शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

सोलापूर जिल्हा बँकेने केले दोघांचे निलंबन,एकाने केला अपहार तर दुसºयाने केली पदाधिकाºयांची बदनामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 11:34 IST

पीक पाहिल्याशिवाय कर्ज मंजूर करायचे नाही, अशी ठोस भूमिका घेणाºया जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी दोन कर्मचाºयांना निलंबित करुन घरचा रस्ता दाखविला आहे.

ठळक मुद्देमागील वर्षभरात अनेक कर्मचारी स्वत:हून राजीनामा देऊन निघून गेलेजिल्हा बँकेने गेल्या वर्षभरात बेफिकीर अनेक कर्मचाºयांवर कारवाई केली बँकेच्या कर्मचाºयांनी आता वसुलीवर भर दिला पाहिजे : राजन पाटील

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १२ : पीक पाहिल्याशिवाय कर्ज मंजूर करायचे नाही, अशी ठोस भूमिका घेणाºया जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी दोन कर्मचाºयांना निलंबित करुन घरचा रस्ता दाखविला आहे. मागील वर्षभरात अनेक कर्मचारी स्वत:हून राजीनामा देऊन निघून गेले आहेत.बँकेच्या संचालकांनी स्वत:च्या कारखाने, शिक्षण संस्था तसेच अन्य संस्थांसाठी घेतलेले कर्ज न भरल्याने बँक आर्थिक अडचणीत आली आहे. हे कर्ज वसूल होत नसल्याने संचालकच अडचणीत असल्याने अनेक सचिव व कर्मचाºयांनी इतरांना पाहिजे तसे कर्ज वाटप केले आहे. यामुळे एकूणच बँकेची आर्थिक घडी विस्कटली आहे. कर्मचारी किंवा विकास सोसायट्यांचे सचिव थकबाकी वसुलीसाठी प्रयत्न करताना दिसत नाहीत. या उलट बँकेची बदनामी करण्यासही मागे-पुढे पाहत नाहीत. असाच प्रकार बँकेच्या मुख्यालयातील ज्युनियर अधिकारी एम. व्ही. ताठे यांनी केला होता. ताठे यांनी ११ नोव्हेंबर रोजी बँकेचे अध्यक्ष व पदाधिकाºयांविरोधात मोबाईल व्हॉट्सअ‍ॅपवर अशोभनीय मेसेज पाठविला होता. बँकेने १३ नोव्हेंबर रोजी नोटीस दिल्यानंतर १८ नोव्हेंबर रोजी दिलेल्या खुलाशात मानसिक स्थिती बिघडल्याने असा प्रकार झाल्याचे म्हटले होते. खुलासा अमान्य करीत ताठे यांच्यावर बँकेने निलंबनाची कारवाई केली. करमाळा शाखेत रोखपाल म्हणून कार्यरत असताना आर. के. साळुंखे खाते उघडण्यासाठी ४७ ग्राहकांकडून प्रत्येकी १०० रुपये घेतले. मात्र ही रक्कम बँकेत जमा केली नाही. १८ आॅगस्टला यापैकी तीन हजार रुपये भरणा केला. उर्वरित रक्कम भरणा केली नाही, शिवाय भरणा केलेली रक्कमही वापरून नंतर भरली. यामुळे साळुंखे यांच्यावरही निलंबनाची कारवाई केली आहे.जिल्हा बँकेने गेल्या वर्षभरात बेफिकीर अनेक कर्मचाºयांवर कारवाई केली आहे. यामुळे काहींनी राजीनामा देऊन बँकेला बायबाय केला आहे.----------------कर्मचाºयांनी वसुलीवर भर द्यावा- बँकेच्या कर्मचाºयांनी आता वसुलीवर भर दिला पाहिजे. बँक कर्मचारी व विकास सोसायट्यांच्या सचिवांना पुढील महिन्यात वसुलीची जबाबदारी दिली जाणार आहे. घरबसल्या आलेली वसुली दाखवून नव्याने कर्ज वाटप करणे हेच केवळ कर्मचाºयांचे काम नाही. वसुलीसाठी खातेदारांपर्यंत पोहोचले पाहिजे. असे होत नसेल तर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. आमच्यापैकी कोणताही संचालक वसुली करु नका, असे सांगत नसल्याचे बँकेचे अध्यक्ष राजन पाटील म्हणाले. 

टॅग्स :Solapurसोलापूर