शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
3
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
4
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
5
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
6
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
7
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
8
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
9
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
10
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
11
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
12
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
13
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
14
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
15
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
16
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
17
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
18
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

‘लिंगायत समाजाच्या धर्मगुरुंनी राजकारणात सक्रीय होऊ नये’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 05:08 IST

लिंगायत धर्मगुरुंनी राजकारणात सक्रीय होऊ नये. सक्रीय झाल्यास त्यांना लिंगायत समाजातील रोषाला सामोरे जावे लागेल, यासह सहा ठराव येथील लिंगायत धर्म विचार मंथन परिषदेत करण्यात आले. परिषदेचा रविवारी समारोप झाला.

सोलापूर : लिंगायत धर्मगुरुंनी राजकारणात सक्रीय होऊ नये. सक्रीय झाल्यास त्यांना लिंगायत समाजातील रोषाला सामोरे जावे लागेल, यासह सहा ठराव येथील लिंगायत धर्म विचार मंथन परिषदेत करण्यात आले. परिषदेचा रविवारी समारोप झाला.व्यासपीठावर बंगळुरुच्या बसव समितीचे अध्यक्ष अरविंद जत्ती, अ. भा. लिंगायत समन्वय समितीचे समन्वयक अ‍ॅड. अविनाश भोसीकर, पुण्याचे लिंगायत धर्म अभ्यासक शशिकांत पट्टण, परिषदेचे संयोजक विजयकुमार हत्तुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्र सुरु करावे, लिंगायत आरक्षण, महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त राष्ट्रीय सुटी जाहीर करणे, मंगळवेढा येथीलबसवेश्वर स्मारकाच्या कामास गती मिळावी आदी ठरावही करण्यात आले.महात्मा बसवेश्वरांच्या वचनात खूप मोठी शक्ती आहे. देवदेवतांच्या मंदिरात जाण्याची गरज नाही. आपल्या गळ्यातील लिंग हाच आपला देव. आपण कपाळावर विभुती लावतो म्हणजे त्या देवाला लावतो. लिंगायत बांधवांनी गळ्यात लिंगधारणा करावी, असे आवाहन करण्यात आले. ९ आॅगस्टला मुंबईत लिंगायत बांधवांचा महामोर्चा काढण्यात येणार असल्याचे अविनाश भोसीकर यांनी सांगितले.