शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

सोलापूरचा युवक तीन महिन्यांपासून नेपाळमध्ये बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 12:36 IST

हतबल मायबाप लेकराच्या शोधात : पोलिसांचाही शोध सुरू; सरकारने हस्तक्षेप करण्याची कुटुंबाची मागणी

ठळक मुद्देरोजगारासाठी दीपक जयराम गोडसे यांच्याबरोबर नेपाळला गेलानेपाळमधील गोरखा या ठिकाणी सोने-चांदीच्या दुकानात कामासाठी गेला़ शिंगोर्णी गावातील ३० ते ३५ तरुणांची रोजगारासाठी कुठे ना कुठे भटकंती

माळशिरस : माळशिरस तालुक्यातील शिंगोर्णी  हे दुष्काळाच्या छायेतील गाव़ संसाराला हातभार लागाव म्हणून वडील  बाळू साठे यांनी विकासला कामासाठी नेपाळमध्ये पाठवले. तेथे गेल्यापासून तो संपर्कात होता. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून त्याचा संपर्कच होईना. तो बेपत्ता झाला की काय या चिंतेत त्याच्या कुटूंबातील सदस्य बसले आहेत. राज्य सरकारने त्याचा शोध घ्यावा, अशी मागणी साठे कुटूंबीयाने केली आहे. 

अपंग वडील, आई, तीन भाऊ, दोन बहिणी असे हे साठे कुटुंब़ त्यातील थोरला भाऊ सागर आपले कुटुंब व आईला घेऊन ऊस तोडणीसाठी कोल्हापुरातील कागलच्या साखर कारखाना कार्यक्षेत्रात गेला़ एका बहिणीचे लग्न झाले व ती बाळंतपणासाठी गावाकडे आली. वडील, दोन लहान भाऊ व एक बहीण घरीच होते. पैशाची चणचण वाढू लागली़ बहिणीच्या बाळंतपणाचा खर्च भागविण्यासाठी वडील बाळू साठे यांनी गावातील दीपक गोडसे यांच्याकडून पैसे घेऊन १६ वर्षीय विकासला जानेवारी २०१८ मध्ये कामासाठी नेपाळला पाठवले़ तो तेथे गेल्यानंतर कुटुंबाच्या संपर्कात होता, मात्र गेल्या तीन महिन्यांपासून त्याचा संपर्क होईना अन् इकडे त्याचे मायबाप लेकराच्या शोधात हतबल झाले आहेत़ 

शिंगोर्णी गावातील ३० ते ३५ तरुणांची रोजगारासाठी कुठे ना कुठे भटकंती कायम असते. घरच्या परिस्थितीमुळे कोवळ्या वयातच शिक्षणाला रामराम ठोकून ही मुले रोजगाराच्या वाटा शोधण्यासाठी बाहेर पडतात़ सोलापूर-सांगली जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या शिंगोर्णी गावातील विकास साठे हाही रोजगारासाठी दीपक जयराम गोडसे यांच्याबरोबर नेपाळला गेला. 

१२ जानेवारी २०१८ रोजी तो नेपाळमधील गोरखा या ठिकाणी सोने-चांदीच्या दुकानात कामासाठी गेला़ त्यानंतर मे २०१८ पर्यंत त्याचा संपर्क होत होता, मात्र गेल्या तीन महिन्यांपासून त्याचा संपर्क नाही़ त्यानंतर विकासच्या आईने दीपक गोडसे यांना संपर्क करून माहिती विचारली असता तो आपल्याबरोबर नाही, असे उत्तर मिळाले़ त्यानंतर त्याच्या आईने माळशिरस पोलीस ठाणे गाठले़ पोलिसांकडे मदतीची अपेक्षा केली़ मात्र अपुºया माहितीमुळे पोलिसांनाही तपासाची दिशा मिळेना़ 

मदतीची अपेक्षाच्साठे कुटुंबातील आई, वडील, भाऊ हे नेपाळमध्ये हरवलेल्या विकास साठे याचा शोध घेण्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून फिरत आहेत, मात्र त्यांना लोकप्रतिनिधी अथवा प्रशासनाकडून ठोस दिशा मिळत नाही. यासाठी आता राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी हे हतबल कुटुंब करीत आहे़ कारण तेथील सरकारशी बोलणी झाल्यानंतरच यातून मार्ग निघणार आहे. सध्या विकास हा तेथून निघून गेला की चुकला, भाषेची अडचण, कोणाला भेटावे व यात कोण मदत करेल? असा प्रश्न साठे कुटुंबाला पडला आहे़ 

आम्ही ऊस तोडणीसाठी गेलो असता माझा भाऊ विकास हा कामासाठी वडिलांना सांगून दीपक गोडसे यांच्याबरोबर नेपाळला गेला़ मात्र गेल्या तीन महिन्यांपासून तो संपर्कात नाही़ शिवाय तो गोडसे यांच्याबरोबरही नाही़ मग तो कोठे असेल? काय करीत असेल? असा प्रश्न पडतोय़ आता माझा भाऊ शोधण्यासाठी शासन, प्रशासनाने पुढाकार घ्यावा, हीच अपेक्षा आहे़- सागर साठे, विकासचा भाऊ 

टॅग्स :SolapurसोलापूरNepalनेपाळSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस