शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

सोलापूर महानगरपालिका परिवहन विभागाच्या सुरक्षित प्रवास संकल्पनेला बसतोय फटका, परिवहनला हवी आयुक्तांची कृपादृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 11:55 IST

एकीकडे स्मार्ट सोलापूरचे मार्केटिंग तर दुसरीकडे एसएमटीबाबत (मनपा परिवहन) नकारात्मक दृष्टिकोन यामुळे सुरक्षित प्रवास संकल्पनेला फटका बसत चालला आहे.

ठळक मुद्देअशोक लेलँडच्या चेसीक्रॅक जनबस भंगारात गेल्यावर परिवहनची स्थिती आणखीन बिकटमागील देणी व दररोजचा वाढत जाणारा तोटा यामुळे परिवहन सध्या शेवटची घटका मोजत आहेचेसीक्रॅक जनबसप्रश्नी पालकमंत्री विजयकुमार देशमुख व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केलेले प्रयत्न निष्फळ ठरले

राजकुमार सारोळे सोलापूर दि २९ : एकीकडे स्मार्ट सोलापूरचे मार्केटिंग तर दुसरीकडे एसएमटीबाबत (मनपा परिवहन) नकारात्मक दृष्टिकोन यामुळे सुरक्षित प्रवास संकल्पनेला फटका बसत चालला आहे. परिवहनच्या सुधारणेला आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांची कृपादृष्टी हवी, अशी प्रतिक्रिया कामगारांतून व्यक्त होत आहे. आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी मनपाचा पदभार घेतल्यापासून आरोग्य, शिक्षण व मनपा प्रशासन याबाबतीत चांगले निर्णय घेतले. प्रारंभी अशोक लेलँडच्या प्रश्नावरून त्यांनी परिवहनच्या कारभारात चांगले लक्ष घातले होते. पण परिवहनमधील कर्मचाºयांच्या गोंधळामुळे ते कामावर नाराज झाले. त्यात डिझेल खरेदी प्रकरणावरून परिवहन सभापती दैदीप्य वडापूरकर यांनी काढलेल्या पत्रकावरून त्यांच्या नाराजीत आणखी भर पडली. परिवहनचा वाढणारा तोटा व सतत मनपाकडून करावी लागणारी आर्थिक मदत यावरून आयुक्तांचे खटके उडाले. परिवहनने स्वत:च्या पायावर उभे रहावे, याबाबत त्यांनी सतत सूचना केल्या. पण अशोक लेलँडच्या चेसीक्रॅक जनबस भंगारात गेल्यावर परिवहनची स्थिती आणखीन बिकट झाली. मागील देणी व दररोजचा वाढत जाणारा तोटा यामुळे परिवहन सध्या शेवटची घटका मोजत आहे. कामगारांचे वेतन थकले. वेतनासाठी आंदोलन व कामगार न्यायालयात गेल्याने परिवहनबद्दल नकारात्मकता आणखीन वाढली. न्यायालयाने कामगारांच्या बाजूने निकाल दिल्यावर उच्च न्यायालयात अपील दाखल करण्याची मनपाने तयारी केली आहे. काँग्रेस राजवटीच्या काळातही परिवहनची अशीच दैनावस्था झाली होती. पण त्यावेळच्या सत्ताधाºयांनी मनपाकडून व शासनाकडून मदत आणून परिवहनला उभारी देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे डळमळीत असणारा परिवहनचा गाडा चालत राहिला. आता मनपा, राज्य आणि देशात भाजपाची सत्ता आहे. परिवहन सभापती भाजपाचा असताना व त्यांची खाते सुधारण्याची तळमळ असताना जाणूनबुजून परिवहनला टाळे ठोकण्यावर भर दिल्याचे दिसून                 येत आहे. -------------------------गड्डा यात्रेचे नियोजन कोलमडले...- परिवहनचे महत्त्वाचे निर्णय मनपाच्या सभेत अडकले आहेत. सभा तहकूब झाल्याने, वेळेवर निर्णय न झाल्याने भाड्याने बस घेता आल्या नाहीत. त्यामुळे गड्डा यात्रेत उत्पन्न वाढविण्याचे नियोजन कागदावरच राहिले. गड्डा यात्रेसाठी ५५ बसचे नियोजन केले होते. प्रत्यक्षात दुरुस्तीनंतर ४७ गाड्या उपलब्ध झाल्या. पण वाढलेल्या गाड्यांना चालक मिळाले नाहीत. स्मार्ट रस्ता खोदाईमुळे रंगभवनला थांबा केल्याने यात्रेतील मुख्य दोन दिवसांचे प्रवासी तीन आसनी रिक्षांनी पळविले. ही बाब लक्षात आल्यावर वाहतूक पोलिसांच्या मदतीने दारूकामादिवशी ह. दे. प्रशालेचा थांबा मिळवून अडीच लाखांपर्यंत उत्पन्न नेता आले. अशात सभागृहाने परिवहनचे अधिकार आयुक्तांना दिले आहेत. पण आयुक्तांची नकारात्मकता कायम असल्याने सुधारणेला संधी दिसत नाही. मुख्यमंत्र्यांच्या तंबीनंतर मनपातील गटबाजीला पूर्णविराम मिळाल्याचे चित्र दिसत आहे. आता याचा फायदा परिवहनला होईल, अशी आशा आहे. ------------------दोन मंत्र्यांचे प्रयत्न निष्फळ....- चेसीक्रॅक जनबसप्रश्नी पालकमंत्री विजयकुमार देशमुख व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केलेले प्रयत्न निष्फळ ठरले. कामगारांच्या वृत्तीवर बोट ठेवून परिवहन चालविण्यात अर्थ नाही, असा सूर काढत दोन्ही मंत्र्यांनी या प्रश्नाकडे कानाडोळा केला. शहरातील नागरिकांना सुरक्षित प्रवाससेवा उपलब्ध करून देणे हे मनपाच्या कर्तव्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. देशपातळीवर सार्वजनिक प्रवासी वाहतुकीवर गंभीरपणे चर्चा होत असताना स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाºया सोलापूरने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. -----------------मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधीबाबत केलेल्या सूतोवाचमुळे मी परिवहनसाठी दोन्ही मंत्र्यांकडे जाऊन बसणार आहे. विशेष निधीतून परिवहनला ऊर्जितावस्था आणण्यासाठी आमचा निश्चित प्रयत्न असेल.-दैदीप्य वडापूरकर, सभापती, परिवहन समिती

टॅग्स :Solapurसोलापूर