शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

श्रावणी सोमवार ; रेवणसिद्धेश्वरांच्या पालखी सोहळ्यास सव्वाशे वर्षांची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 10:39 IST

श्रावणातल्या प्रत्येक रविवारी पालखी उत्सव आणि शेवटच्या रविवारी रथोत्सव साजरा केला जातो. 

ठळक मुद्देरेवणसिद्धेश्वरांचे कार्य सर्वदूर पोहोचावे यासाठी पालखी सोहळा - १८९० साली श्री रेवणसिद्धेश्वर समाजसेवा मंडळाची स्थापना

रेवणसिद्ध जवळेकरसोलापूर : दहाव्या शतकातच धर्मप्रसाराबरोबर जातीव्यवस्थेच्या विरोधात लोकांचे मत परिवर्तन करणाºया जगद्गुरु श्री रेवणसिद्धेश्वरांच्या पालखी सोहळ्यास सव्वाशे वर्षांची परंपरा आहे. श्रावणातल्या प्रत्येक रविवारी पालखी उत्सव आणि शेवटच्या रविवारी रथोत्सव साजरा केला जातो. 

आंध्र प्रदेशातील कोलिपाक येथील सोमेश्वर लिंगाच्या पोटातून एकोराम, मारुळाराध्य, रेवणसिद्धेश्वर, रेणुकाचार्य, पंडिताराध्य या पाच जगद्गुरुंचा जन्म झाल्याचा आणि त्याच लिंगात त्यांचा शेवट झाल्याची आख्यायिका आहे. श्री रेवणसिद्धेश्वर धर्मप्रसारासाठी, सामान्यांचे दु:ख जाणून घेण्यासाठी, समाजातील अस्थिरता दूर करण्यासाठी पालखीतूनच भारत भ्रमण करायचे. त्यांनी कधीही या भूमीवर पाय ठेवले नाही. कोेल्हापूर, मंगळवेढामार्गे श्री रेवणसिद्धेश्वर सोलापूरच्या नगरीत दाखल झाले.

इथे येताच त्यांनी भूमीवर पाय ठेवले. शिष्यांना प्रश्न पडला आणि त्यांनी तो गुरु रेवणसिद्धेश्वरांना विचारलाच. ‘या भूमीत एका योगपुरुषाचा जन्म होणार आहे’, असे सांगत भूमीवर माती आपल्या कपाळी लावली. पुढे १२ व्या शतकात शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांचा जन्म झाल्याचे पुराणात ऐकावयास आणि पुस्तकांमधून वाचावयास मिळते.

रेवणसिद्धेश्वरांचे कार्य सर्वदूर पोहोचावे यासाठी पालखी सोहळा आणि रथोत्सव साजरा करण्याची प्रथा सुरु झाली. स्व. गंगाधर घटोळे, स्व. मलप्पा चिदरे, स्व. इरप्पा हिंगमिरे, स्व. सातप्पा दुलंगे, स्व. सिद्रामप्पा वळसंगे आदींच्या पुढाकारातून प्रथेला सुरुवात झाली. जोडभावी पेठेतील चिदरे वाड्यातून विधिवत पूजा करुन पालखी मिरवणुकीला प्रारंभ होतो. तेथून जुना अडत बाजार, कुंभारवेस, माणिक चौक, विजापूरवेस चौकमार्गे गुरुभेट येथे पालखी सोहळ्याचा विसावा घेतला जातो. तेथून ही मिरवणूक रंगभवन, सात रस्तामार्गे कंबर तलावासमोरील श्री रेवणसिद्धेश्वर मंदिरात येते. त्याच दिवशी सायंकाळी आलेल्या मार्गांनी मिरवणुकीची चिदरे वाड्यात सांगता होते.

अडत बाजार हलला... व्यापारी दुरावले !- पूर्वी अडत बाजार जोडभावी पेठेत भरायचा. १९७८ साली हा बाजार (मार्केट यार्ड) हैदराबाद रोडवर (सध्याचे मार्केट यार्ड) स्थलांतर झाला. त्याआधी अडत व्यापारी, विक्रेते, भुसार व्यापारी पालखी सोहळ्यात आवर्जून सहभागी व्हायचे. जसा अडत बाजार दूर गेला तसे भाविकही सोहळ्यापासून दुरावले गेले. 

रेवणसिद्धेश्वर समाजसेवा मंडळाची सेवा- १८९० साली श्री रेवणसिद्धेश्वर समाजसेवा मंडळाची स्थापना झाली. ११८ वर्षांची परंपरा असलेल्या या मंडळास १९६८ साली मान्यता मिळाली. मंडळाच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम हाती घेतले जातात. सध्या मंडळाची धुरा इरसंगप्पा हिंगमिरे, गंगाधर यादवाड, अशोक चाकोते, राजेंद्र इंडे, केदार वारद आदींकडे आहे. 

पूर्वजांनी सुरु केलेल्या पालखी सोहळ्याची परंपरा पुढे नेत आहोत. श्रावणातल्या दर रविवारी मंडळाच्या वतीने अन्नदान केले जाते. युवा पिढी सोहळ्यात सामील व्हावी, अशी अपेक्षा आहे.-इरसंगप्पा हिंगमिरे, अध्यक्ष, रेवणसिद्धेश्वर यात्रा कमिटी

पालखी सोहळा आणि रथोत्सवात समाजातील युवकांचा सहभाग अधिक असावा. तो सहभाग वाढला तर पालखी सोहळा आणि रथोत्सवाला मोठे स्वरुप येईल.-राजेंद्र बिराजदार,व्यवस्थापक- रेवणसिद्धेश्वर समाजसेवा मंडळ

टॅग्स :Solapurसोलापूर