शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

रस्ते डागडुजीसाठी ऊस उत्पादकांच्या खिशाला कात्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:19 IST

माळशिरस : सध्या ऊसतोडणी हंगाम सुरू आहे. यातच ग्रामीण भागातील लहान-मोठ्या अनेक रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. यामुळे ऊस वाहतूक ...

माळशिरस : सध्या ऊसतोडणी हंगाम सुरू आहे. यातच ग्रामीण भागातील लहान-मोठ्या अनेक रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. यामुळे ऊस वाहतूक करणे धोक्याचे बनले आहे. अखेर अनेक शेतकऱ्यांनी एकत्र येत स्वखर्चातून रस्त्यांची डागडुजी सुरू केली आहे. यामुळे ऊस उत्पादकांना शेतातून ऊस बाहेर काढण्यासाठी खिशाला कात्री लावावी लागत असल्याचे दिसून येत आहे.

या रस्त्यांसाठी शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधी, साखर कारखाने व बांधकाम विभागाकडे खेटे घातले. मात्र सर्वत्र निधीचा ठणठणाट असल्यामुळे या रस्त्यांकडे दुर्लक्ष होत आहे. ऊस वाहतूक करण्यासाठी सर्रास ट्रॅक्टर, ट्रकचा वापर होत आहे. उसाच्या जड वाहतुकीसाठी चांगल्या रस्त्याची आवश्यकता असते, मात्र काही शेतकऱ्यांचा आडमुठेपणा व अतिवृष्टी यामुळे शेतशिवारातून जाणारे लहान-मोठे रस्ते धोकादायक बनले आहेत. याचा सर्वाधिक फटका ऊस वाहतुकीला बसत आहे. यासाठी अनेक शेतकरी संबंधित विभागाकडे निधीसाठी खेटे घालून थकले. अखेर शेतकऱ्यांना स्वतःच्या खिशातूनच रस्त्यांची डागडुजी करावी लागत आहे. नुकतीच भांबुर्डी येथील शेतकरी रामराव गोरड यांनी स्वखर्चाने रस्त्याची डागडुजी केली आहे.

रस्ते अडविण्याची संकल्पना

ग्रामीण भागात वाड्या-वस्त्या, शेतशिवारांना रस्त्यांनी जोडण्यासाठी शासनाने अनेक योजना राबविल्या. मात्र काही शेतकरी आडमुठेपणाने वागत रस्ते अडविण्याचे धोरण राबवत आहेत. याकडे महसूल प्रशासन व लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. याबाबत कडक कायदे व कारवाई होण्याची गरज असल्याची चर्चा शेतकऱ्यांत होत आहे.

कोट :::::::::::::::::::::

रस्ता ही प्रत्येकाची मूलभूत गरज आहे. यातच अलीकडच्या काळात यांत्रिकीकरणाचा वापर वाढला आहे. यामुळे रस्त्यांची आवश्यकता प्रत्येक शेतकऱ्याला भासत आहे. त्यामुळे ऊस वाहतुकीवेळी डागडुजीसाठी निधी उपलब्ध होण्याची गरज आहे.

रामराव गोरड, ऊस उत्पादक शेतकरी, भांबुर्डी

फोटो :::::::::::::::::

भांबुर्डी येथील शेतकरी एकत्र येत रस्त्याची डागडुजी करत असल्याचे छायाचित्र.