शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरचा युवक तीन महिन्यांपासून नेपाळमध्ये बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 12:36 IST

हतबल मायबाप लेकराच्या शोधात : पोलिसांचाही शोध सुरू; सरकारने हस्तक्षेप करण्याची कुटुंबाची मागणी

ठळक मुद्देरोजगारासाठी दीपक जयराम गोडसे यांच्याबरोबर नेपाळला गेलानेपाळमधील गोरखा या ठिकाणी सोने-चांदीच्या दुकानात कामासाठी गेला़ शिंगोर्णी गावातील ३० ते ३५ तरुणांची रोजगारासाठी कुठे ना कुठे भटकंती

माळशिरस : माळशिरस तालुक्यातील शिंगोर्णी  हे दुष्काळाच्या छायेतील गाव़ संसाराला हातभार लागाव म्हणून वडील  बाळू साठे यांनी विकासला कामासाठी नेपाळमध्ये पाठवले. तेथे गेल्यापासून तो संपर्कात होता. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून त्याचा संपर्कच होईना. तो बेपत्ता झाला की काय या चिंतेत त्याच्या कुटूंबातील सदस्य बसले आहेत. राज्य सरकारने त्याचा शोध घ्यावा, अशी मागणी साठे कुटूंबीयाने केली आहे. 

अपंग वडील, आई, तीन भाऊ, दोन बहिणी असे हे साठे कुटुंब़ त्यातील थोरला भाऊ सागर आपले कुटुंब व आईला घेऊन ऊस तोडणीसाठी कोल्हापुरातील कागलच्या साखर कारखाना कार्यक्षेत्रात गेला़ एका बहिणीचे लग्न झाले व ती बाळंतपणासाठी गावाकडे आली. वडील, दोन लहान भाऊ व एक बहीण घरीच होते. पैशाची चणचण वाढू लागली़ बहिणीच्या बाळंतपणाचा खर्च भागविण्यासाठी वडील बाळू साठे यांनी गावातील दीपक गोडसे यांच्याकडून पैसे घेऊन १६ वर्षीय विकासला जानेवारी २०१८ मध्ये कामासाठी नेपाळला पाठवले़ तो तेथे गेल्यानंतर कुटुंबाच्या संपर्कात होता, मात्र गेल्या तीन महिन्यांपासून त्याचा संपर्क होईना अन् इकडे त्याचे मायबाप लेकराच्या शोधात हतबल झाले आहेत़ 

शिंगोर्णी गावातील ३० ते ३५ तरुणांची रोजगारासाठी कुठे ना कुठे भटकंती कायम असते. घरच्या परिस्थितीमुळे कोवळ्या वयातच शिक्षणाला रामराम ठोकून ही मुले रोजगाराच्या वाटा शोधण्यासाठी बाहेर पडतात़ सोलापूर-सांगली जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या शिंगोर्णी गावातील विकास साठे हाही रोजगारासाठी दीपक जयराम गोडसे यांच्याबरोबर नेपाळला गेला. 

१२ जानेवारी २०१८ रोजी तो नेपाळमधील गोरखा या ठिकाणी सोने-चांदीच्या दुकानात कामासाठी गेला़ त्यानंतर मे २०१८ पर्यंत त्याचा संपर्क होत होता, मात्र गेल्या तीन महिन्यांपासून त्याचा संपर्क नाही़ त्यानंतर विकासच्या आईने दीपक गोडसे यांना संपर्क करून माहिती विचारली असता तो आपल्याबरोबर नाही, असे उत्तर मिळाले़ त्यानंतर त्याच्या आईने माळशिरस पोलीस ठाणे गाठले़ पोलिसांकडे मदतीची अपेक्षा केली़ मात्र अपुºया माहितीमुळे पोलिसांनाही तपासाची दिशा मिळेना़ 

मदतीची अपेक्षाच्साठे कुटुंबातील आई, वडील, भाऊ हे नेपाळमध्ये हरवलेल्या विकास साठे याचा शोध घेण्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून फिरत आहेत, मात्र त्यांना लोकप्रतिनिधी अथवा प्रशासनाकडून ठोस दिशा मिळत नाही. यासाठी आता राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी हे हतबल कुटुंब करीत आहे़ कारण तेथील सरकारशी बोलणी झाल्यानंतरच यातून मार्ग निघणार आहे. सध्या विकास हा तेथून निघून गेला की चुकला, भाषेची अडचण, कोणाला भेटावे व यात कोण मदत करेल? असा प्रश्न साठे कुटुंबाला पडला आहे़ 

आम्ही ऊस तोडणीसाठी गेलो असता माझा भाऊ विकास हा कामासाठी वडिलांना सांगून दीपक गोडसे यांच्याबरोबर नेपाळला गेला़ मात्र गेल्या तीन महिन्यांपासून तो संपर्कात नाही़ शिवाय तो गोडसे यांच्याबरोबरही नाही़ मग तो कोठे असेल? काय करीत असेल? असा प्रश्न पडतोय़ आता माझा भाऊ शोधण्यासाठी शासन, प्रशासनाने पुढाकार घ्यावा, हीच अपेक्षा आहे़- सागर साठे, विकासचा भाऊ 

टॅग्स :SolapurसोलापूरNepalनेपाळSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस