शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
4
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
5
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
6
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
7
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
8
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
9
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
10
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
11
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
12
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
13
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
14
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
15
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
16
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
17
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
18
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
19
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
20
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक

रस्ते डागडुजीसाठी ऊस उत्पादकांच्या खिशाला कात्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:19 IST

माळशिरस : सध्या ऊसतोडणी हंगाम सुरू आहे. यातच ग्रामीण भागातील लहान-मोठ्या अनेक रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. यामुळे ऊस वाहतूक ...

माळशिरस : सध्या ऊसतोडणी हंगाम सुरू आहे. यातच ग्रामीण भागातील लहान-मोठ्या अनेक रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. यामुळे ऊस वाहतूक करणे धोक्याचे बनले आहे. अखेर अनेक शेतकऱ्यांनी एकत्र येत स्वखर्चातून रस्त्यांची डागडुजी सुरू केली आहे. यामुळे ऊस उत्पादकांना शेतातून ऊस बाहेर काढण्यासाठी खिशाला कात्री लावावी लागत असल्याचे दिसून येत आहे.

या रस्त्यांसाठी शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधी, साखर कारखाने व बांधकाम विभागाकडे खेटे घातले. मात्र सर्वत्र निधीचा ठणठणाट असल्यामुळे या रस्त्यांकडे दुर्लक्ष होत आहे. ऊस वाहतूक करण्यासाठी सर्रास ट्रॅक्टर, ट्रकचा वापर होत आहे. उसाच्या जड वाहतुकीसाठी चांगल्या रस्त्याची आवश्यकता असते, मात्र काही शेतकऱ्यांचा आडमुठेपणा व अतिवृष्टी यामुळे शेतशिवारातून जाणारे लहान-मोठे रस्ते धोकादायक बनले आहेत. याचा सर्वाधिक फटका ऊस वाहतुकीला बसत आहे. यासाठी अनेक शेतकरी संबंधित विभागाकडे निधीसाठी खेटे घालून थकले. अखेर शेतकऱ्यांना स्वतःच्या खिशातूनच रस्त्यांची डागडुजी करावी लागत आहे. नुकतीच भांबुर्डी येथील शेतकरी रामराव गोरड यांनी स्वखर्चाने रस्त्याची डागडुजी केली आहे.

रस्ते अडविण्याची संकल्पना

ग्रामीण भागात वाड्या-वस्त्या, शेतशिवारांना रस्त्यांनी जोडण्यासाठी शासनाने अनेक योजना राबविल्या. मात्र काही शेतकरी आडमुठेपणाने वागत रस्ते अडविण्याचे धोरण राबवत आहेत. याकडे महसूल प्रशासन व लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. याबाबत कडक कायदे व कारवाई होण्याची गरज असल्याची चर्चा शेतकऱ्यांत होत आहे.

कोट :::::::::::::::::::::

रस्ता ही प्रत्येकाची मूलभूत गरज आहे. यातच अलीकडच्या काळात यांत्रिकीकरणाचा वापर वाढला आहे. यामुळे रस्त्यांची आवश्यकता प्रत्येक शेतकऱ्याला भासत आहे. त्यामुळे ऊस वाहतुकीवेळी डागडुजीसाठी निधी उपलब्ध होण्याची गरज आहे.

रामराव गोरड, ऊस उत्पादक शेतकरी, भांबुर्डी

फोटो :::::::::::::::::

भांबुर्डी येथील शेतकरी एकत्र येत रस्त्याची डागडुजी करत असल्याचे छायाचित्र.