शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण कोरोनाचा शहराला फटका; व्यापाऱ्यांचा संयम सुटला, आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 14:07 IST

सवलत न देता लादतात निर्बंध : एक जूनपासून दुकाने न उघडल्यास रस्त्यावर उतरणार

सोलापूर : शहरातील रुग्णसंख्या कमी झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने १ जूनपासून दुकाने खुली करण्याची परवानगी द्यावी. ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढतेय म्हणून शहराला का वेठीस धरता? असा संतप्त सवाल व्यापाऱ्यांनी रविवारी उपस्थित केला. १ जूनपासून दुकाने न उघडल्यास व्यापारी रस्त्यावर उतरतील, असा इशाराही दिला.

शहरातील बाजारपेठ खुली करावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी लावून धरली आहे. व्यापाऱ्यांच्या प्रतिनिधींनी शनिवारी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेतली होती. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी १ जूनपासून दुकाने खुली झालीच पाहिजेत यावर जोर दिला. चेंबर ऑफ कॉमर्सचे सदस्य मोहन सचदेव म्हणाले, ग्रामीणमधील रुग्ण वाढत असल्याने शहरातील दुकाने सुरू करण्यात अडचण येत असल्याचे पालकमंत्र्यांनी आम्हाला सांगितले. सध्या नाशिक, नंदुरबार आदी ठिकाणी दुकाने सुरू होत आहेत. सुरत कापड मार्केट सुरू झाले आहे. त्यामुळे राज्यातील दुकाने सुरू करण्यास परवानगी दिलीच पाहिजे. सरकार व्यापाऱ्यांना कोणत्याही प्रकारची सवलत देत नाही. पण निर्बंध लादत आहे. वीजबिलात अजूनही सवलत दिलेली नाही. कोरोनाची लस मिळत नाही. सोलापूरला कोणीही वाली नसल्याने अन्याय वाढत आहे. आता दुकाने सुरूच झालीच पाहिजे. पुन्हा कोरोना वाढला तर दुकाने बंद करा.

 

राज्यातील व्यापाऱ्यांच्या सर्व संघटना आता एकत्र आल्या आहेत. ज्या भागात रुग्णसंख्या कमी झाली. त्या भागात निर्बंध लावून दुकाने खुली करण्यास परवानगी द्यावी, अशी प्रमुख मागणी आहे. सोलापूर शहरातील रुग्णसंख्या एप्रिल महिन्याच्या तुलनेत आता कमी झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने दुकानांची वेळ निश्चित परवाने देणे आवश्यक आहे. अनेक दुकानदारांचे भाडे, वीजबिल, बँकांचे हप्ते सुरूच आहेत. वारंवार होणारे नुकसान परवडणारे नाही. १ जूनपासून दुकाने सुरू न झाल्यास रस्त्यावर उतरावे लागेल.

- राजू राठी, अध्यक्ष, चेंबर ऑफ कॉमर्स

 

सोलापुरातील व्यापारी आता संतप्त झाले आहेत. त्यांच्यासाठी आम्ही मैदानात उतरलो आहोत. तीनवेळा आमदार, एकवेळ मंत्री राहिलेले सोलापूरचे आमदार दुकाने सुरू करावेत म्हणून महापौरांना निवेदन देतात हे शहराचे दुर्दैव आहे. खरे तर या आमदारांनी इतर आमदारांना एकत्र करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटले पाहिजे होते. विभागीय आयुक्तांकडे ठाण मांडला. आम्ही व्यापाऱ्यांना घेऊन पालकमंत्र्यांना भेटलो. १ जूनपासून सोलापुरातील दुकाने सुरू झालीच पाहिजेत. अन्यथा आम्ही व्यापाऱ्यांसोबत रस्त्यावर उतरू.

- आनंद चंदनशिवे, प्रदेश प्रवक्ते, वंचित बहुजन आघाडी

शहरातील व्यापाऱ्यांचा वारंवार अंत पाहणे बरोबर नाही. प्रशासनाने ठराविक वेळ निश्चित करावी. व्यापाऱ्यांसोबत बैठक घ्यावी. काय नियम लावायचे आहेत ते लावावेत. पण दुकाने सुरू करायला परवानगी दिलीच पाहिजे. बंद दुकानातील माल चांगला आणि सडला आहे हे कळायला मार्ग नाही. अनेक लोकांना या चिंतेने रात्रभर झोप लागत नाही. कोरोनाने नव्हे तर या चिंतेमुळे काही लोकांना आयुष्यभराचा त्रास होईल. शासन आणि प्रशासनाने आता दुकाने खुली केलीच पाहिजेत.

- धवल शहा, मानद सचिव, चेंबर ऑफ कॉमर्स

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्या