शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

‘विठ्ठल’च्या चेअरमन पदावरुन भालके यांना हटवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:23 IST

पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा पश्चिम महाराष्ट्रात नावलौकिक होता. १९९७ साली कारखान्यावर सत्तांतर झाले. तेव्हापासूनच कारखान्याची ...

पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा पश्चिम महाराष्ट्रात नावलौकिक होता. १९९७ साली कारखान्यावर सत्तांतर झाले. तेव्हापासूनच कारखान्याची आर्थिक शिस्त बिघडली. अलीकडच्या दोन- तीन वर्षात तर कारखाना आर्थिक डबघाईला आला. मागील दोन वर्षापूर्वी कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदा कारखाना बंद ठेवण्याची नामुष्की संचालक मंडळावर ओढवली.

आमदार भारत भालकेंच्या निधनानंतर त्यांचे पुत्र भगीरथ भालकेंच्या हाती कारखान्याचा कारभार दिला आहे. गेल्या पाच ते सहा महिन्यात त्यांच्याकडूनही कारखान्याच्या कारभारात प्रगती झाली नाही. मागील दोन वर्षापूर्वी गाळपास आलेल्या उसाची एफआरपी आणि कामगारांचा २१ महिन्यांचा पगार थकीत आहे. त्यातच ऊस वाहतूक ठेकेदारांचेही देणे थकीत राहिल्याने भालके यांच्याविषयी शेतकरी, कामगार आणि वाहतूक ठेकेदारांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

......

भालके यांनी दिली होती डेडलाईन

२०१८-१९ व २०१९-२० या दोन गाळप हंगामातील शेतकऱ्यांचे सुमारे ३० कोटी ५० लाख, कामगारांचे १६ लाख व ऊस वाहतूक ठेकेदारांचे ७ कोटी असे मिळून सुमारे ५५ ते ६० कोटी रुपयांची थकीत देणी आहेत. थकीत रक्कम देण्यासंदर्भात संचालक मंडळाची २३ ऑगस्ट रोजी बैठक झाली होती. या बैठकीमध्ये भालके यांनी आठ दिवसात संपूर्ण थकीत रक्कम देतो असे आश्वासन दिले होते. आठ दिवसांची मुदत संपून गेली आहे. त्यानंतरही त्यांनी कोणतीही तरतूद केली नाही. त्यामुळे भगीरथ भालके यांनी कारखान्याच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन मार्ग मोकळा करावा, असे युवराज पाटील यांनी सांगितले.