शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

रिअ‍ॅलिटी Check; नागरिकांना हेल्मेटची तर पोलिसांना मास्कची अ‍ॅलर्जी...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 12:11 IST

दोन्ही नियम धाब्यावर; कोरोना संसर्गाची चिंता नाही; नियमांकडे पूर्णपणे दुर्लक्ष

ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासन कसोशीने प्रयत्नदुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोमवारी सायंकाळी जारी केलेगेल्या काही दिवसांपासून दुचाकीवर डबलसीटला परवानगी देण्यात आली

सोलापूर : संचारबंदी उठल्यानंतर शहरात पुन्हा रस्त्यावर वाहनांची संख्या वाढली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक असलेले मास्क काही लोक घालतात तर काही लोक तसेच फिरत आहेत. क्वचित काही लोकांच्या डोक्यावर हेल्मेट दिसत आहे. त्यामुळे ना मास्क.. ना हेल्मेट.. सोलापुरात दुचाकीस्वार बिनधास्त असं चित्र पहावयास मिळत आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दि. २३ मार्च रोजी सोलापुरात संचारबंदी लागू करण्यात आली होती. अडीच ते तीन महिन्यांच्या कालावधीनंतर हळूहळू संचारबंदी उठविण्यात आली. दि. १६ ते २६ जुलैदरम्यान पुन्हा कडकडीत संचारबंदी लागू करण्यात आली होती. दि. २७ जुलैपासून वाहनांना परवानगी देण्यात आली. 

दुचाकी वाहनावर फक्त एकाच व्यक्तीला प्रवास करता येत होता. गेल्या काही दिवसांपासून दुचाकीवर डबलसीटला परवानगी देण्यात आली आहे, मात्र दोघांनीही मास्क आणि हेल्मेट घातले पाहिजे, अशी अट घालण्यात आली आहे. संचारबंदी उठली म्हणून आता सोलापूरकर घराबाहेर बिनधास्तपणे पडत आहेत. मोटरसायकलवरून फिरणारी बरीच मंडळी मास्क न घालता बिनधास्तपणे फिरत असल्याचे दिसून आले. 

हेल्मेट असेल तर मास्कची सक्ती का?पोलीस आयुक्तालयाच्या वतीने काढलेल्या आदेशाप्रमाणे काही दुचाकीस्वार प्रामाणिकपणे हेल्मेट परिधान करतात, तोंडाला मास्क लावतात मात्र यामुळे त्रास होतो. श्वास घेण्यासाठी त्रास होतो, सतत मास्क व हेल्मेट वापरल्यामुळे बांधल्यासारखं होतं. मोटरसायकल चालवताना अवघडल्यासारखं होतं. प्रशासनाने तूर्तास कोरोनाचे संकट टळेपर्यंत हेल्मेटची सक्ती करू नये. हेल्मेट सक्ती असेल तर त्याला मास्कची सक्ती करू नये, अशा प्रतिक्रिया ‘लोकमत’शी बोलताना दिल्या.

मास्कमुळे दम लागतो...हेल्मेट आणि मास्क या दोन्ही गोष्टी तोंडाला आणि डोक्याला लावून घराबाहेर पडायचं म्हटलं तर खूप जीवावर येतं. मोटरसायकल चालवताना चौफेर नजर राहत नाही. मास्कमुळे दम लागल्यासारखे होते, असे मत रेल्वे कर्मचारी समाधान कोळी यांनी व्यक्त केले.

हेल्मेट, मास्क न घातल्यास आता कारवाईसोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासन कसोशीने प्रयत्न करीत असताना नागरिकांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. राखी पौर्णिमेनिमित्त दुचाकीस्वार विनाहेल्मेट मोठ्या संख्येने रस्त्यावर आल्याचे दिसून आल्यावर आता अशा दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोमवारी सायंकाळी जारी केले आहेत. नागरिकांनी सार्वजनिक स्थळी, कामाच्या ठिकाणी आणि प्रवासामध्ये सुरक्षित अंतर ठेवावे, चेहºयावर मास्क/रुमाल वापरणे बंधनकारक आहे. स्वच्छतेचे पालन करणे आवश्यक असून नाक, डोळे व तोंड यांना स्पर्श होणार नाही, याची काळजी घ्यावी. अत्यावश्यक परिस्थितीमध्ये दुचाकीवर दोघे हेल्मेट व मास्कसह, तीनचाकी वाहनात चालक व इतर दोन, चारचाकी वाहनात चालक व इतर तिघे आणि रिक्षात चालक व इतर तिघांना परवानगी असेल, असा आदेश काढण्यात आला आहे.

प्रवाशांच्या संरक्षणासाठी हेल्मेटची सक्ती करण्यात आली आहे. मोटरसायकल चालवणाºया व्यक्तीने हेल्मेट परिधान केलेच पाहिजे. हेल्मेटने पूर्ण तोंड झाकलं जात असेल तर त्याला मास्क लावण्याची गरज नाही. पाठीमागे बसणाºया व्यक्तीने मास्क लावावा. विनाहेल्मेट फिरणाºयांवर कारवाई होणारच. -बाळासाहेब भालचिम,पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसcorona virusकोरोना वायरस बातम्या