शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
3
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
4
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
5
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
8
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
9
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
10
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
11
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
12
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
13
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
14
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
15
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
16
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
17
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
18
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
19
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
20
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
Daily Top 2Weekly Top 5

घरकूल बांधणीत सोलापूर जिल्हा चौथ्या क्रमांकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 12:24 IST

वाळू टंचाईवर मात : ६४ टक्के उद्दिष्ट पूर्ण, ८५ टक्के लाभार्थ्यांना दुसरा हप्ताही अदा

ठळक मुद्देवंचित घटकांना हक्काचे घर मिळावे यासाठी शासनाकडून योजनाग्रामविकास सचिवांकडून दररोज ३४ जिल्ह्यांतील घरकुलाच्या कामांचा आढावा

सोलापूर :  वाळू टंचाईतून मार्ग काढत प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंमलबजावणीत सोलापूर जिल्हा परिषद राज्यात चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे. प्रत्येक स्तरावर केलेल्या पूर्वतयारीमुळे हे शक्य झाल्याचा दावा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी केला आहे. 

वंचित घटकांना हक्काचे घर मिळावे यासाठी शासनाकडून ही योजना राबविली जाते. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा लाभार्थ्यांची यादी निश्चित करते. लाभार्थ्यांना तीन टप्प्यात १ लाख २० हजार रुपये अनुदान दिले जाते. ग्रामविकास सचिवांकडून दररोज ३४ जिल्ह्यांतील घरकुलाच्या कामांचा आढावा घेतला जातो.यंदा जिल्ह्यात ९४५४ घरकूल बांधणीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. २० मार्चपर्यंत यातील ६१७० घरकुलांची कामे पूर्ण झाल्याचा दावा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने केला आहे.

घरकूल बांधणीचे जवळपास ६४ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे तर ८५ टक्के लाभार्थ्यांना अनुदानाचा दुसरा महत्त्वपूर्ण टप्पा वितरित झाला आहे. या उद्दिष्टपूर्तीमध्ये सीईओ डॉ. राजेंद्र भारुड यांचा महत्त्वाचा वाटा राहिला. डॉ. भारुड यांनी लाभार्थी, ग्रामसेवक, गटविकास अधिकारी आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या सर्वस्तरावरील कामांचे नियोजन आखून दिले होते. त्यामुळेच कामातील अडचणी दूर झाल्या शिवाय लाभार्थ्यांच्या खात्यावर वेळेवर अनुदान पोहोचले, असा दावा प्रकल्प संचालक अनिलकुमार नवाळे यांनी केला. वाळू वेळेवर मिळाली असती तर सोलापूर जिल्हा राज्यात आघाडीवर असता, असेही त्यांनी सांगितले. 

पाच जिल्ह्यात ५० टक्क्यांपेक्षा जास्त काम- घरकूल बांधणीत सध्या ठाणे जिल्हा आघाडीवर दिसत आहे.  त्यानंतर सातारा, सोलापूर, नाशिक आणि वर्धा जिल्ह्याचा क्रमांक आहे. ठाणे, वर्धा आणि सातारा जिल्ह्याच्या तुलनेत सोलापूर आणि नाशिक जिल्ह्याचे उद्दिष्ट दुप्पट आहे. तरीही या जिल्ह्यांनी चांगली कामगिरी केली आहे. हे पाच जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांमध्ये ५० टक्केही काम पूर्ण झालेले नाही. 

तर आणखी दर्जेदार कामे झाली असती- घरकूल मंजूर होत असल्याचे निदर्शनास येत असताना ज्यांनी बांधकामाची पूर्वतयारी केली त्यांची कामे पूर्णत्वास आली आहेत. काही ठिकाणी ठेकेदाराने साठवलेली महागडी किंवा ओढ्यातील वाळू आणून कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न होत आहे. शासनाने वेळेवर वाळू उपलब्ध करून दिली असती तर आणखी दर्जेदार कामे झाली असती. 

वाळू नाही, पण उद्दिष्ट पूर्ण करा- सोलापूरसह इतर अनेक जिल्ह्यात वाळू लिलाव लवकर होतील, अशी चिन्हे नाहीत. वाळूअभावी घरकुलांची कामे रखडल्याच्या तक्रारी ग्रामीण भागातून येत आहेत. दुसरीकडे शासनस्तरावरुन घरकूल बांधणीचे उद्दिष्ट करा, अशा सूचना केल्या जात आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी काम झाले आहे, अशा जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकाºयांना ग्रामविकास विभागाच्या सचिवांनी २७ मार्च रोजी मंत्रालयात बोलाविले आहे. वाळूच नसताना उद्दिष्ट पूर्ण कसे करायचे, ही चिंताही अनेक जिल्ह्यांत आहे. 

घरकूल योजना ही लाभार्थ्यांवरच अवलंबून असते. ग्रामसेवकाच्या मदतीने लाभार्थ्यांनी कागदपत्रे जमविणे, बांधकामाची पूर्वतयारी करणे, काम सुरु झाल्यानंतर ग्रामसेवकांसह अभियंत्यांनी कामाला भेट देऊन पाहणी करणे अपेक्षित असते. याबाबत प्रशासन विशेष काळजी घेते . नियमितपणे आम्हीही प्रत्येक तालुक्यातील कामावर लक्ष देत आहोत. त्यामुळेच जिल्हा आघाडीवर आला आहे.- डॉ. राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. सोलापूर. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषद