शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
2
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
3
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
4
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
5
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
6
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
7
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
8
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
9
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
10
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
11
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
12
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
13
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
14
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
16
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
17
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
18
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
19
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
20
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर मागे जाणार नाही; १५ वर्षे पुढे न्यायचंय !

By admin | Updated: May 18, 2014 00:02 IST

शरद बनसोडे : गंभीरतेने राजकारण, समाजकारण करणार

 

सोलापूर : सुशीलकुमार शिंदे यांच्या पराभवामुळे सोलापूर मागे जाईल, अशी भीती एका वर्गाला वाटत आहे; पण तसे होणार नाही. आगामी पाच वर्षांत सोलापूरला १५ वर्षे पुढे न्यायचे आहे. यासाठी मी अगदी जमिनीवर राहून अतिशय गंभीरतेने, समन्वयाने राजकारण आणि समाजकारण करणार आहे, असा निर्धार नवनिर्वाचित खासदार अ‍ॅड. शरद बनसोडे यांनी आज येथे व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीत सोलापुरातून दीड लाखावर मतांनी विजय संपादन केल्यानंतर अ‍ॅड. बनसोडे यांनी प्रसिध्दी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, सुशीलकुमार हे मनमिळाऊ आहेत आणि सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याची त्यांच्याकडे हातोटी आहे. त्यांचा पराभव झाल्यामुळे सोलापूर मागे जाईल, अशी भीती मतदारसंघातील एक वर्ग व्यक्त करीत आहे; पण मी संपूर्ण वेळ देऊन येथे काम करणार आहे. प्रारंभीच्या काळात मंगळवार, बुधवार आणि गुरूवार हे आठवड्यातील तीन दिवस मी सोलापुरात राहणार आहे. त्यातील मंगळवारचा दिवस सोलापूर शहरातील कामांसाठी देणार आहे. बुधवार आणि गुरूवारी दुपारी १ वाजेपर्यंत शहरात थांबणार आहे आणि त्यानंतर हे दोन दिवस ग्रामीण भागात राहणार आहे. काही दिवसांनंतर मुंबईतील माझा व्यवसाय पूर्ण बंद करून सोलापुरातच वास्तव्य करणार आहे, असे त्यांनी सांगितले. अ‍ॅड. बनसोडे यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना सोलापुरात प्राधान्याने कोणती कामे करायची, याबाबत मार्गदर्शन करण्याची विनंती केली; पण पत्रकारांनीच बनसोडे यांचा हा चेंडू पुन्हा त्यांच्या कोर्टात टाकून त्यांनीच प्राधान्य कामांचा क्रम सांगावा, अशी विचारणा केली. यावर अ‍ॅड. बनसोडे म्हणाले, मूल्यवर्धित कर व्यापार्‍यांना परवडतो, तो देण्याची त्यांची तयारीही आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक संस्था कर अर्थात एलबीटी हटविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. हा कर रद्द केल्यानंतर महापालिकेचे उत्पन्न कमी होऊ नये, यासाठी समग्र निधी स्थापण्याची सरकारकडे विनंती करणार आहे. सोलापुरातील हातमाग उद्योग वाढीस लावण्यासाठी आणि त्याला संरक्षण देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. शिवाय औद्योगिक वसाहतींमध्ये बंद पडलेल्या कारखान्यांच्या जागी नवीन उद्योग सुरू करणे किंवा तो कारखाना पुन्हा चालू कसा होईल, यासाठीही माझे प्रयत्न असतील, असे ते म्हणाले.

-----------------------------

मला समजा शिंदेंचा प्रतिनिधी: बनसोडे

सोलापूरसाठी विमान सेवा सुरू करण्याला प्राधान्य देणार असून, ‘गो एअर’विमानसेवा सुरु करण्याचा प्रयत्न

चेंबरच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा करुन एलबीटी रद्द करण्यासाठी निवेदन करणार आणि थेट नरेंद्र मोदींना साकडे घालणार

नजीक पंढरपूर, तुळजापूर आणि अक्कलकोट ही तीर्थक्षेत्रे आहेत. त्या पार्श्वभूमीवर सोलापूर हे पर्यटन केंद्र म्हणून विकसित होऊ शकते. यासाठी विशेष प्रयत्न करणार

मंगळवेढा तालुक्यातील ३५ गावांचा पाणीप्रश्न गंभीर आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी आपण नंदेश्वर येथे पाणी परिषद घेणार ४सोलापूरचा विकास करण्यासाठी मी सकारात्मक पावले उचलणार असून, सुशीलकुमार शिंदे खासदार नाहीत म्हणून काही फरक पडणार नाही.

बदल हा निसर्गाचा नियम आहे. सोलापूरचे प्रश्न तांत्रिक पध्दतीने मांडणे जमले नाही तर ते भावनिक पातळीवर तरी मी मांडू शकतो. सोलापूरच्या विकासासाठी हवे तर मला शिंदे यांचा प्रतिनिधी समजा..