शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
4
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
5
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
6
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
7
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
8
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
9
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
10
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
11
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
12
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
13
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
14
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
15
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
16
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
18
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
19
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
20
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी

सोलापूरकरांनो विमानाने मुंबई, दिल्लीला जायचंय.. मग कर्नाटकचा रस्ता धरा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 12:10 IST

उद्योजकांमध्ये नाराजी; सोलापूर आधी विजापुरात होतेय आंतरराष्ट्रीय विमानतळ

ठळक मुद्देसोलापूर हे राज्यातील महत्त्वाचे औद्योगिक शहर म्हणून ओळखले जात होतेयेथे योग्य सेवा, सुविधा नसल्याने शहराचा म्हणावा तसा विकास झाला नाहीतसे पाहायला गेलो तर सोलापुरात विमानसेवा खूप आधीपासून सुरू व्हायला हवी होती

सोलापूर : शहरातून कमी वेळात मुंबई, दिल्लीला जायचंय...तर मग आधी विजयपूरला जावं लागेल. कारण सोलापूरच्या मागून विजापुरात आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होत आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात ९५ कोटी रुपयांचा निधी मिळाला असून, २०२२ मध्ये हे विमानतळ सुरु होणार आहे. सोलापुरातील उद्योगवाढीसाठी विमानतळ गरजेचे असताना ते होत नसल्याबद्दल उद्योजकांत नाराजी आहे.

उद्योजक तसेच इतरांच्या प्रयत्नामुळे किंगफिशरची विमानसेवा सुरू झाली. काही काळानंतर ही सेवा बंद झाली. केंद्र सरकारच्या उडान योजनेत सोलापूरचा तीनदा सहभाग झाला, पण प्रत्यक्षात विमानसेवा  सुरू झालीच नाही. साखर कारखान्याच्या चिमणीचा अडथळा देखील आला. 

विमान उतरण्यासाठी व उड्डाण करण्यासाठी दोन्ही बाजू रिकाम्या असाव्या लागतात. नेमका हाच अडथळा येत असल्याचे विमानतळ सल्लागार समितीचे माजी सदस्य केतन शहा यांनी सांगितले.

विजापूर येथील विमानतळासाठी कर्नाटक शासनाने २२० कोटी रुपये मंजूर केले आहेत. विजापूर शहरापासून १५ किलोमीटर अंतरावर मदभावी आणि बुºहाणपूर या परिसरात ७२७ एकर  जमीन हस्तांतरण करण्यात आली आहे. 

२०२२ मध्ये विमानतळ सुरू झाल्यास दुबई, मुंबई, पुणे, दिल्ली, बंगळुरु, हैदराबाद, तिरुपती, चेन्नई या देशांतर्गत व परदेशातून विमानसेवा शक्य होईल. यामुळे सोलापूरकरांना आता स्वत:ची विमानसेवा ऐवजी विजापूरच्या विमानसेवेवर अवलंबून रहावे लागणार आहे.

होटगी रोडची सेवा असावीराज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात बैठक घेतली होती. सोलापूरच्या बोरामणी येथील विमानतळासाठी ५० कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिल्याचे आमदार प्रणिती शिंदे यांनी पाच महिन्यांपूर्वी सांगितले होते. या विषयी मी चौकशी केली असता पैसे तर दूर राहिले त्या बैठकीचे मिनिटस्देखील कोणत्याच खात्याकडे नाहीत. बोरामणी येथे विमानतळ होईल तेव्हा होईल तोपर्यंत होटगी रोड विमानतळावरुन विमान सेवा चालू करायला हवी, असे विमानतळ सल्लागार समितीचे माजी सदस्य केतन शहा यांनी सांगितले.

सोलापूर हे राज्यातील महत्त्वाचे औद्योगिक शहर म्हणून ओळखले जात होते. येथे योग्य सेवा, सुविधा नसल्याने शहराचा म्हणावा तसा विकास झाला नाही. तसे पाहायला गेलो तर सोलापुरात विमानसेवा खूप आधीपासून सुरू व्हायला हवी होती, पण तसे होताना दिसत नाही. यापुढे तरी लवकर विमानसेवा शहरात सुरू व्हावी, शहराची प्रगती व्हावी अशी अपेक्षा बाळगू या. - राजेश गोसकी, अध्यक्ष, टेक्स्टाईल डेव्हलपमेंट फाउंडेशन.

टॅग्स :Solapurसोलापूरbusinessव्यवसायKarnatakकर्नाटकAirportविमानतळ