शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
3
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
4
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
5
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
6
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
7
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
8
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
9
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
10
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
11
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
12
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
13
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
14
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
15
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
16
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
17
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
18
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
19
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
20
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव

नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या नजरा टेंभूच्या उन्हाळी आवर्तनाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:39 IST

पूर येऊनही बलवडी, वाटंबरे, सांगोला, सावे हे चार बंधारे कोरडे असल्याने शेतकऱ्यांच्या घशाला कोरड पडली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा ...

पूर येऊनही बलवडी, वाटंबरे, सांगोला, सावे हे चार बंधारे कोरडे असल्याने शेतकऱ्यांच्या घशाला कोरड पडली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आता टेंभूच्या उन्हाळी आवर्तनाकडे लागल्या आहेत.

चालू वर्षी सांगोला तालुक्यात परतीचा अतिवृष्टीचा मुसळधार पाऊस पडल्याने तालुक्यातून वाहणाऱ्या माण, कोरडा आफ्रूका नद्यांसह ओढ्यानाल्यांना पूर आला होता. या नद्यावरील बंधारे तुडुंब भरून वाहल्याने पुरामुळे बलवडी, वाटंबरे, सांगोला व सावे असे चार बंधारे फुटून बाजूचे भरावे वाहून गेले होते.

दरम्यान बंधाऱ्यात मुबलक पाणीसाठा असल्याने नदीच्या दुतर्फी असणाऱ्या शेतकऱ्यांनी ज्वारी, मका, ऊस ,गहू, हरभरा आदी पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी केली आहे. सध्या डाळिंबासह सर्वच पिके जोमात आहेत. उन्हाळ्याची चाहूल लागल्याने शेतकरी बंधाऱ्यातून पिकांना मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा करीत असल्यामुळे बंधाऱ्यातील पाणी पातळी दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. सद्यस्थितीला एक महिना पुरेल इतका पाणी साठा बंधाऱ्यात उपलब्ध आहे.

अतिवृष्टीच्या पावसात नदीवरील चार बंधारे फुटून पाणी वाहून गेले. अतिवृष्टीचा पाऊस होऊनही चार बंधाऱ्याच्या परिसरातील शेतकऱ्यांना सध्या पाणी.. पाणी.. म्हणून घशाला कोरड पडू लागली आहे. मार्च महिन्यात शेतकऱ्यांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे शेतकरी आता टेंभू योजनेतून उन्हाळी आवर्तन कधी सोडले जाणार याकडे लक्ष देऊन आहे.

फोटो ओळ- माणनदीवरील कडलास बंधाऱ्यातील पाणीसाठा कमी होऊ लागल्यामुळे शेतकऱ्यांनी दरवाजांना प्लास्टिक कागद लावून ते रोखण्याचा प्रयत्न केल्याचे छायाचित्रात दिसत आहे.

बंधाऱ्यातील उपलब्ध पाणीसाठा

दलघफूटमध्ये व टक्केवारी पुढील प्रमाणे- कोरडा नदीवरील आलेगाव - ९.१९ (२३.६९ टक्के) व मेडशिंगी - ६.५१ ( २२.६२ टक्के) माण नदीवरील खवासपूर - ८.११ (१३.९१), लोटेवाडी -३.१५ (७.९८ टक्के), नाझरे- ७.९८ (१३.९८ टक्के), अनकढाळ- ३३.२८ (१७.५० टक्के) , कमलापूर -११.८१(९.८४ टक्के), अकोला - वासूद - ७.४२(१०.३ टक्के), कडलास -१६.८५ (२३.६४ टक्के), सांगोला -१.३२(१.६७ टक्के), वाढेगाव- १३.४७ (१६.६२ टक्के), बामणी -३१.३१(३१.७५टक्के ), मांजरी -९.९८(१४.७८टक्के), मेथवडे- १६.४८(२३.२१ टक्के) तर बलवडी, सावे , चिणके ,वाटंबरे या चार बंधाऱ्यात पाणीसाठा निरंक आहे.

----