शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

कृषी व्यवसायात वाढत्या इंधनदरामुळे भडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:40 IST

सध्याच्या काळात यांत्रिकीकरणाला गती मिळाल्यामुळे कृषी व्यवसायात पारंपरिक बैल व कष्टाच्या कामांची जागा यंत्राने घेतली. त्यामुळे साहजिकच पेट्रोल व ...

सध्याच्या काळात यांत्रिकीकरणाला गती मिळाल्यामुळे कृषी व्यवसायात पारंपरिक बैल व कष्टाच्या कामांची जागा यंत्राने घेतली. त्यामुळे साहजिकच पेट्रोल व डिझेल इंधन दरवाढीचा मोठा फटका प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या कृषी क्षेत्राला बसला आहे. शेतीमाल बाजारभावाची अनिश्चितता, अपुरा मजूर, निसर्गाचा लहरीपणा, मिळणाऱ्या उत्पन्नात अनिश्चितता अशा अनेक गोष्टींमुळे कृषी व्यावसायिक तसेच वाहनचालक-मालक सर्वच घटक हतबल झाले आहेत.

कृषिक्षेत्रावर प्रत्येक गोष्टीचा ताण

कृषिक्षेत्रावर गेल्या काही वर्षांत यांत्रिकीकरणाचा पगडा दिसत आहे. प्रामुख्याने पूर्व मशागतीत नांगरणी, पेरणी, आंतरमशागतीसह फळबाग फवारणी, मळणी या शेतीच्या प्रमुख कामांबरोबर, शेतीसाठी लागणारी खते, बी-बियाणे, अवजारे, वाहतूक, ऊस, दूध, फळांसह भाजीपाला अशा शेतीपूरक व्यावसायाशी निगडित आवश्यक साहित्याची वाहतूक करणारी यंत्रणा अशा शेतीच्या प्रत्येक गोष्टीचा भार कृषी व्यवसायावर पडत आहे.

कोट ::::::::::::::::::::::

यांत्रिकीकरणामुळे कृषिक्षेत्र झपाट्याने विकसित झाले. यांत्रिकीकरण शेतीला वरदान ठरत असतानाच मोठ्या प्रमाणात झालेली इंधन दरवाढ कृषी व्यवसायाला पुन्हा अधोगतीकडे घेऊन जात आहे. त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोनातून कृषी व्यवसाय करण्याची आवश्यकता आहे.

- दादासाहेब खरात

तालुकाध्यक्ष, भाजप किसान मोर्चा