक परिसरातील बागेत व्यायाम करायला जात आहेत. हिवाळा हा व्यायाम करण्यासाठी सर्वात चांगला ऋतू समजला जातो. मात्र, बालक व ज्येष्ठ नागरिक यांच्यामध्ये रोगप्रतिकारकशक्ती कमी असल्याने त्यांना ताप, सर्दी, खोकला आदी 

थंडीचा ऋतू हा आरोग्यासाठी चांगला मानला जातो. व्यायामासठी शक्यतो सकाळीच बाहेर पडणे गरजेचे असते. सकाळी प्रदूषणाचे प्रमाण कमी असते. सोलापुरात धुळीचे प्रमाण जास्त असल्यामुळे स्कार्फ किंवा मास्क तोंडाला बांधावा. फुफ्फुसाचा आजार असणाºया रुग्णांनी नियमितपणे औषधे घ्यावीत. दम्याच्या रुग्णांनी त्यांना दिलेला पंपही वापरावा.- डॉ. विशाल गोरे, एमडी मेडिसीन

थंडीतही रोज दीड ते दोन लिटर पाणी प्यावे- हिवाळ्यात थंड तापमानामुळे सारखी तहान लागत नाही, म्हणून काही लोकांचे पाणी पिण्याचे प्रमाण खूप कमी होते. यामुळे याकडे लक्ष देत रोज दीड ते दोन लिटर पाणी पिणे गरजेचे आहे. हिवाळ्यात दिवस लहान असतो, त्यामुळे काहींचे वेळेचे व्यवस्थापन नीट होत नाही. थंडीत सकाळी लवकर उठावेसेही वाटत नाही. त्यामुळे व्यायामाचे नियोजन नीट होत नाही. व्यायाम करणे शरीराला आवश्यक आहे. आपण पौष्टिक पदार्थ खातो व पचनशक्तीही योग्य असते, तरीसुद्धा व्यायाम नसेल तर शरीराला या पोषकतत्त्वांचा योग्य वापर करता येणार नाही. त्यामुळे सर्वांनीच आपल्या हिवाळ्यातील आहाराचे नियोजन भरपूर पोषकतत्त्वयुक्त पदार्थांचे सेवन करण्याची गरज आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरTemperatureतापमान