शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक; वाळीतच असे टाकले की, भावानेही आजारी आईला भेटू नाही दिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2021 16:14 IST

जात पंचायतीवर आरोप : सोलापूरच्या चार पंचांना केली अटक

सोलापूर : पती-पत्नीचा वाद झाला.. त्यानंतर समाजातील जातपंचायतीने त्या पतीसह त्याच्या तीन मुलांना तीन वर्षांपासून वाळीत टाकले. त्यातच भावाने आजारी आईला भेटू दिले नाही. त्यामुळे पती शरणीदास पांडुरंग भोसले (वय-४०, रा. सांगली) यांनी तीन वर्षांनंतर एमआयडीसी पोलीस ठाणे गाठत रीतसर फिर्याद दिली. त्यानुसार जातपंचायतीतील चार पंचांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.

धोंडिबा शिंदे पाटील, अशोक शिंदे पाटील, नाना शिंदे पाटील, संतोष रा. शिंदे, उत्तम शिंदे (सर्व, रा. न्यू शिवाजीनगर, गोंधळे वस्ती, अक्कलकोट रोड) अशी गुन्हा दाखल झालेल्या पंचांची नावे आहेत. शरणीदास भोसले यांचा विवाह २००३ मध्ये माया ननवरे यांच्याशी झाला होता. त्यानंतर २०१३ साली शरणीदास यांच्या पत्नी माया या आपल्या माहेरी निघून गेल्या. त्यानंतर अनेकवेळा कुटुंबातील मोठ्या सदस्यांनी समजूत घातल्यानंतर त्या पुन्हा नांदायला आल्या. पण, वारंवार भांडण करून त्या माहेरी जात होत्या. २०१८ मध्ये माया यांनी शरणीदास यांना समाजातील पंचांसमोर उभे केले. रा. धोंडिबा शिंदे पाटील, अशोक शिंदे पाटील, नाना शिंदे पाटील, संतोष रा. शिंदे, उत्तम शिंदे यांनी पंच म्हणून आपली भूमिका मांडली.

ही भूमिका मांडत असताना पंचांनी शरणीदास यांचे न ऐकता फक्त त्यांच्या पत्नीचे ऐकत शरणीदास यांच्यासह त्यांच्या तीन मुलांना जातीतून बाहेर काढले आणि वाळीत टाकले. फिर्यादी तेथून बाहेर येत असताना पंच म्हणून उपस्थित असलेले अशोक शिंदे यांनी तुझ्या पत्नीला नांदायला पाठवतो, यासाठी तू दोन लाख रुपये दे, अशी मागणी केली. त्याने पैसे देण्यास नकार दिला. यामुळे तेव्हापासून आजपर्यंत फिर्यादी व त्यांच्या तीन मुलांना समाजातून बहिष्कृत करण्यात आल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. घटनेचा तपास सचिन माळी हे करत आहेत.

वाळीत टाकण्याची भावालाही भीती

जातपंचायतीने आपल्याला वाळीत टाकले आहे, याचे मला जास्त वाईट वाटले नाही. पण, सहा महिन्यांपूर्वी आईची तब्येत बिघडल्यामुळे दुसऱ्या भावाकडे असलेल्या आईला पाहण्यासाठी गेल्यानंतर लहान भावाने ‘तू आमच्याकडे येऊ नकोस, तुझ्यामुळे आम्हालाही समाज वाळीत टाकेल’, असे म्हणत भीतीपोटी त्यानेही आम्हाला झिडकारले. यामुळे आजारी आईलाही पाहू न शकल्याचे मला जास्त वाईट वाटले. म्हणून मी कायदेशीर मार्गाचा अवलंब करत तक्रार दाखल केल्याचे शरणीदास भोसले यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस