शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
6
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
7
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
8
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
10
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
11
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
12
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
13
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
14
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
15
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
16
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
17
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
18
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
19
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
20
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!

सोलापूर जिल्ह्यातील ३६९ औद्योगिक प्रकल्पात साडेसात हजार कामगार रुजू

By appasaheb.patil | Updated: June 3, 2020 11:39 IST

१००१ कारखानदारांनी परवानगी; अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी प्रयत्न

ठळक मुद्देकोरोना या संसर्गजन्य आजारामुळे देशभरात लॉकडाऊन पुकारण्यात आलालॉकडाऊन काळात औद्योगिक घटक बंद करण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या होत्यात्यानुसार जिल्ह्यातील सर्वच कारखानदारांनी आपले उद्योग बंद केले होते

सोलापूर : कोरोना संसर्गामुळे पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे औद्योगिक प्रकल्प बंद करण्यात आले होते. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यापासून सर्वत्र औद्योगिक घटक चालू करण्यास शासनाकडून परवानगी देण्यात येत आहे. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील १००१ कारखानदारांनी परवानगी घेतली असून, आतापर्यंत ३६९ सूक्ष्म, लघु प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. या प्रकल्पात ७ हजार ५०० कामगार काम करीत असल्याची माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे प्रमुख बी. टी.यशवंते यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे देशभरात लॉकडाऊन पुकारण्यात आला. या लॉकडाऊन काळात औद्योगिक घटक बंद करण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यातील सर्वच कारखानदारांनी आपले उद्योग बंद केले होते. लॉकडाऊनकाळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद असल्याने अर्थव्यवस्था बिघडत चालली होती. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी उद्योगधंदे सुरू होणे आवश्यक असल्याने राज्यातील सर्वच उद्योग काही अटी, नियमांच्या अधीन राहून सुरू करण्यास परवानगी दिली होती.  

सुरुवातीच्या काळात उद्योगधंदे सुरू करण्यास कारखानदारांकडून नकार देण्यात येत होता; मात्र आता लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात जिल्ह्यातील सर्वच औद्योगिक वसाहतीमधील कारखाने सुरू झाल्याचे सांगण्यात आले. आता देशात लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरू झाला आहे, यात आणखीन जास्तीत जास्त औद्योगिक घटक सुरू होण्याची आशा जिल्हा उद्योग केंद्राने व्यक्त केली. कामगारांच्या हाताला काम मिळाल्याने कामगार संघटनांनी आनंद व्यक्त केल्याचे सांगण्यात आले आहे़

या कारखान्यांचा आहे समावेश...- सोलापूर जिल्ह्यातील औद्योगिक प्रकल्पात जीवनावश्यक वस्तू, शेतीवर आधारित औद्योगिक प्रकल्प, सॅनिटायझर, मास्क, रासायानिक खते, बी-बियाणे, औषध निर्मिती व त्यास लागणारे रसायन निर्मिती, इंजिनिअरिंग वस्तू निर्मितीचा समावेश आहे. 

लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात शिथिलता दिल्यानंतर काही उद्योजकांनी रितसर परवानगी घेऊन नियम, अटींचे पालन करून औद्योगिक घटक सुरू केले आहेत. आता पाचव्या टप्प्यात जिल्ह्यात नक्कीच सर्वच कारखाने, प्रकल्प सुरू होतील. बेरोजगारांना रोजगार मिळेल यात शंका नाही. उद्योजकांनी कोरोना महामारीच्या काळात शासनाच्या नियमांचे पालन करून प्रकल्प सुरू करावेत.- बी. टी. यशवंते,जिल्हा उद्योग केंद्र, सोलापूर. 

टॅग्स :Solapurसोलापूरjobनोकरीbusinessव्यवसायcorona virusकोरोना वायरस बातम्या