शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सोलापूर शहरातील समाधींनी घेतला मोकळा श्वास...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 14:26 IST

धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे स्मशानभूमी स्वच्छता मोहिम; ३३़०० स्दस्यांनी १४० टन कचरा केला गोळा

ठळक मुद्दे५५० साधकांनी गोळा केला ४ टन कचरापावसाला न जुमानता केली स्वच्छताकुंपणाला तिरडीच्या लाकडाचा आधार

सोलापूर : जन्माला आलेली व्यक्ती एक ना एक दिवस जगाचा निरोप घेणारच... शनिवारी रात्री अंत्यसंस्कार केलेली चिता सकाळपर्यंत जळत होती. एकीकडे चिता जळत असताना दुसरीकडे धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सदस्य कठड्याखाली व आजूबाजूला पडलेली राख आणि कचरा गोळा करीत होते. सकाळी ७ पासून १0.३0 पर्यंत १२५ ते १५० सदस्यांनी पावसाची पर्वा न करता संपूर्ण शहरात असलेल्या ११ स्मशानभूमीची स्वच्छता केली.

  • -  कुणाच्या हातात फावडा, कुणाच्या हातात कुºहाड, झाडू, टोपली, सत्तूर, कुणी कुणाला काही सांगत नाही. स्वच्छता करण्यात सगळेच मग्न. लष्करी शिस्त कशी असते याचे उदाहरण म्हणजे धर्माधिकारी प्रतिष्ठानचे स्वच्छता अभियान. मोदी स्मशानभूमीत धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी स्वच्छता अभियान राबविले. काटेरी झुडपांनी वर्षानुवर्षे वेढलेल्या समाधींनी मोकळा श्वास घेतला.
  • - सकाळी सात वाजता सुरू झालेले अभियान दुपारी १२ वाजेपर्यंत सुरू होते. स्मशानभूमीच्या बाहेर कार, मोटरसायकल, सायकली पार्क करण्यात आल्या होत्या. अभियान राबविताना कारमधून आलेला साधक आणि सायकलवरून आलेला सदस्य यांच्यात भेद नव्हता. तितक्याच तळमळीने सर्व सदस्य अभियान राबवत होते. 

५५० साधकांनी गोळा केला ४ टन कचरा- धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या बैठकीमध्ये येणाºया वेगवेगळ्या ठिकाणच्या सदस्यांनी मोदी स्मशानभूमीत स्वच्छता केली. यात ताकमोगे वस्ती, गोविंद पार्क, सलगर वस्ती, अभिमानश्री येथील साधकांचा सहभाग होता. सुमारे ५५० सदस्यांनी स्वच्छता अभियान राबविले. महापालिकेची जेसीबी मशीन व ट्रक यांनीही या अभियानाला मदत केली. या अभियानातून चार टन कचरा गोळा करण्यात आला.

पावसाला न जुमानता केली स्वच्छता- अभियानाची वेळ सकाळी सात वाजल्यापासूनची होती. तर पहाटे सहा वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली; मात्र सदस्यांच्या मनात पावसाची काळजी नव्हती. दिलेल्या वेळी त्यांनी स्वच्छता करण्याचे काम हाती घेतले आणि तडीस नेले सुद्धा. पाऊस पडत असल्याने स्वच्छता अभियान होईल की नाही याबाबत कुणाच्याही मनात शंका नव्हती.

कुंपणाला तिरडीच्या लाकडाचा आधार- स्मशानभूमीत अस्ताव्यस्त पडलेल्या तिरडीची लाकडे साधकांनी गोळा केली. ही लाकडे फेकून न देता यापासून लाकडाचे कुंपण बनवण्यात येणार आहे. झाडे लावल्यानंतर त्यांना धोका पोहोचू नये, यासाठी तयार करण्यात येणाºया कुंपणाला तिरडीच्या लाकडाचा आधार देण्यात येत आहे.

इतक्या साहित्यांचा  झाला वापर- स्वच्छता अभियान राबवताना काही साहित्यांचा वापर करण्यात आला. काहींना प्रतिष्ठानतर्फे साहित्य पुरवण्यात आले तर काहींनी घरुन येतानाच साहित्य आणले होते. मोदी स्मशानभूमीत ५०० जणांनी फावडे - ४८ , कुºहाड - ८०, टोपली - १६०, सत्तूर - ६० , झाडू - ६० अशा ४०८ साहित्यांचा वापर  करण्यात आला.

टॅग्स :SolapurसोलापूरSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान