शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

शेतकऱ्यांना दिलासा; बाळे रेल्वेस्थानकावर होणार कार्गो टर्मिनल

By appasaheb.patil | Updated: December 31, 2020 16:41 IST

किसान रेल्वेला मिळालेल्या चांगल्या प्रतिसादानंतर रेल्वेचे मोठे पाऊल: पीपीपी मॉडेलअंतर्गत होणार उभारणी

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : नववर्षाच्या पूर्वसंध्येला शहर व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रेल्वे मंत्रालयाकडून नवीन वर्षाची जणू भेट मिळाली आहे. हरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या बाळे रेल्वेस्थानक परिसरात आता शेतकऱ्यांसाठी कार्गो टर्मिनल होणार असल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.

भारतीय रेल्वे मंत्रालयाने देशातील शेतकऱ्यांचा शेतमाल कमी वेळेत परराज्यांतील बाजारपेठेत पोहोचविण्यासाठी किसान रेल्वे सुरू केली. या किसान रेल्वेला सोलापूर जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर सोलापुरात कार्गो टर्मिनल सुरू होणार याबाबत मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील अधिकाऱ्यांना कार्गो टर्मिनलसाठी स्थानक निश्चित करण्याची विचारणा झाली होती, त्यानुसार सोलापूरच्या अधिकाऱ्यांनी बाळे रेल्वेस्थानक परिसरात कार्गो टर्मिनल करण्याचा प्रस्ताव पाठविला होता, त्यानुसार भारतीय रेल्वे मंत्रालयाने बाळे रेल्वेस्थानकावर कार्गो टर्मिनल करण्यास हिरवा कंदील दाखविल्याचे सांगण्यात आले. सोलापूर विभागातून केळी, द्राक्षे, डाळिंब, ढोबळी मिरची, सफरचंद, पेरू, बोरं, सीताफळ, पपई, लिंबूची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते, आगामी काळात शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त माल कार्गो टर्मिनलपासून मार्गस्थ व्हावा या उद्देशाने या टर्मिनलची निर्मिती करण्यात येणार आहे.

कोल्ड स्टोअरेजची सोय

मागील काही महिन्यांपासून रेल्वे बोर्डाकडून कार्गो टर्मिनलसाठी सोलापूर विभागातील विविध स्थानकाची चाचपणी करण्यात आली होती, कोणत्या स्थानकावरून सर्वाधिक माल लोड होतो हे पाहण्यात आले. बाळे मालधक्क्याशेजारी कोल्ड स्टोअरेजची सोय असलेले कार्गो टर्मिनल बांधले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी परवा झालेल्या १००व्या किसान रेल्वेच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्गो टर्मिनल व कोल्ड स्टोअरेजबाबत भाषणात उल्लेख केला होता.

 

बाळे रेल्वेस्थानक परिसरात असलेल्या मालधक्क्यांचा पीपीई मॉडेलअंतर्गत विकास करण्यात येणार आहे. त्याबाबतची टेंडर प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. बाळे रेल्वेस्थानक परिसरात कार्गो टर्मिनलबाबत अद्याप विचार नाही.

- प्रदीप हिरडे,

वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक, सोलापूर रेल्वे विभाग

 

कार्गो टर्मिनल झाल्यास सोलापूर शहरासोबत जिल्ह्यातील बराच शेतमाल परराज्यात विक्रीस जाईल, त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळेल, शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल. रेल्वेच्या माध्यमातून कमी वेळेत शेतकऱ्यांचा शेतमाल किसान रेल्वेमुळे परराज्यांत कमी भाड्यात जात असल्यामुळे चांगला दिलासा मिळत आहे.

- राजेंद्र कांबळे,

सोलापूर रेल्वेप्रवासी संघटना, सोलापूर

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेcentral railwayमध्य रेल्वेagricultureशेतीAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीMarketबाजार