शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सोलापूर जिल्ह्यात लम्पीने दररोज सात जनावरांचा मृत्यू

By शीतलकुमार कांबळे | Updated: May 23, 2023 12:37 IST

दोन ते तीन महिन्यांपुर्वी लम्पी आजार नियंत्रणात आला होता. आता मात्र पुन्हा आजाराला जनावरे बळी पडत आहेत.

सोलापूर : जिल्ह्यात दररोज सरासरी सात जनावरांचा लम्पीने मृत्यू होत आहे. तर दररोज 50 ते 60 जनावरे लम्पी बाधित होत आहेत. मागील दोन महिन्यांपासून जनावरांच्या आजारात सातत्याने वाढ होत आहे. यामुळे जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी यांनी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले.

दोन ते तीन महिन्यांपुर्वी लम्पी आजार नियंत्रणात आला होता. आता मात्र पुन्हा आजाराला जनावरे बळी पडत आहेत. पंढरपूर, मोहोळ, मंगळवेढा व सांगोला तालुक्यात सध्या सर्वात जास्त जनावरे बाधित होत आहे. औषधांचा साठा पुरेसा असून लसीकरणही झाले आहेत. तरीही लम्पी आजाराने बाधित होणाऱ्या जनावरांची संख्या वाढतच आहे. 

या पार्श्वभूमीवर सीईओ दिलीप स्वामी यांनी जिल्हा परिषदेतील अधिकारी, सर्व ग्रामपंचायती व पंचायत समिती मधील गट विकास अधिकारी व विस्तार अधिकारी, ग्रामसेवक यांची बैठक घेतली. या बैठकीत लम्पी आजार प्रतिबंधात्मक कामाच्या बाबतीत हलगर्जी करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाईचा प्रस्ताव पाठवा अशा सुचना पशुसंवर्धन विभागाचे विभाग प्रमुख नवनाथ नरळे यांना देण्यात आल्या. लम्पी आजाराने बाधित होणाऱ्या जनावरांच्या संख्येत वाढ होत असल्याचे निदर्शनास आले असल्याचे सीईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले. 

मृतांची संख्या वाढताना अनुदान बंद

जिल्ह्यात सध्या लम्पीने मृत होणाऱ्या जनावरांची संख्या वाढत आहे. या परिस्थितीत शासनाने 31 मार्चनंतर अनुदान देणे बंद केले आहे. यामुळे पशुपालकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. 1 एप्रिलनंतर मृत झालेल्यांना अनुदान मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये निराश झाले आहेत.

टॅग्स :Lumpy Skin Disease Virusलम्पी त्वचारोगSolapurसोलापूर