शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

सोलापूर जिल्ह्यात १३ कोटी भरुन २८०६ शेतकरी झाले कर्जमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 14:36 IST

एकरकमी परतफेड योजनेचा घेतला लाभ, सोलापूर जिल्हा बँकेची झाली ४६ कोटी वसुली

ठळक मुद्दे२८०६ शेतकºयांनी पैसे भरल्याने कर्जमुक्त झाले जिल्हा बँकेची ४६ कोटी ३५ लाख ८० हजार ५८९ रुपये इतकी वसुली

सोलापूर : एकरकमी परतफेड योजनेंतर्गत जिल्ह्यातील २८०६ शेतकºयांनी दीड लाखावरील १३ कोटी ३ लाख १२ हजार ३४१ रुपये इतकी रक्कम भरल्याने शासनाकडून ३३ कोटी ३२ लाख ६८ हजार २४९ रुपये मिळाले आहेत. यामुळे जिल्हा बँकेची ४६ कोटी ३५ लाख ८० हजार ५८९ रुपये इतकी वसुली झाली आहे.

राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकºयांची कर्जमाफी केली आहे. यामध्ये थकबाकीदारांना सरसकट दीड लाख रुपयांचा फायदा दिला जाणार असल्याने दीड लाखावरील रक्कम शेतकºयांनी भरावयाची आहे. ३१ मार्चपर्यंत दीड लाखावरील रक्कम शेतकºयांना भरण्याची अंतिम मुदत शासनाने दिली आहे. जिल्हा बँकेच्या २१७ शाखांमध्ये विकास सोसायट्यांमार्फत दीड लाखावरील रक्कम भरणा करुन घेतली जात आहे.

शनिवारी रात्री उशिरापर्यंत भरणा करुन घेण्याचे काम सुरू होते. दीड लाखावरील पात्र १६ हजार २२७ शेतकºयांपैकी २८०६ पात्र शेतकºयांनी सायंकाळपर्यंत भरणा केला होता. या शेतकºयांनी १३ कोटी ३ लाख १२ हजार ३४१ रुपयांचा भरणा केला असल्याने शासनाने दीड लाखाप्रमाणे ३३ कोटी ३२ लाख ६८ हजार २४९ रुपये जमा केले आहेत. जिल्हा बँकेची ओटीएसच्या रुपाचे ४६ कोटी ३५ लाख ८० हजार ५८९ रुपये वसुली झाली आहे. 

मंगळवेढ्याचे अवघे ८५ खातेदार- मंगळवेढ्याच्या पात्र ७६६ पैकी ८५ शेतकºयांनीच रक्कम भरणा केली आहे़ बार्शीच्या ६६१, करमाळ्याच्या ५९६, माढ्याच्या ३३२, उत्तर तालुक्यातील २२९, मोहोळच्या २२४, दक्षिण तालुक्यातील १६७, पंढरपूरच्या १५२, सांगोल्याच्या १२६, अक्कलकोटच्या १२०, माळशिरसच्या ११४ याप्रमाणे २८०६ शेतकºयांनी पैसे भरल्याने कर्जमुक्त झाले आहेत. 

कर्जमुक्त होण्याची शेतकºयांना ही संधी आहे. १६ हजार २२७ शेतकºयांना यात भाग घेता येत असून शेतकºयांनी दीड लाखावरील पैसे भरावेत. दीड लाखाची शासनाकडून रक्कम आलेली आहे.- राजन पाटीलअध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँक 

टॅग्स :Solapurसोलापूरbankबँक