शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

आपल्याच लक्षवेधीचा महसूल मंत्र्यांना पडला विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 14:12 IST

चारा घोटाळ्यातील वरिष्ठ अधिकारी मोकाट : प्रफुल्ल कदम यांच्याकडून चौकशीची मागणी

ठळक मुद्देचारा घोटाळ्यातील कारवाईचा गुंता अद्यापही सुटलेला नाहीगैरप्रकारात गुंतलेले अनेक अधिकारी अद्यापही मोकळेचछावणी चालकांवर १२ कोटी रुपयांची दंडात्मक कारवाई

सोलापूर : २०१२-१३ या महसुली वर्षात राज्यात गाजलेल्या चारा घोटाळ्यातील कारवाईचा गुंता अद्यापही सुटलेला नाही. छावणी चालकांवर १२ कोटी रुपयांची दंडात्मक कारवाई झाली असली तरी या गैरप्रकारात गुंतलेले अनेक अधिकारी अद्यापही मोकळेच आहेत. तेव्हा विरोधी बाकावर असताना लक्षवेधी मांडून सरकारला जाब विचारणारे चंद्रकांत पाटील आज महसूलमंत्री आहेत. मात्र त्यांनाही आपल्या लक्षवेधीचा विसर पडला की काय, असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल कदम यांनी उपस्थित केला आहे. 

किसान आर्मी वॉटर आर्मी संघटनेचे संस्थापक प्रफुल कदम यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे पत्रव्यवहार केला असून, या प्रकरणी झालेल्या प्रशासकीय चौकशीचा आधार घेऊन तत्कालीन विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, तत्कालीन जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम, उपविभागीय अधिकारी बाबासाहेब बेलदार, तहसीलदार नागेश पाटील आदी बड्या अधिकाºयांना आणि कर्मचाºयांना दोषी ठरविले जावे आणि गुन्हे दाखल व्हावे, अशी मागणी केली आहे. २०१३ पासून त्यांचा या मागणीसाठी पाठपुरावा सुरू आहे.

तत्कालिन महसूलमंत्र्यांकडे तक्रारी करण्यासोबतच नागपुरातील हिवाळी अधिवेशनात उपोषणही केले होते. या आंदोलनाची दखल घेऊन १४ नोव्हेंबर २०१७ रोजी सरकारने छावणीचालकांविरूद्ध गुन्हे दाखल करण्याचे आणि त्यांना काळ्या यादीत टाकण्याचे आदेश काढले. त्यानुसार सांगोला पोलिसांनी छावणी चालकांविरूद्ध कलम १८८ नुसार गुन्हे दाखल केले.

प्रत्यक्षात महसूल विभागातील अधिकाºयांच्या देखरेखीखालीच छावणीचालकांची देयके निघाली. तक्रारीनंतर ११ कोटी ३६ लाख पाच हजार ७८ रुपयांची दंडात्मक कारवाई छावणीचालकांवर करण्यात आली. याचा अर्थ यात गैरप्रकार घडला हे स्पष्ट आहे, असे मत कदम यांनी व्यक्त केले आहे.

केवळ अधिकाºयांना वाचविण्यासाठी छावणी चालकांवर गुन्हे दाखल झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दंडात्मक कारवाईची रक्कम छावणी देयकातून वजा न करता राखीव निधीतून वजा करण्यात आली. यावरही त्यांचा आक्षेप आहे. दंडात्मक कारवाईदेखील विलंबाने म्हणजे आदेशाच्या एक वर्षानंतर झाली. अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी निवेदन देऊन या प्रकरणाची आठवण करुन देऊनही दखल घेतली जात नाही. 

... तर मंत्रालयात आंदोलन- या गैरव्यवहारात गुंतलेल्या सर्व अधिकाºयांवर गुन्हे दाखल करण्यात यावे आणि कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रफुल्ल कदम यांनी केली आहे. या मागणीची दखल न घेतल्यास मंत्रालयात आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूरchandrakant patilचंद्रकांत पाटीलSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय