शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

ऊस बिलाची रक्कम थकवणाऱ्या राज्यातील २४ कारखान्यांना जप्तीच्या नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:19 IST

दक्षिण सोलापूर : शेतकऱ्यांच्या ऊस बिलाची एफआरपीची रक्कम थकवलेल्या राज्यातील २४ साखर कारखान्यांना साखरेचा साठा जप्त करण्याच्या नोटिसा साखर ...

दक्षिण सोलापूर : शेतकऱ्यांच्या ऊस बिलाची एफआरपीची रक्कम थकवलेल्या राज्यातील २४ साखर कारखान्यांना साखरेचा साठा जप्त करण्याच्या नोटिसा साखर आयुक्तांनी पाठविल्या आहेत. रक्कम थकित ठेवणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील ११ साखर कारखान्यांचा समावेश आहे.

यंदाचा गळीत हंगाम संपल्यानंतरही शेतकऱ्यांच्या ऊस बिलाच्या रकमा (एफआरपी) त्यांच्या बँक खात्यात जमा केल्या नाहीत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढत आहेत. शेतकरी संघटनांनी याबाबत राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू केला आहे. त्यामुळे साखर आयुक्तांनी शेतकऱ्यांची रक्कम थकवलेल्या राज्यातील २४ कारखान्यांना आरआरसी (महसुली वसुली प्रमाणपत्र) कारवाई सुरू केली आहे. याबाबतची नोटीस संबंधित कारखान्यांना पाठविण्यात आली आहे. साखरेची जप्ती करण्याची ही कारवाई असणार आहे.

यंदा राज्यात १९० साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला. हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एफआरपीची २१ हजार ४५४ कोटी रुपये जमा झाले आहेत. मात्र, १ हजार ४५४ कोटी रुपये शेतकऱ्यांची देणी कारखान्यांनी दिलेली नाहीत. त्यातील ६५७ कोटी रुपये केवळ २४ कारखान्यांकडे थकले आहेत. गाळप घेतलेल्या १०३ कारखान्यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण रक्कम अदा केली आहे, तर निम्म्याहून अधिक कारखाने हप्त्याहप्त्याने रकमा जमा करीत आहेत.

-------

सोलापूर जिल्हा आघाडीवर

एफआरपी थकविणाऱ्यांत सोलापूर जिल्ह्यातील ११ साखर कारखान्यांचा समावेश आहे. त्यात लोकमंगल ॲग्रो भंडारकवठे, लोकमंगल शुगर बीबीदारफळ, श्री विठ्ठल वेणूनगर, विठ्ठल रिफाइंड शुगर, सिद्धनाथ शुगर तिऱ्हे, गोकुळ माऊली शुगर तडवळ, जय हिंद शुगर आचेगाव, भीमा टाकळी कारखाना, गोकुळ शुगर धोत्री, संत दामाजी मंगळवेढा, मकाई भिलारवाडी या कारखान्यांना जप्तीच्या नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत.

-----

जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईकडे लक्ष

साखर आयुक्तांनी शेतकऱ्यांच्या ऊस बिलाची रक्कम वसुलीसाठी आरआरसी कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना दिले आहेत. यापूर्वीही असे आदेश साखर आयुक्तांनी दिले होते. तरीही कारवाईबाबत खंबीर भूमिका न घेतल्याने मागील हंगामातील एफआरपीच्या रकमा अद्यापही शेतकऱ्यांना मिळाल्या नाहीत. आता साखर आयुक्तांनी काढलेल्या आदेशानंतर जिल्हाधिकारी कारवाईबाबत किती तत्परता दाखवतील याकडे शेतकऱ्यांचे लक्ष असणार आहे.

--------

आरआरसी कारवाई हा नुसता फार्स असतो. त्यातून शेतकऱ्यांच्या रकमा मिळण्याची शक्यता कमीच असते. म्हणूनच या कारवाईची मागणी आम्ही करीत नाही. ऊस गाळपाला नेल्यानंतर १४ दिवसांच्या आत रक्कम दिली नाही तर कारखान्यांचे परवाने निलंबित करा, अशी आमची मागणी आहे. १४ दिवसानंतर व्याजासह रक्कम मिळाली पाहिजे, यासाठी साखर आयुक्तांनी आदेश काढला पाहिजे.

- प्रभाकरभैय्या देशमुख, संस्थापक जनहित शेतकरी संघटना.