शहरं
Join us  
Trending Stories
1
Municipal Election 2026: अर्ज माघारीसाठी ५०-६० लाखांचं आमिष, विरोधी उमेदवारांच्या घरच्यांवरही दबाव; मनसेचा खळबळजनक आरोप
2
'हिंसक निदर्शनांमध्ये अमेरिका इराणमध्ये घुसण्यास तयार'; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा
3
KDMC Election 2026: डोंबिवलीत मनसेला धक्का, शहराध्यक्षाने अचानक अर्ज घेतला मागे; भाजपा उमेदवार बिनविरोध विजयी
4
Rahul Gandhi : "पाणी नाही, विष वाटलं, प्रशासन कुंभकर्णासारखं झोपेत"; राहुल गांधी आक्रमक, विचारले संतप्त सवाल
5
मनसेच्या बंडखोर उमेदवार अनिशा माजगावकर नॉट रिचेबल! खासदाराच्या मुलीविरोधात मैदानात 
6
Thane Municipal Election 2026: ठाण्यात एकनाथ शिंदेंचा मोठा धमाका! शिवसेनेचे पाच नगरसेवक बिनविरोध विजयी
7
पाकिस्तानच्या हाती लागला मोठा खजिना; देशाची गरिबी दूर होणार? पीएम शरीफ म्हणाले...
8
एकटी पाहून घरात घुसला, बळजबरी करू लागला, तरुणीने कुऱ्हाड उचलली आणि...
9
KFC आणि Pizza Hut च्या पॅरेंट कंपन्यांचं होणार मेगा मर्जर; McDonald’s आणि Domino’s चं टेन्शन वाढणार
10
मुंबईत मनसेला खिंडार, एकाचवेळी ११ पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे; भाजपात प्रवेश, कारण काय?
11
NPS मध्ये ऐतिहासिक सुधारणा: बँका स्थापन करू शकतील पेन्शन फंड, शुल्क आणि पैसे काढण्याचे नियमही बदलले
12
नाशिकमध्ये अर्ज मागे घेताना भाजपाच्या दोन उमेदवारांमध्ये हाणामारी, निवडणूक कार्यालयासमोरच भिडले
13
'तुम्ही दहशत पसरवली, तर भारत गप्प बसणार नाही', जयशंकर यांचा पाकिस्तानवर निशाणा
14
इराणमध्ये सत्ता उलथवून टाकण्याचा प्रयत्न, १०० बंदुका जप्त; खामेनींच्या सैन्याने सादर केले पुरावे
15
दशकभराच्या प्रवासाचा अखेर! टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार; चाहत्यांना मोठा धक्का
16
Gold Silver Price Today: २०२६ मध्येही सोन्या-चांदीची चमक कायम; चांदी ५६५६ रुपयांनी महागली, सोन्यातही जोरदार तेजी
17
'पाकिस्तानला उखडून टाका, आम्ही भारताबरोबर'; 'पाक'मधून कोणत्या नेत्याने लिहिले परराष्ट्र मंत्री जयशंकर यांना ओपन लेटर?
18
Health Tips: तरुणांमध्ये कॅन्सर वाढण्याची ५ धक्कादायक कारणं; डॉक्टरांनी सांगितले तातडीचे उपाय
19
"ज्यांच्यामुळे श्वास गुदमरत होता, ते आता च्यवनप्राश देताहेत का?" आशिष शेलारांचा राज ठाकरेंना सवाल
20
भाजपा नगरसेवकाच्या मुलाची गुंडगिरी; पोलिसाला मारली कानाखाली, संतप्त जमावाने दिला चोप
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यातील ३६९ औद्योगिक प्रकल्पात साडेसात हजार कामगार रुजू

By appasaheb.patil | Updated: June 3, 2020 11:39 IST

१००१ कारखानदारांनी परवानगी; अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी प्रयत्न

ठळक मुद्देकोरोना या संसर्गजन्य आजारामुळे देशभरात लॉकडाऊन पुकारण्यात आलालॉकडाऊन काळात औद्योगिक घटक बंद करण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या होत्यात्यानुसार जिल्ह्यातील सर्वच कारखानदारांनी आपले उद्योग बंद केले होते

सोलापूर : कोरोना संसर्गामुळे पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे औद्योगिक प्रकल्प बंद करण्यात आले होते. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यापासून सर्वत्र औद्योगिक घटक चालू करण्यास शासनाकडून परवानगी देण्यात येत आहे. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील १००१ कारखानदारांनी परवानगी घेतली असून, आतापर्यंत ३६९ सूक्ष्म, लघु प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. या प्रकल्पात ७ हजार ५०० कामगार काम करीत असल्याची माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे प्रमुख बी. टी.यशवंते यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे देशभरात लॉकडाऊन पुकारण्यात आला. या लॉकडाऊन काळात औद्योगिक घटक बंद करण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यातील सर्वच कारखानदारांनी आपले उद्योग बंद केले होते. लॉकडाऊनकाळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद असल्याने अर्थव्यवस्था बिघडत चालली होती. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी उद्योगधंदे सुरू होणे आवश्यक असल्याने राज्यातील सर्वच उद्योग काही अटी, नियमांच्या अधीन राहून सुरू करण्यास परवानगी दिली होती.  

सुरुवातीच्या काळात उद्योगधंदे सुरू करण्यास कारखानदारांकडून नकार देण्यात येत होता; मात्र आता लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात जिल्ह्यातील सर्वच औद्योगिक वसाहतीमधील कारखाने सुरू झाल्याचे सांगण्यात आले. आता देशात लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरू झाला आहे, यात आणखीन जास्तीत जास्त औद्योगिक घटक सुरू होण्याची आशा जिल्हा उद्योग केंद्राने व्यक्त केली. कामगारांच्या हाताला काम मिळाल्याने कामगार संघटनांनी आनंद व्यक्त केल्याचे सांगण्यात आले आहे़

या कारखान्यांचा आहे समावेश...- सोलापूर जिल्ह्यातील औद्योगिक प्रकल्पात जीवनावश्यक वस्तू, शेतीवर आधारित औद्योगिक प्रकल्प, सॅनिटायझर, मास्क, रासायानिक खते, बी-बियाणे, औषध निर्मिती व त्यास लागणारे रसायन निर्मिती, इंजिनिअरिंग वस्तू निर्मितीचा समावेश आहे. 

लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात शिथिलता दिल्यानंतर काही उद्योजकांनी रितसर परवानगी घेऊन नियम, अटींचे पालन करून औद्योगिक घटक सुरू केले आहेत. आता पाचव्या टप्प्यात जिल्ह्यात नक्कीच सर्वच कारखाने, प्रकल्प सुरू होतील. बेरोजगारांना रोजगार मिळेल यात शंका नाही. उद्योजकांनी कोरोना महामारीच्या काळात शासनाच्या नियमांचे पालन करून प्रकल्प सुरू करावेत.- बी. टी. यशवंते,जिल्हा उद्योग केंद्र, सोलापूर. 

टॅग्स :Solapurसोलापूरjobनोकरीbusinessव्यवसायcorona virusकोरोना वायरस बातम्या