शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

लोकशाही सशक्तीकरणात युवकांची भूमिका महत्वाची, राज्य निवडणूक आयुक्त ज़ स़ सहारिया यांचे प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 12:12 IST

लोकशाही सशक्त होण्यासाठी तरुणाईची भूमिका महत्वाची आहे असे प्रतिपादन राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहरिया यांनी आज येथे केले.

ठळक मुद्देसोलापूर विद्यापीठातर्फे लोकशाही पंधरवडा कार्यक्रमात लोकशाही, निवडणुका आणि सुशासन या विषयावर एक दिवसाचे चर्चासत्र मतदार यादीत आपले नांव आहे का हे प्रत्येक नागरिकांने तपासायला हवे : सहारियास्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अद्याप म्हणावे तितके संशोधन झालेले नाही : सहारिया

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर  दि. ७ :  लोकशाही सशक्त होण्यासाठी तरुणाईची भूमिका महत्वाची आहे असे प्रतिपादन राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहरिया यांनी आज येथे केले.सोलापूर विद्यापीठातर्फे लोकशाही पंधरवडा कार्यक्रमात लोकशाही, निवडणुका आणि सुशासन या विषयावर एक दिवसाचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्राच्या उदघाटनाच्या भाषणात जे़ स़ सहारिया बोलत होते. सोलापूर विद्यापीठातील सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास व्यासपीठावर प्रभारी कुलगुरु नितीन करमळकर, राज्य निवडणुक आयोगाचे सचिव शेखर चन्ने, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, सोलापूर महापालिकेचे आयुक्त  डॉ. अविनाश ढाकणे, कुलसचिव डी.आर. मंझा आदी उपस्थित होते.सहारिया म्हणाले, भारतीय लोकशाही सशक्त आणि अधिक मजबूत होण्यासाठी मतदानाची टक्केवारी वाढायला हवी. नवीन आणि तरुण मतदांरानी यासाठी पुढाकार घ्यायलय हवा. तरुणांनी मतदार यादीत नांवनोंदणी तर करायला हवी. त्याचबरोबर मतदानाचा हक्क बजावयाला हवा. लोकशाही बळकट होण्यासाठी तरुणांच्या बरोबरच विद्यापीठे महत्वाची भूमिका बजावू शकतात.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अद्याप म्हणावे तितके संशोधन झालेले नाही. अशा प्रकारचे संशोधन होण्याची आवश्यकता आहे. यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही आयुक्त ज.स. सहारिया यांनी केले.मतदार यादीत आपले नांव आहे का हे प्रत्येक नागरिकांने तपासायला हवे. मतदार यादी अद्यावत करण्याचे काम सतत सुरु असते. नागरिकांनी दुबार मतदार नांवनोंदणी स्वत:हून कमी करावी. मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी मृत व्यक्तीचे नांव कमी करावे. प्रत्येक तरुणाने आपले नांव मतदार यादीत नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले.यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि प्रसार माध्यमे या विषयावर चर्चासत्र झाले. यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, निवडणूक आयोगाचे जनसंपर्क अधिकारी जगदिश मोरे आणि सकाळचे निवासी संपादक अभय दिवाणजी  सहभागी झाले.सायंकाळच्या सत्रात निवडणूक आयोगाचे सचिन शेखर चन्ने यांनी मार्गदर्शन केले. चर्चासत्राचे संयोजन डॉ. रवींद्र चिंचोळकर यांनी केले.

टॅग्स :SolapurसोलापूरElectionनिवडणूक