शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

पाणी वाटपापेक्षा नदी पुनरुज्जीवन महत्त्वाचे, जग्गी वासुदेव, नदी अभियानाचे स्वागत  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 04:14 IST

पाणी वाटपाची धोरणे अनेक आहेत; पण त्यापेक्षाही देशातील ७० टक्क्यांपर्यंत सुकत चाललेल्या नद्यांच्या पुनरूज्जीवनाचे धोरण महत्त्वाचे आहे. आम्ही हे धोरण तयार केले असून, येत्या २ आॅक्टोबर रोजी त्याची संहिता केंद्र सरकारला सुपूर्द करण्यात येईल.

सोलापूर : पाणी वाटपाची धोरणे अनेक आहेत; पण त्यापेक्षाही देशातील ७० टक्क्यांपर्यंत सुकत चाललेल्या नद्यांच्या पुनरूज्जीवनाचे धोरण महत्त्वाचे आहे. आम्ही हे धोरण तयार केले असून, येत्या २ आॅक्टोबर रोजी त्याची संहिता केंद्र सरकारला सुपूर्द करण्यात येईल. हे धोरण मंजूर करणे देशाच्या हिताचे आहे, अशी अपेक्षा सद्गुरू श्री जग्गी वासुदेव यांनी आज येथे व्यक्त केली.इशा फाऊंडेशनच्या नदी अभियानाचे रात्री येथे स्वागत करण्यात आले. ८५ साधक आणि कार्यकर्त्यांचा सहभाग असलेल्या या अभियानाने पुण्याकडे प्रस्थान ठेवले. पत्रकारांशी बोलताना सद्गुरू म्हणाले की, नदी अभियानाच्या माध्यमातून आम्ही जनजागरण मोहीम हाती घेतली आहे. ३ सप्टेंबर रोजी कोईमतूर येथून या अभियानाचा प्रारंभ झाला. १६ राज्यातून प्रवास करीत कन्याकुमारी ते हिमालय असे अंतर गाठून लोकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.मिस्ड कॉल द्या!इशा फाऊंडेशनच्या वतीने तयार करण्यात आलेल्या नदी पुनरूज्जीवनाच्या धोरणाला केंद्र सरकारकडून मंजुरी मिळवून देण्यासाठी नागरिकांनी ८०००९८०००९ या नंबरवर मिस्ड कॉल द्या आणि नद्या वाचविण्यासाठीच्या अभियानात सहभागी व्हावे. - सद्गुरू जग्गी वासुदेव

टॅग्स :Waterपाणी