शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

आंब्यानं पोरं व्हायला लागली तर या देशाचं कसं व्हायचं! शरद पवारांचा टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 05:58 IST

शास्त्रशुध्द विचारांसाठी पाठिंबा देऊन समाजाला मार्गदर्शन करणाऱ्या महाराजांची संख्या आता कमी झाली आहे. अलिकडे एक गुरुजी म्हणतात मुलगा होत नसेल तर आंबा खा, ही तर गमतीचीच गोष्ट आहे.

कुर्डूवाडी (ता़माढा, जि़सोलापूर) - शास्त्रशुध्द विचारांसाठी पाठिंबा देऊन समाजाला मार्गदर्शन करणाऱ्या महाराजांची संख्या आता कमी झाली आहे. अलिकडे एक गुरुजी म्हणतात मुलगा होत नसेल तर आंबा खा, ही तर गमतीचीच गोष्ट आहे. मी कृषीमंत्री असताना फळबागा लावा, आंब्याची झाडे लावा असे म्हणत होतो. आता आंब्यानं पोरं व्हायला लागली तर या देशाचं कसं व्हायचं, असा मिश्कील टोला खा. शरद पवार यांनी भिडे गुरुजी यांना टोला लगावला.येथील के. एन. भिसे महाविद्यालयाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या स्व. काशिनाथ भिसे यांच्या पुतळ्याचे अनावरण खा. पवार यांच्या हस्ते झाला. अध्यक्षस्थानी आमदार गणपतराव देशमुख होते. अमृत महोत्सवानिमित्त माजी आमदार विनायकराव पाटील यांचा सत्कारही करण्यात आला.बळीराजा जागृत अन् संघटीत झाला पाहिजे. शेतकºयांच्या उसाला, पिकांना दर मिळत नाही, अशी टीका पवार यांनी केली.संभाजी भिडेंना वाचविण्यासाठी ‘एल्गार’च्या बदनामीचा डावमुंबई : कोरेगाव भीमा प्रकरणातील दंगलीमागील मुख्य सूत्रधार संभाजी भिडे यांना वाचविण्यासाठी राज्य सरकारने बहुजन चळवळीतील कार्यकर्त्यांना विनाकारण अटक करून एल्गार परिषदेला बदनाम केले जात आहे. या अन्यायी कारवाईविरोधात न्यायालयात धाव घेण्याबरोबरच मोदी, शहा सरकारविरोधात देशभरातील जनतेला संघटित केले जाईल, असा इशारा निवृत्त न्या. बी.जी. कोळसे-पाटील यांनी मंगळवारी दिला. कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलीप्रकरणी पोलिसांनी सुधीर धवळे, सुरेंद्र गडलिंग, शोमा सेन, रोना विल्सन व महेश राऊत या कार्यकर्त्यांना अटक केली आहे. त्याच्या निषेधार्थ निवृत्ती न्या. कोळसे-पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘दंगलीतील खरे सूत्रधार असलेल्या भिडे यांच्या अटकेसाठी बहुजनांची अनेक आंदोलने होऊनही पोलीस कारवाई करीत नाहीत.‘आंबा थिअरी’च्या चौकशीचे आरोग्य संचालकांचे आदेशनाशिक : शिव प्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी यांच्या मूल होण्यासाठी माझ्या शेतातील आंबे उपयुक्त असल्याच्या दाव्याची चौकशी करण्याचे आदेश पुण्यातील आरोग्य सेवा संचालकांनी महापालिकेस दिले आहेत. रविवारी वडांगळीकर मठ येथे झालेल्या कार्यक्रमात संभाजी भिडे यांनी माझ्या शेतातील १८० पेक्षा जास्त आंबे दीडशे जणांना खायला दिले, त्यांना मुलेच झाली, तसेच ज्यांना मुलगा हवा असेल त्यांना मुलगाच होईल, असे विधान केले होते. त्यावर पडसाद उमटले. गणेश बोºहाडे यांनी ‘आंबा थिअरी’विरोधात तक्रार केली होती.

 

आंब्यानं पोरं व्हायला लागली तर या देशाचं कसं व्हायचं! 

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजी