शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरकरांनो विमानाने मुंबई, दिल्लीला जायचंय.. मग कर्नाटकचा रस्ता धरा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 12:10 IST

उद्योजकांमध्ये नाराजी; सोलापूर आधी विजापुरात होतेय आंतरराष्ट्रीय विमानतळ

ठळक मुद्देसोलापूर हे राज्यातील महत्त्वाचे औद्योगिक शहर म्हणून ओळखले जात होतेयेथे योग्य सेवा, सुविधा नसल्याने शहराचा म्हणावा तसा विकास झाला नाहीतसे पाहायला गेलो तर सोलापुरात विमानसेवा खूप आधीपासून सुरू व्हायला हवी होती

सोलापूर : शहरातून कमी वेळात मुंबई, दिल्लीला जायचंय...तर मग आधी विजयपूरला जावं लागेल. कारण सोलापूरच्या मागून विजापुरात आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होत आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात ९५ कोटी रुपयांचा निधी मिळाला असून, २०२२ मध्ये हे विमानतळ सुरु होणार आहे. सोलापुरातील उद्योगवाढीसाठी विमानतळ गरजेचे असताना ते होत नसल्याबद्दल उद्योजकांत नाराजी आहे.

उद्योजक तसेच इतरांच्या प्रयत्नामुळे किंगफिशरची विमानसेवा सुरू झाली. काही काळानंतर ही सेवा बंद झाली. केंद्र सरकारच्या उडान योजनेत सोलापूरचा तीनदा सहभाग झाला, पण प्रत्यक्षात विमानसेवा  सुरू झालीच नाही. साखर कारखान्याच्या चिमणीचा अडथळा देखील आला. 

विमान उतरण्यासाठी व उड्डाण करण्यासाठी दोन्ही बाजू रिकाम्या असाव्या लागतात. नेमका हाच अडथळा येत असल्याचे विमानतळ सल्लागार समितीचे माजी सदस्य केतन शहा यांनी सांगितले.

विजापूर येथील विमानतळासाठी कर्नाटक शासनाने २२० कोटी रुपये मंजूर केले आहेत. विजापूर शहरापासून १५ किलोमीटर अंतरावर मदभावी आणि बुºहाणपूर या परिसरात ७२७ एकर  जमीन हस्तांतरण करण्यात आली आहे. 

२०२२ मध्ये विमानतळ सुरू झाल्यास दुबई, मुंबई, पुणे, दिल्ली, बंगळुरु, हैदराबाद, तिरुपती, चेन्नई या देशांतर्गत व परदेशातून विमानसेवा शक्य होईल. यामुळे सोलापूरकरांना आता स्वत:ची विमानसेवा ऐवजी विजापूरच्या विमानसेवेवर अवलंबून रहावे लागणार आहे.

होटगी रोडची सेवा असावीराज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात बैठक घेतली होती. सोलापूरच्या बोरामणी येथील विमानतळासाठी ५० कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिल्याचे आमदार प्रणिती शिंदे यांनी पाच महिन्यांपूर्वी सांगितले होते. या विषयी मी चौकशी केली असता पैसे तर दूर राहिले त्या बैठकीचे मिनिटस्देखील कोणत्याच खात्याकडे नाहीत. बोरामणी येथे विमानतळ होईल तेव्हा होईल तोपर्यंत होटगी रोड विमानतळावरुन विमान सेवा चालू करायला हवी, असे विमानतळ सल्लागार समितीचे माजी सदस्य केतन शहा यांनी सांगितले.

सोलापूर हे राज्यातील महत्त्वाचे औद्योगिक शहर म्हणून ओळखले जात होते. येथे योग्य सेवा, सुविधा नसल्याने शहराचा म्हणावा तसा विकास झाला नाही. तसे पाहायला गेलो तर सोलापुरात विमानसेवा खूप आधीपासून सुरू व्हायला हवी होती, पण तसे होताना दिसत नाही. यापुढे तरी लवकर विमानसेवा शहरात सुरू व्हावी, शहराची प्रगती व्हावी अशी अपेक्षा बाळगू या. - राजेश गोसकी, अध्यक्ष, टेक्स्टाईल डेव्हलपमेंट फाउंडेशन.

टॅग्स :Solapurसोलापूरbusinessव्यवसायKarnatakकर्नाटकAirportविमानतळ