शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

ग्रामीण इमारतींच्या स्थापत्यावर शहरांचं प्रतिबिंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:23 IST

माळशिरस तालुक्यातील अकलूज, माळशिरस, नातेपुते, वेळापूर या प्रमुख गावाबरोबर छोट्या गावातही सोईसुविधा व आकर्षक आधुनिक स्थापत्य शैलीतील इमारती ...

माळशिरस तालुक्यातील अकलूज, माळशिरस, नातेपुते, वेळापूर या प्रमुख गावाबरोबर छोट्या गावातही सोईसुविधा व आकर्षक आधुनिक स्थापत्य शैलीतील इमारती शहरांची आठवण करून देत आहेत.

मूलभूत गरजांपैकी एक गरज म्हणजे निवारा. मात्र गरजेनुसार झालेले बदल व विविध कालखंडातील स्थापत्याचा प्रभाव त्या परिसरातील बांधकामांच्या जडणघडणीतून समोर येतो. आदिमानवाच्या गुहा, राजवाडा, महाल, बंगला, फार्म हाऊस, रो हाऊस, अलिशान इमारती असा प्रवास आढळतो.

जुन्या व नव्या स्थापत्याची सांगड,

बांधकामाची स्टाईल

भारतात स्थापत्यकलेचा उगम हडप्पा काळापासून असल्याचे मानले जाते. मात्र आपल्याकडे शहर व गावांमधील बांधकाम क्षेत्रातील दरी झपाट्याने कमी होताना दिसत आहे. ग्रामीण भागात औद्योगिक व्यापारी व राहण्यासाठी होत असलेल्या नवीन बांधकामातून आधुनिक स्थापत्य शैलीचा प्रभाव दर्शविण्याचा प्रयत्न आवर्जून केलेला दिसतो.

लोखंड, खडी, वाळू, सिमेंट, विटा, टाईल्स यांच्या घनतेनुसार वजन गृहीत धरून वेगवेगळ्या इमारतींचा आराखडा तयार केला जातो. यामध्ये आधुनिक पद्धतीने विविध प्रकारच्या डिझाइन्स असणाऱ्या इमारतीमुळे बांधकामाची विशिष्ट स्टाईल पाहायला मिळत आहे.

वास्तुशास्त्राचा प्रभाव

ग्रामीण भागातील बांधकामात बंगलो पद्धती वेगाने विकसित होत आहे. या वास्तूरचनेवर शहरी व पाश्चात्त्य देशातील वास्तुशैलीबरोबरच वास्तुशास्त्राचा प्रभाव दिसतो. यामध्ये आतील फर्निचर, काचा, खिडक्या, छप्पराचे आकार व वेगवेगळ्या डिझाइन्स दिसतात, तर बहुतांश इमारतींना वास्तुशास्त्राचा आधार घेतलेला दृष्टीस पडतो.

फार्महाऊस पद्धतीत होतेय झपाट्याने वाढ

माळशिरस तालुक्याच्या ग्रामीण भागातून व्यापार अथवा नोकरी-व्यवसायाच्या दृष्टीने शहरात वास्तव्यास असणाऱ्या अनेकांनी यापूर्वी स्वतःच्या शेतात असणाऱ्या गोठ्याच्या आसपास टुमदार जांभ्या दगड, विशिष्ट प्रकारची वीट व रंगीबेरंगी पत्रा अथवा कॉक्रीटच्या मदतीने बनवलेले घर त्यामध्ये असणाऱ्या अत्याधुनिक सुविधा व आसपासच्या परिसरात वैविध्यपूर्ण झाडांच्या लागवडीमुळे ग्रामीण भागात फार्महाउस पद्धती झपाट्याने पुढे येत आहेत.