शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

थप्पड..नियतीची !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 14:50 IST

त्या बाईने केलेल्या पापाबद्दल निश्चितच आज ना उद्या तिला परमेश्वर शिक्षा देणार.

गुरुजी आपल्या मुलीला आणि लहान नातीला घेऊन आॅफिसला आले होते. त्यांच्या जावयाने त्याच्या आॅफिसमधील एका बाईच्या नादाला लागून त्यांच्या मुलीला माहेरला हाकलून दिले होते. जावई बहिणीचा मुलगा म्हणजे त्यांचा भाचाच होता. बहिणीची गरिबी असल्याने गुरुजींनीच त्याचे शिक्षण केले होते. नंतर सरकारी नोकरीस लावले होते. स्वत:च्या मुलीचे त्याच्याबरोबर लग्न लावून दिले होते. त्यांच्या मुलीला वर्षाच्या आत एक मुलगी झाली. जावयाला मलाईदार खाते मिळाल्यामुळे वरकमाई खूप होती. वरकमाईच्या पैशामुळे त्याला मस्ती आली होती. आॅफिसमधीलच एका महिलेबरोबर त्याचे प्रेमप्रकरण सुरू झाले. त्या बाईला गुरुजींच्या जावयापासून एक मुलगीदेखील झाली. हे प्रकरण ज्यावेळी गुरुजींच्या मुलीच्या कानावर पडले, त्यावेळी मन:स्तापामुळे तिने आत्महत्या करायचा प्रयत्न केला होता. त्या बाईच्या नादाला लागून त्याने बायकोला घरातून हाकलून दिले होते. तिला घेऊन गुरुजी आॅफिसला आले होते. 

मी गुरुजींना म्हणालो, ‘बॉम्बे सिव्हिल सर्व्हिसेस रुल’ प्रमाणे जर सरकारी नोकराने विवाहबाह्य संबंध ठेवले तर त्याची नोकरीवरुन हकालपट्टी करता येते. आपण त्या दुसºया बाईच्या मुलीच्या जन्माचा दाखला मिळवून दोघांविरुद्ध तक्रार दाखल करु आणि त्या दोघांचीही नोकरी घालवू. दोघांची मस्ती उतरवू. गुरुजींची मुलगी म्हणाली- आबासाहेब, फक्त एवढेच करा, आम्हाला पोटगी मिळवून द्या आणि माझ्या मुलीच्या लग्नासाठी नवºयाकडून तरतूद करुन घ्या. त्या बाईने जरी माझा नवरा पळवून माझ्यावर अन्याय केला असला तरी मला तिच्यावर अन्याय करायचा नाही. आबासाहेब, त्या दुसºया बाईला पण लेकरु आहे. आपण जर तक्रार केली तर त्या बाईची नोकरी जाईल आणि त्या लेकरावरही अन्याय होईल. त्या निष्पाप लेकरावर कशाला अन्याय करायचा? मी तिला म्हणालो, मी तुला निश्चितच पोटगी व तुझ्या मुलीच्या लग्नासाठी तुझ्या नवºयाकडून पैसे मिळवून देईन. पण लक्षात ठेव,  त्या बाईने केलेल्या पापाबद्दल निश्चितच आज ना उद्या तिला परमेश्वर शिक्षा देणार.

आम्ही तिच्या नवºयाला व दुसºया बायकोला नोटीस दिली. नोटीस मिळाल्या- मिळाल्या ते दोघेही घाबरुन आॅफिसला आले आणि गयावया करु लागले. त्या नवºयाची मी चांगलीच कानउघाडणी केली. ज्या मामामुळे तुला शिकायला मिळाले, नोकरी मिळाली, त्या मामालाच तू दगा दिलास. बायकोला घराबाहेर काढलेस. तुमच्या दोघांची नोकरी घालवली असती. परंतु तुझी बायको इतक्या चांगल्या मनाची आहे की, तिची तुझी नोकरी घालवायची इच्छा नाही. फक्त तिला तुझ्याकडून दरमहा पोटगी आणि मुलीच्या लग्नासाठी फिक्स डिपॉझिटमध्ये पैसे ठेवण्याची मागणी आहे. त्याने कपाळावरील घाम पुसला आणि म्हणाला, मी तयार आहे.

 दुसºया दिवशी गुरुजी व त्यांच्या मुलीला बोलावून घेतले. त्यांच्या मागणीप्रमाणे पोटगी ठरवली. मुलीच्या लग्नासाठी फिक्स डिपॉझिटमध्ये पैसे ठेवले. गुरुजी मुलीला माहेरी घेऊन गेले. तिला नोकरीला लावले. तिने कष्ट करून मुलीला वाढवले. मुलगी चांगली शिकली. तिला चांगला नवराही मिळाला. लग्नाची पत्रिका मला आली होती. अत्यंत कलात्मक असलेली ती पत्रिका बहुतेक त्या गावातील आपल्या सोलापुरातील पोरे बंधूंसारख्या प्रतिभावंत कलाकाराने तयार केलेली असावी. लग्नपत्रिकेत तिने नवºयाचे नाव टाकले नव्हते. मी लग्नाला गेलो होतो. अत्यंत पवित्र वातावरणात लग्न पार पडले.      

त्या नटव्या बाईच्या मुलीच्या लग्नाची देखील मला पत्रिका आली होती. त्या लग्नाला मी गेलो होतो. लग्नात संपत्तीचे बीभत्स प्रदर्शन दिसून येत होते. त्या नटवीच्या अंगावर किमान अर्धा किलोतरी सोने होते. लग्नातील सजावट, जेवण आणि आलेल्या असंख्य पाहुणे मंडळींवर होत असलेल्या खर्चावरुन लग्नात पदोपदी पैशाचा चुराडा होत असल्याचे ओंगळवाणे चित्र दिसत होते.  

एका वर्षानंतर ती नटवी आणि तिचा नवरा लग्न झालेल्या मुलीसह आॅफिसला आले. ती बाई रडत सांगू लागली, जावयाने मुलीला हाकलून दिले. मी म्हणालो, का? ती म्हणाली, जावई आॅफिसमधील एका बाईच्या नादाला लागला आणि त्याने माझ्या मुलीला हाकलून दिले.  वाचक हो! लक्षात ठेवा, नियतीची थप्पड फार जबरदस्त असते.   - अ‍ॅड. धनंजय माने(लेखक ज्येष्ठ विधिज्ञ आहेत)

टॅग्स :SolapurसोलापूरCourtन्यायालय