शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना दिलासा; बाळे रेल्वेस्थानकावर होणार कार्गो टर्मिनल

By appasaheb.patil | Updated: December 31, 2020 16:41 IST

किसान रेल्वेला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादानंतर रेल्वेचे मोठे पाऊल: पीपीपी मॉडेलअंतर्गत होणार उभारणी

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : नववर्षाच्या पूर्वसंध्येला शहर व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रेल्वे मंत्रालयाकडून नवीन वर्षाची जणू भेट मिळाली आहे. हरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या बाळे रेल्वेस्थानक परिसरात आता शेतकऱ्यांसाठी कार्गो टर्मिनल होणार असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.

भारतीय रेल्वे मंत्रालयाने देशातील शेतकऱ्यांचा शेतमाल कमी वेळेत परराज्यांतील बाजारपेठेत पोहोचविण्यासाठी किसान रेल्वे सुरू केली. या किसान रेल्वेला सोलापूर जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर सोलापुरात कार्गो टर्मिनल सुरू होणार याबाबत मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील अधिकाऱ्यांना कार्गो टर्मिनलसाठी स्थानक निश्चित करण्याची विचारणा झाली होती, त्यानुसार सोलापूरच्या अधिकाऱ्यांनी बाळे रेल्वेस्थानक परिसरात कार्गो टर्मिनल करण्याचा प्रस्ताव पाठविला होता, त्यानुसार भारतीय रेल्वे मंत्रालयाने बाळे रेल्वेस्थानकावर कार्गो टर्मिनल करण्यास हिरवा कंदील दाखविल्याचे सांगण्यात आले. सोलापूर विभागातून केळी, द्राक्षे, डाळिंब, ढोबळी मिरची, सफरचंद, पेरू, बोरं, सीताफळ, पपई, लिंबूची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते, आगामी काळात शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त माल कार्गो टर्मिनलपासून मार्गस्थ व्हावा या उद्देशाने या टर्मिनलची निर्मिती करण्यात येणार आहे.

कोल्ड स्टोअरेजची सोय

मागील काही महिन्यांपासून रेल्वे बोर्डाकडून कार्गो टर्मिनलसाठी सोलापूर विभागातील विविध स्थानकाची चाचपणी करण्यात आली होती, कोणत्या स्थानकावरून सर्वाधिक माल लोड होतो हे पाहण्यात आले. बाळे मालधक्क्याशेजारी कोल्ड स्टोअरेजची सोय असलेले कार्गो टर्मिनल बांधले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी परवा झालेल्या १००व्या किसान रेल्वेच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्गो टर्मिनल व कोल्ड स्टोअरेजबाबत भाषणात उल्लेख केला होता.

 

बाळे रेल्वेस्थानक परिसरात असलेल्या मालधक्क्यांचा पीपीई मॉडेलअंतर्गत विकास करण्यात येणार आहे. त्याबाबतची टेंडर प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. बाळे रेल्वेस्थानक परिसरात कार्गो टर्मिनलबाबत अद्याप विचार नाही.

- प्रदीप हिरडे,

वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक, सोलापूर रेल्वे विभाग

 

कार्गो टर्मिनल झाल्यास सोलापूर शहरासोबत जिल्ह्यातील बराच शेतमाल परराज्यात विक्रीस जाईल, त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळेल, शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल. रेल्वेच्या माध्यमातून कमी वेळेत शेतकऱ्यांचा शेतमाल किसान रेल्वेमुळे परराज्यांत कमी भाड्यात जात असल्यामुळे चांगला दिलासा मिळत आहे.

- राजेंद्र कांबळे,

सोलापूर रेल्वेप्रवासी संघटना, सोलापूर

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेcentral railwayमध्य रेल्वेagricultureशेतीAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीMarketबाजार