शहरं
Join us  
Trending Stories
1
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
2
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
3
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
4
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
5
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
6
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
7
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
8
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
9
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
10
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
11
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
12
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
13
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
14
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
15
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
16
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
17
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
18
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

वर्षाकाठी दहा हजारांचा महसूल देणाºया रिक्षावाल्यांना हवीय दरमहा सात हजारांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 13:03 IST

लॉकडाऊनमुळे १८ हजार चालक हतबल; दिल्ली, आंध्र, कर्नाटकात पाच तर गुजरातमध्ये दहा हजारांची मदत

ठळक मुद्देइंधन दरवाढ तुलनेत रिक्षाचालकांना दरवर्षी आरटीओकडून दर ठरवून घ्यावा लागतो दरवाढी संदर्भात २०१७ साली खटवा आणि हकीम समिती नेमलीमागील आठ वर्षांत रिक्षाचालकांना एकदाही दरवाढ करता आली नाही

काशिनाथ वाघमारे 

सोलापूर : सर्वसामान्यांचा आधारवड म्हणून पाहिल्या जाणाºया रिक्षाचालकांची कोरोना काळात उपासमार थांबलेली नाही. दिल्ली, कर्नाटक आणि आंध्र सरकारने पाच हजारांची तर गुजरात सरकारने दहा हजारांची मदत करून रिक्षाचालकांना दिलासा दिला; मात्र वर्षाला दहा हजारांचा महसूल देणारे सोलापुरातील १८ हजार रिक्षाचालक या काळात उपेक्षित राहिले आहेत.

 सोलापूर शहरात सध्या सहा हजार रिक्षाचालक तर ग्रामीण भागात १२ हजार रिक्षाचालक आहेत. कोरोना काळात सॅनिटायझर करणे, पडदा लावणे अशा नियमांची सक्ती करून खर्च वाढवला.

एक लाख लोकसंख्येमागे ८०० परवाने देणे नियम असताना शासनाने महसूल मिळवण्याच्या नादात ‘मागेल त्याला परवाना’ देऊन रिक्षा व्यावसायिकांमध्ये जीवघेणी स्पर्धा लावून दिली. या नवीन परवान्यामुळे कर्ज काढून अनेकांनी रिक्षा घेतल्या़ आज पहिल्या एक किलोमीटरला ११ रुपयांनी सुरुवात होते. मीटरप्रमाणे होणारे भाडे प्रवाशांना परवडत नाही; मात्र मागील आठ वर्षांत इंधन दरात अनेकदा वाढ झाली. एलपीजीचा दर ४० रुपये लिटर झाला आहे. सध्या रिक्षाचालक अनेक समस्यांच्या कात्रीत  सापडला आहे़ पोलीस ठाण्यांना मोजक्याच रिक्षा लावून नियम, अटी घालण्यात आल्या. घुसमट सहन करून जगणाºया रिक्षाचालकांना महाराष्ट्र सरकारकडून ना करात सवलत मिळाली, ना आर्थिक मदत मिळाली.

हकीम समितीची अंमलबजावणी कधी?-  इंधन दरवाढ तुलनेत रिक्षाचालकांना दरवर्षी आरटीओकडून दर ठरवून घ्यावा लागतो़ दरवाढी संदर्भात २०१७ साली खटवा आणि हकीम समिती नेमली. या समितीने दरवर्षी रिक्षाचालकांना भाडेवाढीला मान्यता दिली. याची अद्याप अंमलबजावणी नाही़ - सोलापुरात २०१२ साली आरटीओने शेवटची दरवाढ दिली. मागील आठ वर्षांत रिक्षाचालकांना एकदाही दरवाढ करता आली नाही. जीवघेणी स्पर्धा कमी करण्यासाठी २०१८-१९ मध्ये नव्याने परवाना देणे थांबवण्यासाठी त्यांनी आंदोलने केली़

रिक्षाचालकांपुढील प्रश्न आजही सुटलेले नाहीत़ कल्याणकारी मंडळाचा विषय अन् तीन हजार पेन्शन देण्याचा विषयही बाजूला पडला. किमान कोरोना काळात सरकारने कर्नाटक आणि गुजरात सरकारच्या धर्तीवर मदत करावी़ शक्यच नसेल तर विविध प्रकारचा वार्षिक कर रद्द करावा अशी अपेक्षा आहे.- महिपती पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस रिक्षा सेल

लॉकडाऊन काळात रिक्षाचालकांवर शासनाचे निर्बंध आले. ते ठिक आहे; मात्र सरकारने या काळात महिना ७५०० रुपयांची मदत द्यावी. या मदतीसाठी ५ मे आणि त्या पूर्वीपासून मुख्यमंत्र्यांसह संबंधित मंत्र्यांकडे पाठपुरावा करतोय. खासगी सावकार आणि फायनान्स तगादा थांबवण्यासाठी कर्ज पुनर्गठित करावे़ - सलीम मुल्लाराज्य सचिव, सीआयटी महाराष्ट्र

टॅग्स :Solapurसोलापूरauto rickshawऑटो रिक्षाGovernmentसरकारcorona virusकोरोना वायरस बातम्या