शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

कोरोनाकाळातही तत्परता; पीडित महिला, बालकांना मनोधैर्य योजनेतून ५२ लाखांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 13:27 IST

ॲसिड हल्ल्यात बळी पडलेल्या महिलांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आर्थिक साहाय्य दिले जाते.

बाळकृष्ण दोड्डीसोलापूर : अत्याचार, ॲसिड हल्ल्यातील पीडितांना मनोधैर्य योजनेतून दोन वर्षांत ५२ लाख ६० हजारांचा मदत निधी मंजूर झाला आहे. दोन वर्षांत १४९ पीडित प्रकरणे जिल्हा विधि सेवा प्राधिकरणासमोर आली. यांतील बहुतांश पीडितांना तत्काळ मदत निधी दिला गेला. त्यामुळे पीडितांचे मनोधैर्य वाढले. परिस्थितीचा सामना करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या त्यांना बळ मिळाले.

ॲसिड हल्ल्यात बळी पडलेल्या महिलांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आर्थिक साहाय्य दिले जाते. ११ फेब्रुवारी २०११ पासून मदतनिधी मिळतो. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने बलात्कार पीडित, बालकांवरील लैंगिक अत्याचार तसेच ॲसिड हल्ल्यात बळी पडलेल्या पीडितांच्या पुनर्वसनासाठी २ ऑक्टोबर २०१३ पासून मनोधैर्य योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पीडितांना १० लाख रुपयांपर्यंत मदतनिधी देण्याची तरतूद आहे. १ ऑगस्ट २०१७ रोजी या योजनेत सुधारणा करण्यात आली. सुधारित नवीन मनोधैर्य योजना याच नावाने मदतनिधी मोहीम सुरू राहिली.

कोरोनाकाळातही तत्परतासन २०२० मध्ये २० जानेवारी रोजी समितीची पहिली बैठक झाली. यावेळी बैठकीसमोर ११ प्रकरणे होती. मार्चपासून कोरोनाचे संकट भीषण होत राहिले. या काळात जिल्हा मनोधैर्य समितीकडून बैठका झाल्या नाहीत. लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता आल्यानंतर समितीकडून ८ ऑक्टोबर आणि ४ डिसेंबरदरम्यान दोन बैठका झाल्या. या बैठकांमध्ये एकूण ३६ प्रकरणांवर सुनावणी झाली. कोरोना काळात तब्बल ३६ लाख १० हजार रुपयांची मदत निधी मंजूर झाला.

अत्याचार पीडित महिला व बालकांनी खचून न जाता जिल्हा विधि सेवा प्राधिकरणासमोर यावे. या योजनेचा लाभ घ्यावा. तसेच आवश्यक कागदपत्रे पोलिसांमार्फत किंवा स्वतः सादर करावीत.- न्यायाधीश शशिकांत मोकाशी, सचिव- जिल्हा विधि सेवा प्राधिकरण

टॅग्स :SolapurसोलापूरCourtन्यायालयGovernmentसरकार