शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर महानगरपालिका परिवहन विभागाच्या सुरक्षित प्रवास संकल्पनेला बसतोय फटका, परिवहनला हवी आयुक्तांची कृपादृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 11:55 IST

एकीकडे स्मार्ट सोलापूरचे मार्केटिंग तर दुसरीकडे एसएमटीबाबत (मनपा परिवहन) नकारात्मक दृष्टिकोन यामुळे सुरक्षित प्रवास संकल्पनेला फटका बसत चालला आहे.

ठळक मुद्देअशोक लेलँडच्या चेसीक्रॅक जनबस भंगारात गेल्यावर परिवहनची स्थिती आणखीन बिकटमागील देणी व दररोजचा वाढत जाणारा तोटा यामुळे परिवहन सध्या शेवटची घटका मोजत आहेचेसीक्रॅक जनबसप्रश्नी पालकमंत्री विजयकुमार देशमुख व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केलेले प्रयत्न निष्फळ ठरले

राजकुमार सारोळे सोलापूर दि २९ : एकीकडे स्मार्ट सोलापूरचे मार्केटिंग तर दुसरीकडे एसएमटीबाबत (मनपा परिवहन) नकारात्मक दृष्टिकोन यामुळे सुरक्षित प्रवास संकल्पनेला फटका बसत चालला आहे. परिवहनच्या सुधारणेला आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांची कृपादृष्टी हवी, अशी प्रतिक्रिया कामगारांतून व्यक्त होत आहे. आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी मनपाचा पदभार घेतल्यापासून आरोग्य, शिक्षण व मनपा प्रशासन याबाबतीत चांगले निर्णय घेतले. प्रारंभी अशोक लेलँडच्या प्रश्नावरून त्यांनी परिवहनच्या कारभारात चांगले लक्ष घातले होते. पण परिवहनमधील कर्मचाºयांच्या गोंधळामुळे ते कामावर नाराज झाले. त्यात डिझेल खरेदी प्रकरणावरून परिवहन सभापती दैदीप्य वडापूरकर यांनी काढलेल्या पत्रकावरून त्यांच्या नाराजीत आणखी भर पडली. परिवहनचा वाढणारा तोटा व सतत मनपाकडून करावी लागणारी आर्थिक मदत यावरून आयुक्तांचे खटके उडाले. परिवहनने स्वत:च्या पायावर उभे रहावे, याबाबत त्यांनी सतत सूचना केल्या. पण अशोक लेलँडच्या चेसीक्रॅक जनबस भंगारात गेल्यावर परिवहनची स्थिती आणखीन बिकट झाली. मागील देणी व दररोजचा वाढत जाणारा तोटा यामुळे परिवहन सध्या शेवटची घटका मोजत आहे. कामगारांचे वेतन थकले. वेतनासाठी आंदोलन व कामगार न्यायालयात गेल्याने परिवहनबद्दल नकारात्मकता आणखीन वाढली. न्यायालयाने कामगारांच्या बाजूने निकाल दिल्यावर उच्च न्यायालयात अपील दाखल करण्याची मनपाने तयारी केली आहे. काँग्रेस राजवटीच्या काळातही परिवहनची अशीच दैनावस्था झाली होती. पण त्यावेळच्या सत्ताधाºयांनी मनपाकडून व शासनाकडून मदत आणून परिवहनला उभारी देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे डळमळीत असणारा परिवहनचा गाडा चालत राहिला. आता मनपा, राज्य आणि देशात भाजपाची सत्ता आहे. परिवहन सभापती भाजपाचा असताना व त्यांची खाते सुधारण्याची तळमळ असताना जाणूनबुजून परिवहनला टाळे ठोकण्यावर भर दिल्याचे दिसून                 येत आहे. -------------------------गड्डा यात्रेचे नियोजन कोलमडले...- परिवहनचे महत्त्वाचे निर्णय मनपाच्या सभेत अडकले आहेत. सभा तहकूब झाल्याने, वेळेवर निर्णय न झाल्याने भाड्याने बस घेता आल्या नाहीत. त्यामुळे गड्डा यात्रेत उत्पन्न वाढविण्याचे नियोजन कागदावरच राहिले. गड्डा यात्रेसाठी ५५ बसचे नियोजन केले होते. प्रत्यक्षात दुरुस्तीनंतर ४७ गाड्या उपलब्ध झाल्या. पण वाढलेल्या गाड्यांना चालक मिळाले नाहीत. स्मार्ट रस्ता खोदाईमुळे रंगभवनला थांबा केल्याने यात्रेतील मुख्य दोन दिवसांचे प्रवासी तीन आसनी रिक्षांनी पळविले. ही बाब लक्षात आल्यावर वाहतूक पोलिसांच्या मदतीने दारूकामादिवशी ह. दे. प्रशालेचा थांबा मिळवून अडीच लाखांपर्यंत उत्पन्न नेता आले. अशात सभागृहाने परिवहनचे अधिकार आयुक्तांना दिले आहेत. पण आयुक्तांची नकारात्मकता कायम असल्याने सुधारणेला संधी दिसत नाही. मुख्यमंत्र्यांच्या तंबीनंतर मनपातील गटबाजीला पूर्णविराम मिळाल्याचे चित्र दिसत आहे. आता याचा फायदा परिवहनला होईल, अशी आशा आहे. ------------------दोन मंत्र्यांचे प्रयत्न निष्फळ....- चेसीक्रॅक जनबसप्रश्नी पालकमंत्री विजयकुमार देशमुख व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केलेले प्रयत्न निष्फळ ठरले. कामगारांच्या वृत्तीवर बोट ठेवून परिवहन चालविण्यात अर्थ नाही, असा सूर काढत दोन्ही मंत्र्यांनी या प्रश्नाकडे कानाडोळा केला. शहरातील नागरिकांना सुरक्षित प्रवाससेवा उपलब्ध करून देणे हे मनपाच्या कर्तव्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. देशपातळीवर सार्वजनिक प्रवासी वाहतुकीवर गंभीरपणे चर्चा होत असताना स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाºया सोलापूरने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. -----------------मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधीबाबत केलेल्या सूतोवाचमुळे मी परिवहनसाठी दोन्ही मंत्र्यांकडे जाऊन बसणार आहे. विशेष निधीतून परिवहनला ऊर्जितावस्था आणण्यासाठी आमचा निश्चित प्रयत्न असेल.-दैदीप्य वडापूरकर, सभापती, परिवहन समिती

टॅग्स :Solapurसोलापूर