शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

वृद्ध शेतकऱ्यांना पेन्शन देण्याचा ठराव

By admin | Updated: June 17, 2014 01:28 IST

कृषी सभापती : राज्यातील सर्व जि.प.नी ठराव करावेत

सोलापूर: वृद्ध शेतकऱ्यांना पेन्शन सुरू करण्याचा ठराव जिल्हा परिषद कृषी समितीच्या बैठकीत करण्यात आला. राज्यातील सर्व जिल्हा परिषदांनी ठराव करुन केंद्राकडे पाठवावा, असे आवाहन सभापती जालिंधर लांडे यांनी केले आहे.सोलापूर जि.प. कृषी समितीची बैठक सभापती लांडे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झाली. आयुष्यभर शेतीवर काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना वृद्धत्व आल्यानंतर सांभाळ करणाऱ्या मुलांचे प्रमाण कमी होत आहे. यामुळे पोटाला अन्न मिळणे कठीण होत आहे. असे असल्याने वृद्ध शेतकऱ्यांना पेन्शन सुरू करावी, असा ठराव सभापती लांडे यांनी मांडला. हा ठराव सर्वच सदस्यांनी एकमताने मंजूर केला. अशाच पद्धतीचे ठराव प्रत्येक जि.प. कृषी समितीने करावे व केंद्र सरकारकडे पाठवावेत, असे आवाहन सभापती लांडे यांनी केले आहे. मागासवर्गीय शेतकऱ्यांना विशेष घटक योजनेतून विहिरीसाठी मिळालेल्या ९ कोटी ३१ लाख रुपये खर्चाचे नियोजन करण्याच्या सूचना सभापतींनी दिल्या. परंतु विहिरीसाठी अवघे एक लाखाचे अनुदान मिळत असून ते तीन लाखांचे करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.---------------------------सामूहिक शेततळ्याचे निकष बदलासामूहिक शेततळ्यासाठी किमान २० हेक्टर फळबाग, (१०० बाय १०० बाय ३ मीटर) असलेल्या शेतकऱ्यांना २० लाखांचे अनुदान देण्याचा शासनाचा आदेश आहे. किमान ५ हेक्टरपासून व लहान साईजचे शेततळे शिवाय अन्य पिकांसाठीही शेततळे मंजूर करावे, असा ठराव कृषी समितीच्या बैठकीत झाला. ---------------------------औषध खरेदी व दुरुस्ती कामात पारदर्शकतापशुसंवर्धन समितीच्या बैठकीत जनावरांसाठी खरेदी करण्यात येणाऱ्या औषध खरेदीची ठेकेदाराकडून वेळेत देण्यासाठी बाँडवर हमी घेण्यात येणार आहे. वेळेत औषधे पुरवली नाहीत तर दंड केला जाणार आहे. दवाखाने दुरुस्तीच्या कामासाठीच्या प्रस्तावावरही पाहणी करुन गरज असेल तरच मंजुरी देण्यात येणार आहे. उगीच अनुदान खर्ची टाकण्यासाठी दुरुस्तीच्या कामांना मंजुरी दिली जाणार नाही, असे सभापती जालिंधर लांडे यांनी सांगितले.------------------------नोकरदारांना सेवानिवृत्त होईपर्यंत पगार असतो व सेवानिवृत्त झाल्यानंतर पेन्शन मिळते. त्यामुळे किमान पती-पत्नी दोघांच्या उपजीविकेची अडचण राहत नाही. परंतु शेतकऱ्यांची अवस्था फारच कठीण आहे. अगोदरच शेतकरी कुटुंब अडचणीत अन् वृद्ध शेतकऱ्यांची फारच अवघड. त्यामुळे पेन्शन सुरू करावी. - जालिंधर लांडेजि. प. कृषी समिती सभापती