शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

ऊस बिलाची रक्कम थकवणाऱ्या राज्यातील २४ कारखान्यांना जप्तीच्या नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:19 IST

दक्षिण सोलापूर : शेतकऱ्यांच्या ऊस बिलाची एफआरपीची रक्कम थकवलेल्या राज्यातील २४ साखर कारखान्यांना साखरेचा साठा जप्त करण्याच्या नोटिसा साखर ...

दक्षिण सोलापूर : शेतकऱ्यांच्या ऊस बिलाची एफआरपीची रक्कम थकवलेल्या राज्यातील २४ साखर कारखान्यांना साखरेचा साठा जप्त करण्याच्या नोटिसा साखर आयुक्तांनी पाठविल्या आहेत. रक्कम थकित ठेवणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील ११ साखर कारखान्यांचा समावेश आहे.

यंदाचा गळीत हंगाम संपल्यानंतरही शेतकऱ्यांच्या ऊस बिलाच्या रकमा (एफआरपी) त्यांच्या बँक खात्यात जमा केल्या नाहीत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढत आहेत. शेतकरी संघटनांनी याबाबत राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू केला आहे. त्यामुळे साखर आयुक्तांनी शेतकऱ्यांची रक्कम थकवलेल्या राज्यातील २४ कारखान्यांना आरआरसी (महसुली वसुली प्रमाणपत्र) कारवाई सुरू केली आहे. याबाबतची नोटीस संबंधित कारखान्यांना पाठविण्यात आली आहे. साखरेची जप्ती करण्याची ही कारवाई असणार आहे.

यंदा राज्यात १९० साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला. हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एफआरपीची २१ हजार ४५४ कोटी रुपये जमा झाले आहेत. मात्र, १ हजार ४५४ कोटी रुपये शेतकऱ्यांची देणी कारखान्यांनी दिलेली नाहीत. त्यातील ६५७ कोटी रुपये केवळ २४ कारखान्यांकडे थकले आहेत. गाळप घेतलेल्या १०३ कारखान्यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण रक्कम अदा केली आहे, तर निम्म्याहून अधिक कारखाने हप्त्याहप्त्याने रकमा जमा करीत आहेत.

-------

सोलापूर जिल्हा आघाडीवर

एफआरपी थकविणाऱ्यांत सोलापूर जिल्ह्यातील ११ साखर कारखान्यांचा समावेश आहे. त्यात लोकमंगल ॲग्रो भंडारकवठे, लोकमंगल शुगर बीबीदारफळ, श्री विठ्ठल वेणूनगर, विठ्ठल रिफाइंड शुगर, सिद्धनाथ शुगर तिऱ्हे, गोकुळ माऊली शुगर तडवळ, जय हिंद शुगर आचेगाव, भीमा टाकळी कारखाना, गोकुळ शुगर धोत्री, संत दामाजी मंगळवेढा, मकाई भिलारवाडी या कारखान्यांना जप्तीच्या नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत.

-----

जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईकडे लक्ष

साखर आयुक्तांनी शेतकऱ्यांच्या ऊस बिलाची रक्कम वसुलीसाठी आरआरसी कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना दिले आहेत. यापूर्वीही असे आदेश साखर आयुक्तांनी दिले होते. तरीही कारवाईबाबत खंबीर भूमिका न घेतल्याने मागील हंगामातील एफआरपीच्या रकमा अद्यापही शेतकऱ्यांना मिळाल्या नाहीत. आता साखर आयुक्तांनी काढलेल्या आदेशानंतर जिल्हाधिकारी कारवाईबाबत किती तत्परता दाखवतील याकडे शेतकऱ्यांचे लक्ष असणार आहे.

--------

आरआरसी कारवाई हा नुसता फार्स असतो. त्यातून शेतकऱ्यांच्या रकमा मिळण्याची शक्यता कमीच असते. म्हणूनच या कारवाईची मागणी आम्ही करीत नाही. ऊस गाळपाला नेल्यानंतर १४ दिवसांच्या आत रक्कम दिली नाही तर कारखान्यांचे परवाने निलंबित करा, अशी आमची मागणी आहे. १४ दिवसानंतर व्याजासह रक्कम मिळाली पाहिजे, यासाठी साखर आयुक्तांनी आदेश काढला पाहिजे.

- प्रभाकरभैय्या देशमुख, संस्थापक जनहित शेतकरी संघटना.