शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते डागडुजीसाठी ऊस उत्पादकांच्या खिशाला कात्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:19 IST

माळशिरस : सध्या ऊसतोडणी हंगाम सुरू आहे. यातच ग्रामीण भागातील लहान-मोठ्या अनेक रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. यामुळे ऊस वाहतूक ...

माळशिरस : सध्या ऊसतोडणी हंगाम सुरू आहे. यातच ग्रामीण भागातील लहान-मोठ्या अनेक रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. यामुळे ऊस वाहतूक करणे धोक्याचे बनले आहे. अखेर अनेक शेतकऱ्यांनी एकत्र येत स्वखर्चातून रस्त्यांची डागडुजी सुरू केली आहे. यामुळे ऊस उत्पादकांना शेतातून ऊस बाहेर काढण्यासाठी खिशाला कात्री लावावी लागत असल्याचे दिसून येत आहे.

या रस्त्यांसाठी शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधी, साखर कारखाने व बांधकाम विभागाकडे खेटे घातले. मात्र सर्वत्र निधीचा ठणठणाट असल्यामुळे या रस्त्यांकडे दुर्लक्ष होत आहे. ऊस वाहतूक करण्यासाठी सर्रास ट्रॅक्टर, ट्रकचा वापर होत आहे. उसाच्या जड वाहतुकीसाठी चांगल्या रस्त्याची आवश्यकता असते, मात्र काही शेतकऱ्यांचा आडमुठेपणा व अतिवृष्टी यामुळे शेतशिवारातून जाणारे लहान-मोठे रस्ते धोकादायक बनले आहेत. याचा सर्वाधिक फटका ऊस वाहतुकीला बसत आहे. यासाठी अनेक शेतकरी संबंधित विभागाकडे निधीसाठी खेटे घालून थकले. अखेर शेतकऱ्यांना स्वतःच्या खिशातूनच रस्त्यांची डागडुजी करावी लागत आहे. नुकतीच भांबुर्डी येथील शेतकरी रामराव गोरड यांनी स्वखर्चाने रस्त्याची डागडुजी केली आहे.

रस्ते अडविण्याची संकल्पना

ग्रामीण भागात वाड्या-वस्त्या, शेतशिवारांना रस्त्यांनी जोडण्यासाठी शासनाने अनेक योजना राबविल्या. मात्र काही शेतकरी आडमुठेपणाने वागत रस्ते अडविण्याचे धोरण राबवत आहेत. याकडे महसूल प्रशासन व लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. याबाबत कडक कायदे व कारवाई होण्याची गरज असल्याची चर्चा शेतकऱ्यांत होत आहे.

कोट :::::::::::::::::::::

रस्ता ही प्रत्येकाची मूलभूत गरज आहे. यातच अलीकडच्या काळात यांत्रिकीकरणाचा वापर वाढला आहे. यामुळे रस्त्यांची आवश्यकता प्रत्येक शेतकऱ्याला भासत आहे. त्यामुळे ऊस वाहतुकीवेळी डागडुजीसाठी निधी उपलब्ध होण्याची गरज आहे.

रामराव गोरड, ऊस उत्पादक शेतकरी, भांबुर्डी

फोटो :::::::::::::::::

भांबुर्डी येथील शेतकरी एकत्र येत रस्त्याची डागडुजी करत असल्याचे छायाचित्र.