शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

सोलापूरातील यंत्रमाग कारखानदारांचा बंद, अठरा दिवसांत ७० कोटींचा फटका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 15:36 IST

सोलापूर दि २५ : ईपीएफच्या विरोधात यंत्रमागधारकांनी पुकारलेल्या बेमुदत बंदमुळे मागील अठरा दिवसांत चादर आणि टॉवेल निर्मितीच्या उद्योगाला ७० कोटींचा फटका बसला आहे.

ठळक मुद्देगेल्या ४५ वर्षांत तब्बल सात वेळा विविध मागण्यांसाठी संप करण्यात आलाया उद्योगाची वार्षिक उलाढाल साधारण १५०० कोटी रुपयांच्या आसपासमालक संघटनेच्या वतीने १८ दिवसांचा बंद पहिल्यांदाच

महेश कुलकर्णीसोलापूर दि २५ : ईपीएफच्या विरोधात यंत्रमागधारकांनी पुकारलेल्या बेमुदत बंदमुळे मागील अठरा दिवसांत चादर आणि टॉवेल निर्मितीच्या उद्योगाला ७० कोटींचा फटका बसला आहे. कामगार आणि मालक यांच्यातील संघर्ष पहिल्यांदाच नसून गेल्या ४५ वर्षांत तब्बल सात वेळा विविध मागण्यांसाठी संप करण्यात आला आहे.वेगवेगळे युनिट क्लब करून त्यांना ईपीएफ लागू करण्याचा निर्णय भविष्य निर्वाह निधी आयुक्त डॉ. हेमंत तिरपुडे यांनी जुलैअखेरीस दिला. या निर्णयाला यंत्रमाग कारखानदारांनी जोरदार विरोध केला. आॅगस्टमध्ये सहा दिवस आणि आॅक्टोबरमध्ये अठरा दिवस असा एकूण २४ दिवस हा उद्योग बंद ठेवला. ७ आॅक्टोबरपासून सुरू झालेला हा संप दिवाळी संपून गेली तरीही सुरू असून, यावर तोडगा अद्याप न निघाल्याने चादर आणि टॉवेल निर्मिती करणाºया उद्योगाला गेल्या अठरा दिवसांत सुमारे ७० कोटींचा फटका बसला आहे. दररोज साधारण ४ कोटींची उलाढाल असणाºया या उद्योगाची वार्षिक उलाढाल साधारण १५०० कोटी रुपयांच्या आसपास आहे. आखाती देश, जर्मनी, उत्तर अमेरिका, श्रीलंका, नेपाळ या देशांमध्ये सोलापुरी टॉवेलची मोठ्या प्रमाणात निर्यात होत असते. येथे तयार होणाºया मालापैकी ४०% माल हा परदेशात निर्यात तर उर्वरित मालाला इतर राज्यातून मागणी असते. चादर बनविणारे साधारणत: १५० ते २०० कारखाने आहेत तर टॉवेल बनविणारे ६५० ते ७०० कारखाने येथे चालतात. साधारण ४५ हजार कामगार या उद्योगात काम करतात.गेले अठरा दिवस हा उद्योग पूर्णपणे बंद आहे. हा काही पहिलाच संप नाही. या आधीही असे अनेक संप झाले आहेत. काही वेळा कामगार संघटनांच्या मागण्यांसाठी तर काही वेळा कारखानदारांच्या मागण्यांसाठी बंद झालेले आहेत. परंतु मालक संघटनेच्या वतीने १८ दिवसांचा बंद पहिल्यांदाच झाला आहे. १९७२ साली यंत्रमाग कामगारांनी पहिल्यांदा  बंद पुकारला. कामगारांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेला हा संप                  २३ दिवस चालला. यानंतर ८४ साली असाच कामगारांनी संप पुकारला. तो ५३ दिवस चालला. यानंतर आतापर्यंत सुमारे सात वेळा मोठे संप झाले. ------------------------ १९७२ - २३ दिवस (कामगारांच्या मागण्या)- १९८० - ८ दिवस (कामगारांच्या मागण्या)- १९८२ - पाच दिवस (कामगारांच्या मागण्या)- १९८४ - ५३ दिवस (किमान वेतनाची मागणी)- १९९३ - दोन दिवस (कामगारांच्या मागण्या)- २०१३ - दोन दिवस बंद (कामगार कल्याण मंडळाला कारखानदारांचा विरोध)- २०१७ - २४ दिवस बंद (कारखानदारांचा ईपीएफला विरोध)