शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

सोलापूरातील यंत्रमाग कारखानदारांचा बंद, अठरा दिवसांत ७० कोटींचा फटका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 15:36 IST

सोलापूर दि २५ : ईपीएफच्या विरोधात यंत्रमागधारकांनी पुकारलेल्या बेमुदत बंदमुळे मागील अठरा दिवसांत चादर आणि टॉवेल निर्मितीच्या उद्योगाला ७० कोटींचा फटका बसला आहे.

ठळक मुद्देगेल्या ४५ वर्षांत तब्बल सात वेळा विविध मागण्यांसाठी संप करण्यात आलाया उद्योगाची वार्षिक उलाढाल साधारण १५०० कोटी रुपयांच्या आसपासमालक संघटनेच्या वतीने १८ दिवसांचा बंद पहिल्यांदाच

महेश कुलकर्णीसोलापूर दि २५ : ईपीएफच्या विरोधात यंत्रमागधारकांनी पुकारलेल्या बेमुदत बंदमुळे मागील अठरा दिवसांत चादर आणि टॉवेल निर्मितीच्या उद्योगाला ७० कोटींचा फटका बसला आहे. कामगार आणि मालक यांच्यातील संघर्ष पहिल्यांदाच नसून गेल्या ४५ वर्षांत तब्बल सात वेळा विविध मागण्यांसाठी संप करण्यात आला आहे.वेगवेगळे युनिट क्लब करून त्यांना ईपीएफ लागू करण्याचा निर्णय भविष्य निर्वाह निधी आयुक्त डॉ. हेमंत तिरपुडे यांनी जुलैअखेरीस दिला. या निर्णयाला यंत्रमाग कारखानदारांनी जोरदार विरोध केला. आॅगस्टमध्ये सहा दिवस आणि आॅक्टोबरमध्ये अठरा दिवस असा एकूण २४ दिवस हा उद्योग बंद ठेवला. ७ आॅक्टोबरपासून सुरू झालेला हा संप दिवाळी संपून गेली तरीही सुरू असून, यावर तोडगा अद्याप न निघाल्याने चादर आणि टॉवेल निर्मिती करणाºया उद्योगाला गेल्या अठरा दिवसांत सुमारे ७० कोटींचा फटका बसला आहे. दररोज साधारण ४ कोटींची उलाढाल असणाºया या उद्योगाची वार्षिक उलाढाल साधारण १५०० कोटी रुपयांच्या आसपास आहे. आखाती देश, जर्मनी, उत्तर अमेरिका, श्रीलंका, नेपाळ या देशांमध्ये सोलापुरी टॉवेलची मोठ्या प्रमाणात निर्यात होत असते. येथे तयार होणाºया मालापैकी ४०% माल हा परदेशात निर्यात तर उर्वरित मालाला इतर राज्यातून मागणी असते. चादर बनविणारे साधारणत: १५० ते २०० कारखाने आहेत तर टॉवेल बनविणारे ६५० ते ७०० कारखाने येथे चालतात. साधारण ४५ हजार कामगार या उद्योगात काम करतात.गेले अठरा दिवस हा उद्योग पूर्णपणे बंद आहे. हा काही पहिलाच संप नाही. या आधीही असे अनेक संप झाले आहेत. काही वेळा कामगार संघटनांच्या मागण्यांसाठी तर काही वेळा कारखानदारांच्या मागण्यांसाठी बंद झालेले आहेत. परंतु मालक संघटनेच्या वतीने १८ दिवसांचा बंद पहिल्यांदाच झाला आहे. १९७२ साली यंत्रमाग कामगारांनी पहिल्यांदा  बंद पुकारला. कामगारांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेला हा संप                  २३ दिवस चालला. यानंतर ८४ साली असाच कामगारांनी संप पुकारला. तो ५३ दिवस चालला. यानंतर आतापर्यंत सुमारे सात वेळा मोठे संप झाले. ------------------------ १९७२ - २३ दिवस (कामगारांच्या मागण्या)- १९८० - ८ दिवस (कामगारांच्या मागण्या)- १९८२ - पाच दिवस (कामगारांच्या मागण्या)- १९८४ - ५३ दिवस (किमान वेतनाची मागणी)- १९९३ - दोन दिवस (कामगारांच्या मागण्या)- २०१३ - दोन दिवस बंद (कामगार कल्याण मंडळाला कारखानदारांचा विरोध)- २०१७ - २४ दिवस बंद (कारखानदारांचा ईपीएफला विरोध)