शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
2
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
3
लष्करी जवानाकडे हेरॉईन सापडले; श्रीनगरहून पंजाबला करत होता तस्करी, अटकेमुळे खळबळ
4
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं
5
पाकिस्तानी गर्लफ्रेंडला भेटणं भारतीय बॉयफ्रेंडच्या अंगाशी आलं! तुरुंगात कैद होऊन आता म्हणतोय...
6
शिखर धवनची कर्नल सोफिया कुरेशी यांच्यासाठी खास पोस्ट, म्हणाला- 'भारतीय मुस्लिमांना...'
7
तुम्ही भारतातूनही ऑनलाइन स्विस बँकेत खाते उघडू शकता; कशी असते प्रक्रिया? कोणते कागदपत्रे हवीत?
8
"आंबेडकर मालिकेच्या वेळेस साताऱ्यातून एक माणूस भेटायला आला अन्.." अभिनेत्याने सांगितला अंगावर काटा आणणारा किस्सा
9
Maharashtra Politics :'फडणवीसांनी डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत मानावं', संजय राऊतांची भाजपावर टीका
10
Mumbai: मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
11
वेळ काय, तुम्ही बोलता काय...; कर्नल सोफिया यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या विजय शाहंना कोर्टाने फटकारलं
12
४० हजारांचं पॅकेज, ५ तासांची सर्जरी... हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्या अनुष्काबद्दल धक्कादायक खुलासे
13
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
14
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...
15
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
16
रोहित शर्मा 'भलतेच काहीतरी' वाटावे असे बोलून गेला, मग लगेच असं दिलं स्पष्टीकरण (VIDEO)
17
ट्रम्प यांचं टॅरिफ लागून अवघा काही वेळही झाला नाही आणि भरला सरकारचा खजिना, कुठून आला पैसा?
18
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
19
कोंकणा सेन शर्मा घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात? ७ वर्ष लहान अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा
20
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!

सोलापूर महानगरपालिका परिवहन विभागाच्या सुरक्षित प्रवास संकल्पनेला बसतोय फटका, परिवहनला हवी आयुक्तांची कृपादृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 11:55 IST

एकीकडे स्मार्ट सोलापूरचे मार्केटिंग तर दुसरीकडे एसएमटीबाबत (मनपा परिवहन) नकारात्मक दृष्टिकोन यामुळे सुरक्षित प्रवास संकल्पनेला फटका बसत चालला आहे.

ठळक मुद्देअशोक लेलँडच्या चेसीक्रॅक जनबस भंगारात गेल्यावर परिवहनची स्थिती आणखीन बिकटमागील देणी व दररोजचा वाढत जाणारा तोटा यामुळे परिवहन सध्या शेवटची घटका मोजत आहेचेसीक्रॅक जनबसप्रश्नी पालकमंत्री विजयकुमार देशमुख व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केलेले प्रयत्न निष्फळ ठरले

राजकुमार सारोळे सोलापूर दि २९ : एकीकडे स्मार्ट सोलापूरचे मार्केटिंग तर दुसरीकडे एसएमटीबाबत (मनपा परिवहन) नकारात्मक दृष्टिकोन यामुळे सुरक्षित प्रवास संकल्पनेला फटका बसत चालला आहे. परिवहनच्या सुधारणेला आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांची कृपादृष्टी हवी, अशी प्रतिक्रिया कामगारांतून व्यक्त होत आहे. आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी मनपाचा पदभार घेतल्यापासून आरोग्य, शिक्षण व मनपा प्रशासन याबाबतीत चांगले निर्णय घेतले. प्रारंभी अशोक लेलँडच्या प्रश्नावरून त्यांनी परिवहनच्या कारभारात चांगले लक्ष घातले होते. पण परिवहनमधील कर्मचाºयांच्या गोंधळामुळे ते कामावर नाराज झाले. त्यात डिझेल खरेदी प्रकरणावरून परिवहन सभापती दैदीप्य वडापूरकर यांनी काढलेल्या पत्रकावरून त्यांच्या नाराजीत आणखी भर पडली. परिवहनचा वाढणारा तोटा व सतत मनपाकडून करावी लागणारी आर्थिक मदत यावरून आयुक्तांचे खटके उडाले. परिवहनने स्वत:च्या पायावर उभे रहावे, याबाबत त्यांनी सतत सूचना केल्या. पण अशोक लेलँडच्या चेसीक्रॅक जनबस भंगारात गेल्यावर परिवहनची स्थिती आणखीन बिकट झाली. मागील देणी व दररोजचा वाढत जाणारा तोटा यामुळे परिवहन सध्या शेवटची घटका मोजत आहे. कामगारांचे वेतन थकले. वेतनासाठी आंदोलन व कामगार न्यायालयात गेल्याने परिवहनबद्दल नकारात्मकता आणखीन वाढली. न्यायालयाने कामगारांच्या बाजूने निकाल दिल्यावर उच्च न्यायालयात अपील दाखल करण्याची मनपाने तयारी केली आहे. काँग्रेस राजवटीच्या काळातही परिवहनची अशीच दैनावस्था झाली होती. पण त्यावेळच्या सत्ताधाºयांनी मनपाकडून व शासनाकडून मदत आणून परिवहनला उभारी देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे डळमळीत असणारा परिवहनचा गाडा चालत राहिला. आता मनपा, राज्य आणि देशात भाजपाची सत्ता आहे. परिवहन सभापती भाजपाचा असताना व त्यांची खाते सुधारण्याची तळमळ असताना जाणूनबुजून परिवहनला टाळे ठोकण्यावर भर दिल्याचे दिसून                 येत आहे. -------------------------गड्डा यात्रेचे नियोजन कोलमडले...- परिवहनचे महत्त्वाचे निर्णय मनपाच्या सभेत अडकले आहेत. सभा तहकूब झाल्याने, वेळेवर निर्णय न झाल्याने भाड्याने बस घेता आल्या नाहीत. त्यामुळे गड्डा यात्रेत उत्पन्न वाढविण्याचे नियोजन कागदावरच राहिले. गड्डा यात्रेसाठी ५५ बसचे नियोजन केले होते. प्रत्यक्षात दुरुस्तीनंतर ४७ गाड्या उपलब्ध झाल्या. पण वाढलेल्या गाड्यांना चालक मिळाले नाहीत. स्मार्ट रस्ता खोदाईमुळे रंगभवनला थांबा केल्याने यात्रेतील मुख्य दोन दिवसांचे प्रवासी तीन आसनी रिक्षांनी पळविले. ही बाब लक्षात आल्यावर वाहतूक पोलिसांच्या मदतीने दारूकामादिवशी ह. दे. प्रशालेचा थांबा मिळवून अडीच लाखांपर्यंत उत्पन्न नेता आले. अशात सभागृहाने परिवहनचे अधिकार आयुक्तांना दिले आहेत. पण आयुक्तांची नकारात्मकता कायम असल्याने सुधारणेला संधी दिसत नाही. मुख्यमंत्र्यांच्या तंबीनंतर मनपातील गटबाजीला पूर्णविराम मिळाल्याचे चित्र दिसत आहे. आता याचा फायदा परिवहनला होईल, अशी आशा आहे. ------------------दोन मंत्र्यांचे प्रयत्न निष्फळ....- चेसीक्रॅक जनबसप्रश्नी पालकमंत्री विजयकुमार देशमुख व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केलेले प्रयत्न निष्फळ ठरले. कामगारांच्या वृत्तीवर बोट ठेवून परिवहन चालविण्यात अर्थ नाही, असा सूर काढत दोन्ही मंत्र्यांनी या प्रश्नाकडे कानाडोळा केला. शहरातील नागरिकांना सुरक्षित प्रवाससेवा उपलब्ध करून देणे हे मनपाच्या कर्तव्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. देशपातळीवर सार्वजनिक प्रवासी वाहतुकीवर गंभीरपणे चर्चा होत असताना स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाºया सोलापूरने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. -----------------मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधीबाबत केलेल्या सूतोवाचमुळे मी परिवहनसाठी दोन्ही मंत्र्यांकडे जाऊन बसणार आहे. विशेष निधीतून परिवहनला ऊर्जितावस्था आणण्यासाठी आमचा निश्चित प्रयत्न असेल.-दैदीप्य वडापूरकर, सभापती, परिवहन समिती

टॅग्स :Solapurसोलापूर