शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

सोलापूर जिल्ह्यातील ३६९ औद्योगिक प्रकल्पात साडेसात हजार कामगार रुजू

By appasaheb.patil | Updated: June 3, 2020 11:39 IST

१००१ कारखानदारांनी परवानगी; अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी प्रयत्न

ठळक मुद्देकोरोना या संसर्गजन्य आजारामुळे देशभरात लॉकडाऊन पुकारण्यात आलालॉकडाऊन काळात औद्योगिक घटक बंद करण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या होत्यात्यानुसार जिल्ह्यातील सर्वच कारखानदारांनी आपले उद्योग बंद केले होते

सोलापूर : कोरोना संसर्गामुळे पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे औद्योगिक प्रकल्प बंद करण्यात आले होते. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यापासून सर्वत्र औद्योगिक घटक चालू करण्यास शासनाकडून परवानगी देण्यात येत आहे. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील १००१ कारखानदारांनी परवानगी घेतली असून, आतापर्यंत ३६९ सूक्ष्म, लघु प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. या प्रकल्पात ७ हजार ५०० कामगार काम करीत असल्याची माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे प्रमुख बी. टी.यशवंते यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे देशभरात लॉकडाऊन पुकारण्यात आला. या लॉकडाऊन काळात औद्योगिक घटक बंद करण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यातील सर्वच कारखानदारांनी आपले उद्योग बंद केले होते. लॉकडाऊनकाळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद असल्याने अर्थव्यवस्था बिघडत चालली होती. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी उद्योगधंदे सुरू होणे आवश्यक असल्याने राज्यातील सर्वच उद्योग काही अटी, नियमांच्या अधीन राहून सुरू करण्यास परवानगी दिली होती.  

सुरुवातीच्या काळात उद्योगधंदे सुरू करण्यास कारखानदारांकडून नकार देण्यात येत होता; मात्र आता लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात जिल्ह्यातील सर्वच औद्योगिक वसाहतीमधील कारखाने सुरू झाल्याचे सांगण्यात आले. आता देशात लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरू झाला आहे, यात आणखीन जास्तीत जास्त औद्योगिक घटक सुरू होण्याची आशा जिल्हा उद्योग केंद्राने व्यक्त केली. कामगारांच्या हाताला काम मिळाल्याने कामगार संघटनांनी आनंद व्यक्त केल्याचे सांगण्यात आले आहे़

या कारखान्यांचा आहे समावेश...- सोलापूर जिल्ह्यातील औद्योगिक प्रकल्पात जीवनावश्यक वस्तू, शेतीवर आधारित औद्योगिक प्रकल्प, सॅनिटायझर, मास्क, रासायानिक खते, बी-बियाणे, औषध निर्मिती व त्यास लागणारे रसायन निर्मिती, इंजिनिअरिंग वस्तू निर्मितीचा समावेश आहे. 

लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात शिथिलता दिल्यानंतर काही उद्योजकांनी रितसर परवानगी घेऊन नियम, अटींचे पालन करून औद्योगिक घटक सुरू केले आहेत. आता पाचव्या टप्प्यात जिल्ह्यात नक्कीच सर्वच कारखाने, प्रकल्प सुरू होतील. बेरोजगारांना रोजगार मिळेल यात शंका नाही. उद्योजकांनी कोरोना महामारीच्या काळात शासनाच्या नियमांचे पालन करून प्रकल्प सुरू करावेत.- बी. टी. यशवंते,जिल्हा उद्योग केंद्र, सोलापूर. 

टॅग्स :Solapurसोलापूरjobनोकरीbusinessव्यवसायcorona virusकोरोना वायरस बातम्या