शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुरात अडीच दिवस संचारबंदीचा सुधारित प्रस्ताव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 20:56 IST

अतुल झेंडे यांची माहिती; कालावधी कमी करण्याबाबत नगरसेवक, सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी

ठळक मुद्देआषाढीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात पोलिसांचा मोठा बंदोबस्तराज्यभरातून येणाऱ्या वारकऱ्यांना पंढरपुरात येण्यास बंदी

पंढरपूर : श्री विठ्ठलाच्या आषाढी एकादशी सोहळ्यानिमित्त पंढरपूर नगरीत भाविकांची गर्दी होऊ नये, यासाठी ३० जून दुपारी २ ते २ जुलैपर्यंत संचारबंदी कायदा लागू करण्यात येणार आहे. या यासंदर्भात सुधारित प्रस्ताव  जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवणार असल्याची माहिती अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली आहे.

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, अशा परिस्थितीत आषाढी एकादशीचा सोहळा भरल्यास राज्यभरातील वारकरी पंढरपुरात एकत्र येतील. यामुळे कोरोनाचा अधिक प्रसार होईल. त्यामुळे पंढरपूर नगरीत वारकर्‍यांची गर्दी होऊ नये. यासाठी पंढरपूर शहर व शहरालगतच्या व ८ गावांमध्ये ४ दिवस संचार बंदी कायदा लागू करण्यात यावा आहे. परंतु शहरातील नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते यांनी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, पंढरपूर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे यांच्याकडे संचारबंदीचा कालावधी कमी करण्याबाबत मागणी केली. नागरिकांची गैरसोय होते. यामुळे संचारबंदी चा कालावधी अडीच दिवसाचा करावा. असे निवेदन यावेळी दिले.

याप्रसंगी नगराध्यक्ष साधना भोसले, नगरपरिषदेच्या आरोग्य समितीचे सभापती विवेक परदेशी, नगरसेवक गुरुदास अभ्यंकर, कृष्णा वाघमारे, विक्रम शिरसट, संजय निंबाळकर, महादेव भालेराव, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, हरीश ताटे, संदीप मांडवे, अरुण कोळी, गणेश अंकुशराव, लखन माने बालाजी डोके उपस्थित होते.याबाबतचा सुधारित प्रस्ताव जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे पाठवणार असल्याचे अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर