शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

सोलापूरचा युवक तीन महिन्यांपासून नेपाळमध्ये बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 12:36 IST

हतबल मायबाप लेकराच्या शोधात : पोलिसांचाही शोध सुरू; सरकारने हस्तक्षेप करण्याची कुटुंबाची मागणी

ठळक मुद्देरोजगारासाठी दीपक जयराम गोडसे यांच्याबरोबर नेपाळला गेलानेपाळमधील गोरखा या ठिकाणी सोने-चांदीच्या दुकानात कामासाठी गेला़ शिंगोर्णी गावातील ३० ते ३५ तरुणांची रोजगारासाठी कुठे ना कुठे भटकंती

माळशिरस : माळशिरस तालुक्यातील शिंगोर्णी  हे दुष्काळाच्या छायेतील गाव़ संसाराला हातभार लागाव म्हणून वडील  बाळू साठे यांनी विकासला कामासाठी नेपाळमध्ये पाठवले. तेथे गेल्यापासून तो संपर्कात होता. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून त्याचा संपर्कच होईना. तो बेपत्ता झाला की काय या चिंतेत त्याच्या कुटूंबातील सदस्य बसले आहेत. राज्य सरकारने त्याचा शोध घ्यावा, अशी मागणी साठे कुटूंबीयाने केली आहे. 

अपंग वडील, आई, तीन भाऊ, दोन बहिणी असे हे साठे कुटुंब़ त्यातील थोरला भाऊ सागर आपले कुटुंब व आईला घेऊन ऊस तोडणीसाठी कोल्हापुरातील कागलच्या साखर कारखाना कार्यक्षेत्रात गेला़ एका बहिणीचे लग्न झाले व ती बाळंतपणासाठी गावाकडे आली. वडील, दोन लहान भाऊ व एक बहीण घरीच होते. पैशाची चणचण वाढू लागली़ बहिणीच्या बाळंतपणाचा खर्च भागविण्यासाठी वडील बाळू साठे यांनी गावातील दीपक गोडसे यांच्याकडून पैसे घेऊन १६ वर्षीय विकासला जानेवारी २०१८ मध्ये कामासाठी नेपाळला पाठवले़ तो तेथे गेल्यानंतर कुटुंबाच्या संपर्कात होता, मात्र गेल्या तीन महिन्यांपासून त्याचा संपर्क होईना अन् इकडे त्याचे मायबाप लेकराच्या शोधात हतबल झाले आहेत़ 

शिंगोर्णी गावातील ३० ते ३५ तरुणांची रोजगारासाठी कुठे ना कुठे भटकंती कायम असते. घरच्या परिस्थितीमुळे कोवळ्या वयातच शिक्षणाला रामराम ठोकून ही मुले रोजगाराच्या वाटा शोधण्यासाठी बाहेर पडतात़ सोलापूर-सांगली जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या शिंगोर्णी गावातील विकास साठे हाही रोजगारासाठी दीपक जयराम गोडसे यांच्याबरोबर नेपाळला गेला. 

१२ जानेवारी २०१८ रोजी तो नेपाळमधील गोरखा या ठिकाणी सोने-चांदीच्या दुकानात कामासाठी गेला़ त्यानंतर मे २०१८ पर्यंत त्याचा संपर्क होत होता, मात्र गेल्या तीन महिन्यांपासून त्याचा संपर्क नाही़ त्यानंतर विकासच्या आईने दीपक गोडसे यांना संपर्क करून माहिती विचारली असता तो आपल्याबरोबर नाही, असे उत्तर मिळाले़ त्यानंतर त्याच्या आईने माळशिरस पोलीस ठाणे गाठले़ पोलिसांकडे मदतीची अपेक्षा केली़ मात्र अपुºया माहितीमुळे पोलिसांनाही तपासाची दिशा मिळेना़ 

मदतीची अपेक्षाच्साठे कुटुंबातील आई, वडील, भाऊ हे नेपाळमध्ये हरवलेल्या विकास साठे याचा शोध घेण्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून फिरत आहेत, मात्र त्यांना लोकप्रतिनिधी अथवा प्रशासनाकडून ठोस दिशा मिळत नाही. यासाठी आता राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी हे हतबल कुटुंब करीत आहे़ कारण तेथील सरकारशी बोलणी झाल्यानंतरच यातून मार्ग निघणार आहे. सध्या विकास हा तेथून निघून गेला की चुकला, भाषेची अडचण, कोणाला भेटावे व यात कोण मदत करेल? असा प्रश्न साठे कुटुंबाला पडला आहे़ 

आम्ही ऊस तोडणीसाठी गेलो असता माझा भाऊ विकास हा कामासाठी वडिलांना सांगून दीपक गोडसे यांच्याबरोबर नेपाळला गेला़ मात्र गेल्या तीन महिन्यांपासून तो संपर्कात नाही़ शिवाय तो गोडसे यांच्याबरोबरही नाही़ मग तो कोठे असेल? काय करीत असेल? असा प्रश्न पडतोय़ आता माझा भाऊ शोधण्यासाठी शासन, प्रशासनाने पुढाकार घ्यावा, हीच अपेक्षा आहे़- सागर साठे, विकासचा भाऊ 

टॅग्स :SolapurसोलापूरNepalनेपाळSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस