शहरं
Join us  
Trending Stories
1
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
2
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
3
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
4
आता रेल्वे प्रवासात कितीही सामान नेता येणार नाही, लवकरच निश्चित होतोय नियम; जाणून घ्या, कोणत्या क्लाससाठी किती मर्यादा?
5
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
6
Thane: पावसाचा कहर, त्यात रस्त्यावरील पाण्यात साप; ठाणे शहरातील हा व्हिडीओ बघा
7
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
8
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
9
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
10
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल
12
उत्तराखंड विधानसभेत राडा, टेबल आपटलं, माईक तोडला, संतापलेल्या अध्यक्षा निघून गेल्या
13
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
14
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
15
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
16
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
17
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
18
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
19
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
20
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  

वृद्ध शेतकऱ्यांना पेन्शन देण्याचा ठराव

By admin | Updated: June 17, 2014 01:28 IST

कृषी सभापती : राज्यातील सर्व जि.प.नी ठराव करावेत

सोलापूर: वृद्ध शेतकऱ्यांना पेन्शन सुरू करण्याचा ठराव जिल्हा परिषद कृषी समितीच्या बैठकीत करण्यात आला. राज्यातील सर्व जिल्हा परिषदांनी ठराव करुन केंद्राकडे पाठवावा, असे आवाहन सभापती जालिंधर लांडे यांनी केले आहे.सोलापूर जि.प. कृषी समितीची बैठक सभापती लांडे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झाली. आयुष्यभर शेतीवर काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना वृद्धत्व आल्यानंतर सांभाळ करणाऱ्या मुलांचे प्रमाण कमी होत आहे. यामुळे पोटाला अन्न मिळणे कठीण होत आहे. असे असल्याने वृद्ध शेतकऱ्यांना पेन्शन सुरू करावी, असा ठराव सभापती लांडे यांनी मांडला. हा ठराव सर्वच सदस्यांनी एकमताने मंजूर केला. अशाच पद्धतीचे ठराव प्रत्येक जि.प. कृषी समितीने करावे व केंद्र सरकारकडे पाठवावेत, असे आवाहन सभापती लांडे यांनी केले आहे. मागासवर्गीय शेतकऱ्यांना विशेष घटक योजनेतून विहिरीसाठी मिळालेल्या ९ कोटी ३१ लाख रुपये खर्चाचे नियोजन करण्याच्या सूचना सभापतींनी दिल्या. परंतु विहिरीसाठी अवघे एक लाखाचे अनुदान मिळत असून ते तीन लाखांचे करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.---------------------------सामूहिक शेततळ्याचे निकष बदलासामूहिक शेततळ्यासाठी किमान २० हेक्टर फळबाग, (१०० बाय १०० बाय ३ मीटर) असलेल्या शेतकऱ्यांना २० लाखांचे अनुदान देण्याचा शासनाचा आदेश आहे. किमान ५ हेक्टरपासून व लहान साईजचे शेततळे शिवाय अन्य पिकांसाठीही शेततळे मंजूर करावे, असा ठराव कृषी समितीच्या बैठकीत झाला. ---------------------------औषध खरेदी व दुरुस्ती कामात पारदर्शकतापशुसंवर्धन समितीच्या बैठकीत जनावरांसाठी खरेदी करण्यात येणाऱ्या औषध खरेदीची ठेकेदाराकडून वेळेत देण्यासाठी बाँडवर हमी घेण्यात येणार आहे. वेळेत औषधे पुरवली नाहीत तर दंड केला जाणार आहे. दवाखाने दुरुस्तीच्या कामासाठीच्या प्रस्तावावरही पाहणी करुन गरज असेल तरच मंजुरी देण्यात येणार आहे. उगीच अनुदान खर्ची टाकण्यासाठी दुरुस्तीच्या कामांना मंजुरी दिली जाणार नाही, असे सभापती जालिंधर लांडे यांनी सांगितले.------------------------नोकरदारांना सेवानिवृत्त होईपर्यंत पगार असतो व सेवानिवृत्त झाल्यानंतर पेन्शन मिळते. त्यामुळे किमान पती-पत्नी दोघांच्या उपजीविकेची अडचण राहत नाही. परंतु शेतकऱ्यांची अवस्था फारच कठीण आहे. अगोदरच शेतकरी कुटुंब अडचणीत अन् वृद्ध शेतकऱ्यांची फारच अवघड. त्यामुळे पेन्शन सुरू करावी. - जालिंधर लांडेजि. प. कृषी समिती सभापती