शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

सोलापूर मागे जाणार नाही; १५ वर्षे पुढे न्यायचंय !

By admin | Updated: May 18, 2014 00:02 IST

शरद बनसोडे : गंभीरतेने राजकारण, समाजकारण करणार

 

सोलापूर : सुशीलकुमार शिंदे यांच्या पराभवामुळे सोलापूर मागे जाईल, अशी भीती एका वर्गाला वाटत आहे; पण तसे होणार नाही. आगामी पाच वर्षांत सोलापूरला १५ वर्षे पुढे न्यायचे आहे. यासाठी मी अगदी जमिनीवर राहून अतिशय गंभीरतेने, समन्वयाने राजकारण आणि समाजकारण करणार आहे, असा निर्धार नवनिर्वाचित खासदार अ‍ॅड. शरद बनसोडे यांनी आज येथे व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीत सोलापुरातून दीड लाखावर मतांनी विजय संपादन केल्यानंतर अ‍ॅड. बनसोडे यांनी प्रसिध्दी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, सुशीलकुमार हे मनमिळाऊ आहेत आणि सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याची त्यांच्याकडे हातोटी आहे. त्यांचा पराभव झाल्यामुळे सोलापूर मागे जाईल, अशी भीती मतदारसंघातील एक वर्ग व्यक्त करीत आहे; पण मी संपूर्ण वेळ देऊन येथे काम करणार आहे. प्रारंभीच्या काळात मंगळवार, बुधवार आणि गुरूवार हे आठवड्यातील तीन दिवस मी सोलापुरात राहणार आहे. त्यातील मंगळवारचा दिवस सोलापूर शहरातील कामांसाठी देणार आहे. बुधवार आणि गुरूवारी दुपारी १ वाजेपर्यंत शहरात थांबणार आहे आणि त्यानंतर हे दोन दिवस ग्रामीण भागात राहणार आहे. काही दिवसांनंतर मुंबईतील माझा व्यवसाय पूर्ण बंद करून सोलापुरातच वास्तव्य करणार आहे, असे त्यांनी सांगितले. अ‍ॅड. बनसोडे यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना सोलापुरात प्राधान्याने कोणती कामे करायची, याबाबत मार्गदर्शन करण्याची विनंती केली; पण पत्रकारांनीच बनसोडे यांचा हा चेंडू पुन्हा त्यांच्या कोर्टात टाकून त्यांनीच प्राधान्य कामांचा क्रम सांगावा, अशी विचारणा केली. यावर अ‍ॅड. बनसोडे म्हणाले, मूल्यवर्धित कर व्यापार्‍यांना परवडतो, तो देण्याची त्यांची तयारीही आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक संस्था कर अर्थात एलबीटी हटविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. हा कर रद्द केल्यानंतर महापालिकेचे उत्पन्न कमी होऊ नये, यासाठी समग्र निधी स्थापण्याची सरकारकडे विनंती करणार आहे. सोलापुरातील हातमाग उद्योग वाढीस लावण्यासाठी आणि त्याला संरक्षण देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. शिवाय औद्योगिक वसाहतींमध्ये बंद पडलेल्या कारखान्यांच्या जागी नवीन उद्योग सुरू करणे किंवा तो कारखाना पुन्हा चालू कसा होईल, यासाठीही माझे प्रयत्न असतील, असे ते म्हणाले.

-----------------------------

मला समजा शिंदेंचा प्रतिनिधी: बनसोडे

सोलापूरसाठी विमान सेवा सुरू करण्याला प्राधान्य देणार असून, ‘गो एअर’विमानसेवा सुरु करण्याचा प्रयत्न

चेंबरच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा करुन एलबीटी रद्द करण्यासाठी निवेदन करणार आणि थेट नरेंद्र मोदींना साकडे घालणार

नजीक पंढरपूर, तुळजापूर आणि अक्कलकोट ही तीर्थक्षेत्रे आहेत. त्या पार्श्वभूमीवर सोलापूर हे पर्यटन केंद्र म्हणून विकसित होऊ शकते. यासाठी विशेष प्रयत्न करणार

मंगळवेढा तालुक्यातील ३५ गावांचा पाणीप्रश्न गंभीर आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी आपण नंदेश्वर येथे पाणी परिषद घेणार ४सोलापूरचा विकास करण्यासाठी मी सकारात्मक पावले उचलणार असून, सुशीलकुमार शिंदे खासदार नाहीत म्हणून काही फरक पडणार नाही.

बदल हा निसर्गाचा नियम आहे. सोलापूरचे प्रश्न तांत्रिक पध्दतीने मांडणे जमले नाही तर ते भावनिक पातळीवर तरी मी मांडू शकतो. सोलापूरच्या विकासासाठी हवे तर मला शिंदे यांचा प्रतिनिधी समजा..