शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

सोलापूर विद्यापीठ नामांतर वाद : सरकारी योजनेला सोलापूरच्या सिद्धेश्वरांचे नाव देऊन होणार सन्मान, जलसंधारण मंत्री राम शिंदे यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 14:10 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देताना महात्मा बसवेश्वर आणि श्री सिध्देश्वर यांचाही तेवढ्याच तोलामोलाचा सन्मान होईल, असे जाहीर केले आहे. त्यानुसार आगामी दिवसात एखाद्या सरकारी योजनेला बसवेश्वर आणि सिध्देश्वर महाराज यांचे नाव येऊ शकेल, असे मत जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केले. 

ठळक मुद्देशासनाने सोलापूर विद्यापीठाचे नामकरण केल्यानंतर काही समाजकंटक त्याचे राजकारण करीत आहेतबसवेश्वर आणि सिध्देश्वर यांचाही तोलामोलाचा सन्मान होणार पुणे विभागात ८२३ गावांची निवड

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १६  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देताना महात्मा बसवेश्वर आणि श्री सिध्देश्वर यांचाही तेवढ्याच तोलामोलाचा सन्मान होईल, असे जाहीर केले आहे. त्यानुसार आगामी दिवसात एखाद्या सरकारी योजनेला बसवेश्वर आणि सिध्देश्वर महाराज यांचे नाव येऊ शकेल, असे मत जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केले. येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत जलसंधारण मंत्री प्रा. शिंदे म्हणाले की, अहिल्यादेवी होळकर, महात्मा बसवेश्वर आणि सिध्देश्वर हे सर्व महादेव भक्त आहेत. शासनाने सोलापूर विद्यापीठाचे नामकरण केल्यानंतर काही समाजकंटक त्याचे राजकारण करीत आहेत. बसवेश्वर आणि सिध्देश्वर यांचाही तोलामोलाचा सन्मान होणार आहे. धनगर आरक्षण आंदोलनात विद्यापीठाच्या नामकरणाबाबत मागणी करण्यात आली होती. इतर मागण्याही पूर्ण होत आहेत, असेही त्यांनी सांगितले. जलयुक्त शिवार योजनेत पुणे, सोलापूर जिल्ह्यातील कामे उत्कृष्ट आहेत. सांगली जिल्हा मागे आहे. शेतकºयांसाठी मूलभूत, पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. पत्रकार परिषदेला भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार उपस्थित होते. ----------------------पुणे विभागात ८२३ गावांची निवडजलयुक्त शिवारमधून २०१७-१८ मध्ये पुणे विभागात ८२३ गावांची निवड करण्यात आली आहे. गावस्तरावर पाणलोटाचे मॅप तयार करण्यात आले आहेत. ग्रामस्तरावर १४ जुलै ते १५ सप्टेंबरपर्यंत प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे. या प्रशिक्षणात गावस्तरावरील सरासरी पाच प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात आले आहे. -----------------गडकरींमुळे स्थिरीकरणाबद्दल आशाकृष्णा-भीमा आणि सीना स्थिरीकरणाचा विषय गेल्या अनेक वर्षांपासूनचा आहे. हा विषय केंद्रीय मंत्र्यांकडे आहे. सुदैैवाने नितीन गडकरी यांच्याकडे हे खाते आहे. त्यांच्याकडे हा विषय विचाराधीन आहे. त्यांनी या विषयांबाबत बजेटची तरतूदही केली आहे, असेही प्रा. शिंदे यांनी सांगितले.