शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

श्रावणी सोमवार ; रेवणसिद्धेश्वरांच्या पालखी सोहळ्यास सव्वाशे वर्षांची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 10:39 IST

श्रावणातल्या प्रत्येक रविवारी पालखी उत्सव आणि शेवटच्या रविवारी रथोत्सव साजरा केला जातो. 

ठळक मुद्देरेवणसिद्धेश्वरांचे कार्य सर्वदूर पोहोचावे यासाठी पालखी सोहळा - १८९० साली श्री रेवणसिद्धेश्वर समाजसेवा मंडळाची स्थापना

रेवणसिद्ध जवळेकरसोलापूर : दहाव्या शतकातच धर्मप्रसाराबरोबर जातीव्यवस्थेच्या विरोधात लोकांचे मत परिवर्तन करणाºया जगद्गुरु श्री रेवणसिद्धेश्वरांच्या पालखी सोहळ्यास सव्वाशे वर्षांची परंपरा आहे. श्रावणातल्या प्रत्येक रविवारी पालखी उत्सव आणि शेवटच्या रविवारी रथोत्सव साजरा केला जातो. 

आंध्र प्रदेशातील कोलिपाक येथील सोमेश्वर लिंगाच्या पोटातून एकोराम, मारुळाराध्य, रेवणसिद्धेश्वर, रेणुकाचार्य, पंडिताराध्य या पाच जगद्गुरुंचा जन्म झाल्याचा आणि त्याच लिंगात त्यांचा शेवट झाल्याची आख्यायिका आहे. श्री रेवणसिद्धेश्वर धर्मप्रसारासाठी, सामान्यांचे दु:ख जाणून घेण्यासाठी, समाजातील अस्थिरता दूर करण्यासाठी पालखीतूनच भारत भ्रमण करायचे. त्यांनी कधीही या भूमीवर पाय ठेवले नाही. कोेल्हापूर, मंगळवेढामार्गे श्री रेवणसिद्धेश्वर सोलापूरच्या नगरीत दाखल झाले.

इथे येताच त्यांनी भूमीवर पाय ठेवले. शिष्यांना प्रश्न पडला आणि त्यांनी तो गुरु रेवणसिद्धेश्वरांना विचारलाच. ‘या भूमीत एका योगपुरुषाचा जन्म होणार आहे’, असे सांगत भूमीवर माती आपल्या कपाळी लावली. पुढे १२ व्या शतकात शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांचा जन्म झाल्याचे पुराणात ऐकावयास आणि पुस्तकांमधून वाचावयास मिळते.

रेवणसिद्धेश्वरांचे कार्य सर्वदूर पोहोचावे यासाठी पालखी सोहळा आणि रथोत्सव साजरा करण्याची प्रथा सुरु झाली. स्व. गंगाधर घटोळे, स्व. मलप्पा चिदरे, स्व. इरप्पा हिंगमिरे, स्व. सातप्पा दुलंगे, स्व. सिद्रामप्पा वळसंगे आदींच्या पुढाकारातून प्रथेला सुरुवात झाली. जोडभावी पेठेतील चिदरे वाड्यातून विधिवत पूजा करुन पालखी मिरवणुकीला प्रारंभ होतो. तेथून जुना अडत बाजार, कुंभारवेस, माणिक चौक, विजापूरवेस चौकमार्गे गुरुभेट येथे पालखी सोहळ्याचा विसावा घेतला जातो. तेथून ही मिरवणूक रंगभवन, सात रस्तामार्गे कंबर तलावासमोरील श्री रेवणसिद्धेश्वर मंदिरात येते. त्याच दिवशी सायंकाळी आलेल्या मार्गांनी मिरवणुकीची चिदरे वाड्यात सांगता होते.

अडत बाजार हलला... व्यापारी दुरावले !- पूर्वी अडत बाजार जोडभावी पेठेत भरायचा. १९७८ साली हा बाजार (मार्केट यार्ड) हैदराबाद रोडवर (सध्याचे मार्केट यार्ड) स्थलांतर झाला. त्याआधी अडत व्यापारी, विक्रेते, भुसार व्यापारी पालखी सोहळ्यात आवर्जून सहभागी व्हायचे. जसा अडत बाजार दूर गेला तसे भाविकही सोहळ्यापासून दुरावले गेले. 

रेवणसिद्धेश्वर समाजसेवा मंडळाची सेवा- १८९० साली श्री रेवणसिद्धेश्वर समाजसेवा मंडळाची स्थापना झाली. ११८ वर्षांची परंपरा असलेल्या या मंडळास १९६८ साली मान्यता मिळाली. मंडळाच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम हाती घेतले जातात. सध्या मंडळाची धुरा इरसंगप्पा हिंगमिरे, गंगाधर यादवाड, अशोक चाकोते, राजेंद्र इंडे, केदार वारद आदींकडे आहे. 

पूर्वजांनी सुरु केलेल्या पालखी सोहळ्याची परंपरा पुढे नेत आहोत. श्रावणातल्या दर रविवारी मंडळाच्या वतीने अन्नदान केले जाते. युवा पिढी सोहळ्यात सामील व्हावी, अशी अपेक्षा आहे.-इरसंगप्पा हिंगमिरे, अध्यक्ष, रेवणसिद्धेश्वर यात्रा कमिटी

पालखी सोहळा आणि रथोत्सवात समाजातील युवकांचा सहभाग अधिक असावा. तो सहभाग वाढला तर पालखी सोहळा आणि रथोत्सवाला मोठे स्वरुप येईल.-राजेंद्र बिराजदार,व्यवस्थापक- रेवणसिद्धेश्वर समाजसेवा मंडळ

टॅग्स :Solapurसोलापूर