शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
3
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
5
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
6
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
7
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
8
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
9
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
10
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी
11
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
12
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
13
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
14
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
15
ग्रावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी
16
"छोट्या गाडीतून आले म्हणून मला फिल्मफेअर सोहळ्यात अडवलं"; प्रसिद्ध अभिनेत्रीने केली बॉलिवूडची पोलखोल
17
ना दीपिका, ना कतरिना अन् नाही आलिया, सर्वात आधी या प्रसिद्ध क्रिकेटरच्या पत्नीच्या प्रेमात होता रणबीर
18
जुळ्या बहिणींचे जुळे गुण! दहावीमध्ये मिळवले सेम टू सेम ९६ टक्के, अनुष्का-तनुष्काचे दैदिप्यमान यश
19
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीचा उपास सोडताना 'या' चुका टाळा नाहीतर उपासना जाईल वाया!
20
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न

सोलापूर महापालिका कंत्राटदार कंपनीवर मेहरबान; कासवाच्या गतीने चालले ‘एलईडी’चे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 13:15 IST

कोण देणार लक्ष; नगरसेवकांचा सवाल, हद्दवाढ भागात अंधाराचे साम्राज्य कायम

ठळक मुद्देमहापालिकेच्या वीज बिलात बचत करण्याच्या दृष्टीने एलईडी बल्ब बसविण्याचा निर्णय घेण्यात आलामहापालिका आणि ईईएसएल कंपनीमध्ये १० डिसेंबर २०१८ ला करार झालाया करारानुसार ईईएसएल कंपनीने सहा महिन्यांत सुमारे ४० हजार एलईडी दिवे बसवायचे आहेत

राकेश कदम 

सोलापूर : स्मार्ट सिटी योजनेतील अनेक ठेकेदार कंपन्यांवर महापालिका मेहेरबान झाल्याचे दिसत आहे. स्मार्ट रोड, उद्यान विकासाप्रमाणेच शहरातील पारंपरिक पथदिवे बदलून ‘एलईडी’ दिवे बसविण्याचे काम संथ गतीने सुरू आहे. महापालिका आणि एनर्जी इफिशिएन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (ईईएसएल) कंपनीत झालेल्या करारानुसार सहा महिन्यांत ४० हजार दिवे बसवायचे आहेत. मात्र  चार महिन्यांत ७६०० एलईडी   दिवे बसविण्यात आले आहेत. या गतीने गेल्यास काम पूर्ण व्हायला   दीड ते दोन वर्षे लागतील, अशी  टीका नगरसेवकांमधून होत आहे. 

महापालिकेच्या वीज बिलात बचत करण्याच्या दृष्टीने एलईडी बल्ब बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी महापालिका आणि ईईएसएल कंपनीमध्ये १० डिसेंबर २०१८ ला करार झाला. या करारानुसार ईईएसएल कंपनीने सहा महिन्यांत सुमारे ४० हजार एलईडी दिवे बसवायचे आहेत. करारनामा झाल्यानंतर पोलचे सर्वेक्षण, डीपीआर तयार करण्यात आला. सांगलीतील एका कंत्राटदारामार्फत प्रत्यक्ष दिवे बसविण्यास सुरुवात करण्यात आली. या कंपनीने पुन्हा आठ सहकंत्राटकार नेमले असून,  त्यांनी गेल्या चार महिन्यांत ७६०० एलईडी बसविले आहेत. यातही केवळ प्रमुख रस्त्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. 

ईईएसएल कंपनीकडून एलईडी बल्बचा पुरवठा होता. या कंपनीकडे देशातील अनेक कंपन्यांची कामे आहेत. एकाच वेळी अनेक भागांत एलईडीचा पुरवठा सुरू आहे. सोलापुरात बल्ब उपलब्ध झाले की काम सुरू होते. एलईडी बल्ब येण्यास विलंब झाला की काम ठप्प होत असल्याचे मनपाच्या विद्युत विभागातील अधिकाºयांचे म्हणणे आहे. 

पोल सरळ नाहीत, अनेक दिवेही बंद - एलईडीच्या कामामुळे इतर पथदिव्यांची देखभाल व दुरुस्ती बंद आहे. शहरात आणि हद्दवाढ भागातील अनेक प्रभागात आजही अंधार आहे. एलईडीचे काम खासगी कंत्राटदार करतात. दुसरीकडे मनपाच्या विद्युत विभागातील कर्मचारी ‘निवांत’ असल्याचे नगरसेवकांचे म्हणणे आहे. रुपाभवानी चौक, दयानंद कॉलेज चौक ते गुरुनानक चौक या मार्गावर एलईडी बल्ब बसविले आहेत. अनेक ठिकाणचे पोल वाकडे आहेत तर एलईडी बंद आहेत. पोलच्या वायरी दुभाजकात आल्या आहेत. मनपाच्या विद्युत विभागातील कर्मचाºयांनी किमान हे करुन घ्यायला हवे. विद्युत विभागातील अधिकारी आणि कर्मचाºयांचे याकडे लक्ष नाही. त्यामुळे या कामाचा बोजवारा उडू शकतो, असा आरोप नगरसेवक सुभाष शेजवाल यांनी केला. 

नव्या पोलची वर्कआॅर्डर आचारसंहितेत अडकली- एलईडीसोबत शहर आणि हद्दवाढ भागात नव्याने विजेचे पोल आणि वायरिंग करण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेतून १५ कोटी रुपयांच्या कामाची निविदा काढण्यात आली आहे. हे काम बजाज कंपनीला मिळाले आहे. आचारसंहितेमुळे वर्कआॅर्डर देण्यात आलेली नाही. 

अधिकाºयांचा हलगर्जीपणाएलईडीचे काम पूर्ण झाल्यानंतर महापालिकेची दरमहा ५० लाख रुपयांची बचत होणार आहे. या कामाला उशीर झाल्यास महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान होईल. ईईएसएल कंपनी करार पाळत नसेल तर त्यांच्यावर कारवाई करायला हवी. काम झेपत नसेल तर त्यांनी घ्यायलाच नको होते. विद्युत विभागातील अधिकाºयांनी हलगर्जीपणा सोडून या कामाचा पाठपुरावा केला तर शहरातील अंधार दूर होईल. - नागेश वल्याळ, नगरसेवक. 

आम्ही पत्र दिलेईईएसएल कंपनीचे पहिले दोन महिने कामाच्या सर्वेक्षणात गेले. सर्वेक्षणाच्या अनुषंगाने त्यांनी कामाला सुरुवात केली आहे. कामाची आम्हालाही कमी वाटते. याबाबत आम्ही कंपनीला पत्र पाठविले असून मुदतीत काम पूर्ण करावे, असे सांगितले आहे. - संदीप कारंजे, नगरअभियंता, मनपा.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका