शहरं
Join us  
Trending Stories
1
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
2
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
3
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
5
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
6
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
7
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
8
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
9
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
10
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
11
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
12
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
13
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
14
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
15
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
16
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
17
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
18
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
19
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
20
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश

सोलापूर जिल्ह्यातील १ हजार जमीन विषयक प्रकरणे काढली निकाली : रामचंद्र शिंदे

By appasaheb.patil | Updated: November 30, 2018 17:20 IST

जिल्हा प्रशासनाकडून गतिमान कामकाज; अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांच्या कडून प्रलंबित प्रकरणे निकाली

ठळक मुद्देआॅनलाइन लोकमत साठी घेतलेल्या खास मुलाखतीत अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांच्याशी साधलेला संवाद.एक वर्षात एक हजार दहा जमीनविषयक प्रकरणांवर निकाल दिला असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. 

सोलापूर : एका वर्षात एक हजार जमीन विषयक प्रकरणे निकालात काढण्याची किमया सोलापूर जिल्हा प्रशासनाने साध्य केली आहे. गेल्या एक वर्षात एक हजार दहा जमीनविषयक प्रकरणांवर निकाल दिला असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. आॅनलाइन लोकमत साठी घेतलेल्या खास मुलाखतीत अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांच्याशी साधलेला संवाद.

प्रश्न : आपण कधी रूजू झालात त्यानंतरच्या आपली कामगिरीबाबत काय सांगाल ?उत्तर : मी २२ नोव्हेंबर २०१७ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे अतिरिक्त जिल्हाधिकारीपदी रुजू झालो़  २२ नोव्हेंबर २०१७ ते २२ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत १०१० केसेस निकाली काढल्या़ यात वारस हक्क, पाण्याच्या पाटाबातचे वाद, मृत्यूपत्राबाबतचे वाद, खरेदी विक्री व्यवहार बाबतचे वाद, शेतजमीनवरील अतिक्रमणाबाबतचे वाद आदी बाबतीतील केसेसचा समावेश होता.

प्रश्न : अप्पर जिल्हाधिकारी यांचे अधिकार काय काय आहेत ?उत्तर : महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार  प्रशासनातील तहसिलदार, उपविभागीय अधिकारी यांना जमीनविषयक वादावर निकाल देण्याचे अधिकार असतात. या कामकाजास अर्धन्यायिक कामकाज असे म्हटले जाते. यात अतिरिक्त जिल्हाधिकारी द्वितीय अपिलीय अधिकारी आहेत. तहसिलदार यांनी दिलेल्या निर्णयावर उपविभागीय अधिकारी यांच्याकडे प्रथम अपिल दाखल केले जाते. उपविभागीय अधिकाºयांच्या निर्णयाविरोधात अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्याकडे द्वितीय अपिल दाखल केले जाते. अशा विविध प्रकरणात मी एका वर्षात  २०१४ पासून प्रलंबित असलेल्या १०१० प्रकरणांवर प्रत्येक महिन्यात सरासरी ८५ प्रकरणे निकाली काढली़ राज्य शासनाच्या उद्दिष्टानुसार दरमहा चाळीस प्रकरणे निकाली निघणे अपेक्षित आहे. मात्र मी त्यांच्या दुप्पट प्रकरणे निकाली काढली आहेत.

प्रश्न : नागरिकांच्या सोयीसाठी काय केले ?उत्तर : जमीनविषयक अपिलांच्या सुनावणीसाठी आठवड्यातील चार दिवस राखून ठेवले होते़ त्यापैकी मंगळवार आणि शुक्रवारी सोलापुरात तर बुधवारी माढा येथील तहसिल कार्यालय आणि गुरुवारी पंढरपूर येथील उपविभागीय कार्यालयात सुनावणी  शिबीर घेतली गेली. जेणेकरुन नागरिकांना सोयीचे झाले. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम २४७,२५७ आणि २५८ अनुसार अपिले दाखल केली जातात. मी रुजू होण्यापुर्वी १२३३ केसेस प्रलंबित होत्या. त्यानंतर ९३४ केसेस दाखल झाल्या. त्यापैकी १०१० निकाली काढण्यात आल्या. 

प्रश्न : यापुढे तुमचे कामकाज कसे राहील ?उत्तर : जमीनीच्या प्रकरणे तत्पर निकाली काढली जावीत, अशा विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी डॉ . राजेंद्र भोसले यांच्या सूचना आहेत. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील प्रलंबित प्रकरणांचा लवकरात लवकर निपटारा व्हावा यासाठी कार्यवाही केली. यामुळे एका वर्षात १०१० प्रकरणे निकालात काढणे शक्य झाले. यापुढे अशाच गतीने काम करुन प्रलंबित प्रकरणी निकाल देण्याचा प्रयत्न केला जाईल.

 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय